शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शेतकऱ्यांची उपेक्षा करूनही विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:00 IST

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करून भाजपने विजय मिळविला. एकंदरीत शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, हा संदेश या निकालावरून गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच द्यावे लागेल. त्यांनी २०१४ मधील निवडणुकीत दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, त्याचा लेखाजोखा या निवडणुकीच्या वेळी देण्यात आला नाही. शेतकºयांना ५० टक्के नफा जोडून भाव देण्याचा, युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा व सबका साथ सबका विकास हे विषय मागे पडलेत. तरीही मोदी यांनी विजय खेचून आणला यात शंका नाही. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यात भाजपाने मिळविलेल्या विजयामुळे मोदींची लोकप्रियता व विश्वास अजून कायम असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्र व कर्नाटकमधील निकालही हाच संदेश देत आहे, परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व केरळमध्ये मोदी जादूचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपा युतीचा परिणाम पडला नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करून भाजपाने विजय मिळविला. एकंदरीत शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, हा संदेश या निकालावरून गेला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीचा अभ्यास केल्यास एक मुद्दा स्पष्ट होतो की, प्रत्येक निवडणुकीत पाकिस्तानचा हात असतो. गुजरात निवडणुकीतील प्रचाराची आठवण करून देतो. त्या निवडणुकीत पाकिस्तानला रस आहे व अहमद पटेल काँग्रेसचे मुख्यमंत्री होतील, ही चर्चा घडवून आणली गेली होती.नरेंद्र मोदी यांनीच शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा केली असे नाही. त्यासाठी विरोधी पक्षही तेवढाच दोषी आहे. नरेंद्र मोदी व भाजप ज्या कुशलतेने हिंदुत्वाचा मुद्दा वापरत होते, त्याला उत्तर देण्यात विपक्ष अपयशी ठरले, तसेच जातीच्या राजकारणात शेतकºयांचे, युवकांच्या नोकरीचे, विणकरांचे प्रश्न मागे पडले, ही या निकालाची शोकांतिका आहे. काश्मीरमधील पुलवामाची दुर्दैवी घटना व पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याचा प्रचार याचा निवडणुकीवर प्रभाव पडला. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक जिंकण्यासंदर्भात केलेल्या विधानाकडे लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणतात, किती चांगल्या पद्धतीने सरकार चालविले, लोकांचे प्रश्न किती सोडविले, देशाची अर्थव्यवस्था किती सुधारली, यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी ते पी. व्ही. नरसिंहराव सरकारचे उदाहरण देतात. त्यांच्या मते निवडणुका भावनात्मक मुद्द्यांवर जिंकता येतात. म्हणून ते म्हणतात, मुस्लिमांमध्ये फूट पाडा, हिंदूंना संघटित करा व निवडणुका जिंका. मोदी यांचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि मंत्र हेच आहे. इंदिरा गांधी यांना निवडणूक जिंकण्याचे तंत्र माहिती होते, तसेच नरेंद्र मोदी यांचे आहे. नोटाबंदीच्या वेळी मोदी म्हणाले होते, ‘मैंने अमिरों की निंद हराम कर दी.’गरिबांना ते खरे वाटले.

गाव व शहर यांतील उत्पन्नाची तफावत दूर झाली नाही, तर ‘सब का साथ सब का विकास’ कसे साध्य होईल? आमदार, खासदार स्वत:चे भत्ते वाढवून घेण्यासाठी एकत्र येतात. पुढील पाच वर्षांत मोदी सरकार व विरोधी पक्ष सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देतील, अशी आशा करू या.विजय जावंधिया(शेतकरी नेते.)