शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

शेतकऱ्यांची उपेक्षा करूनही विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:00 IST

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करून भाजपने विजय मिळविला. एकंदरीत शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, हा संदेश या निकालावरून गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच द्यावे लागेल. त्यांनी २०१४ मधील निवडणुकीत दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, त्याचा लेखाजोखा या निवडणुकीच्या वेळी देण्यात आला नाही. शेतकºयांना ५० टक्के नफा जोडून भाव देण्याचा, युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा व सबका साथ सबका विकास हे विषय मागे पडलेत. तरीही मोदी यांनी विजय खेचून आणला यात शंका नाही. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यात भाजपाने मिळविलेल्या विजयामुळे मोदींची लोकप्रियता व विश्वास अजून कायम असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्र व कर्नाटकमधील निकालही हाच संदेश देत आहे, परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व केरळमध्ये मोदी जादूचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपा युतीचा परिणाम पडला नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करून भाजपाने विजय मिळविला. एकंदरीत शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, हा संदेश या निकालावरून गेला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीचा अभ्यास केल्यास एक मुद्दा स्पष्ट होतो की, प्रत्येक निवडणुकीत पाकिस्तानचा हात असतो. गुजरात निवडणुकीतील प्रचाराची आठवण करून देतो. त्या निवडणुकीत पाकिस्तानला रस आहे व अहमद पटेल काँग्रेसचे मुख्यमंत्री होतील, ही चर्चा घडवून आणली गेली होती.नरेंद्र मोदी यांनीच शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा केली असे नाही. त्यासाठी विरोधी पक्षही तेवढाच दोषी आहे. नरेंद्र मोदी व भाजप ज्या कुशलतेने हिंदुत्वाचा मुद्दा वापरत होते, त्याला उत्तर देण्यात विपक्ष अपयशी ठरले, तसेच जातीच्या राजकारणात शेतकºयांचे, युवकांच्या नोकरीचे, विणकरांचे प्रश्न मागे पडले, ही या निकालाची शोकांतिका आहे. काश्मीरमधील पुलवामाची दुर्दैवी घटना व पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याचा प्रचार याचा निवडणुकीवर प्रभाव पडला. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक जिंकण्यासंदर्भात केलेल्या विधानाकडे लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणतात, किती चांगल्या पद्धतीने सरकार चालविले, लोकांचे प्रश्न किती सोडविले, देशाची अर्थव्यवस्था किती सुधारली, यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी ते पी. व्ही. नरसिंहराव सरकारचे उदाहरण देतात. त्यांच्या मते निवडणुका भावनात्मक मुद्द्यांवर जिंकता येतात. म्हणून ते म्हणतात, मुस्लिमांमध्ये फूट पाडा, हिंदूंना संघटित करा व निवडणुका जिंका. मोदी यांचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि मंत्र हेच आहे. इंदिरा गांधी यांना निवडणूक जिंकण्याचे तंत्र माहिती होते, तसेच नरेंद्र मोदी यांचे आहे. नोटाबंदीच्या वेळी मोदी म्हणाले होते, ‘मैंने अमिरों की निंद हराम कर दी.’गरिबांना ते खरे वाटले.

गाव व शहर यांतील उत्पन्नाची तफावत दूर झाली नाही, तर ‘सब का साथ सब का विकास’ कसे साध्य होईल? आमदार, खासदार स्वत:चे भत्ते वाढवून घेण्यासाठी एकत्र येतात. पुढील पाच वर्षांत मोदी सरकार व विरोधी पक्ष सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देतील, अशी आशा करू या.विजय जावंधिया(शेतकरी नेते.)