शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
4
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
5
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
6
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
7
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
8
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
9
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
10
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
11
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
12
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
13
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
14
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
15
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
16
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
18
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
19
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
20
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसीराजचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:55 IST

पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झाले. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी आचारसंहिता बनविल्या, परंतु तीदेखील चमकोगिरीच ठरली. पोलीस कर्मचा-यांची वर्षानुवर्षांची मस्ती काही उतरत नाही. सांगलीतील अनिकेत कोथळेपासून अनेक प्रकरणांनी पोलिसांतील गुन्हेगारी उघड झाली, पण त्यापेक्षाही सामान्य नागरिकांना पोलिसांकडे गेल्यावर न्याय मिळेलच, याची शाश्वती राहिली नाही

पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झाले. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी आचारसंहिता बनविल्या, परंतु तीदेखील चमकोगिरीच ठरली. पोलीस कर्मचा-यांची वर्षानुवर्षांची मस्ती काही उतरत नाही. सांगलीतील अनिकेत कोथळेपासून अनेक प्रकरणांनी पोलिसांतील गुन्हेगारी उघड झाली, पण त्यापेक्षाही सामान्य नागरिकांना पोलिसांकडे गेल्यावर न्याय मिळेलच, याची शाश्वती राहिली नाही, हे पोलीस दलाचे सर्वांत मोठे अपयश आहे. हा समज दृढ करणाºया घटना सातत्याने घडत आहेत. एखादी घटना घडल्यावरही नागरिक पोलीस ठाण्यात जायला कचरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदारालाच आरोपीप्रमाणे वागणूक दिली जाते. बोलण्यातील गुर्मीपासून ते पोलीस ठाण्यात मिळणाºया वागणुकीमुळे नैराश्य येते, पण त्यापेक्षाही तक्रार घेऊन येणाºयावरच पोलीस दंडुका उगारतात, हे जास्त भीषण. पुण्यातील जनवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पट्ट्याने मारहाण सुरू केली. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडिलांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला केवळ बदलीची शिक्षा झाली. शहाण्याने कोर्टाची किंवा पोलीस ठाण्याची पायरी चढू नये, म्हणतात. येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा पोलीस चौकीच्या पायरीवरच मृत्यू झाला. वास्तविक, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्टÑ पोलीस दलाचे ब्रीद, परंतु त्यामध्ये भ्रष्टाचाराची लागण झाल्याचा फटका सामान्य माणसाला बसू लागला आहे. पोलिसांना मिळणाºया सुविधा, त्यांचे वेतन याबाबत अनेकदा चर्चा होते. उत्सवांच्या काळात पोलिसांना तासन्तास कराव्या लागणाºया ड्युटीबाबत त्यांचे कौतुकही होते. जनतेचे रक्षक म्हणून विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार सोहळेही होतात, परंतु पोलिसांमध्ये माणुसकीची भावना निर्माण करण्यात यश मिळाले आहे, असे म्हणता येण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या नागरिकाला सौजन्यपूर्वक वागणूक मिळणे, हा त्याचा हक्क आहे. त्यासाठी मोहिमा राबविल्या जातात, परंतु पोलीस चौकीपर्यंतच्या स्तरापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. कायद्याचे रक्षकच भक्षक बनायला लागले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे याचा अर्थ भीतियुक्त समाज निर्माण करणे नाही. कायद्याविषयी सामान्य माणसाला विश्वास वाटायला हवा, परंतु यंत्रणाच किडलेली असल्याने पोलिसी राज भयभीत करत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र