शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

अत्यंत रास्त वाभाडे

By admin | Updated: March 7, 2016 21:23 IST

एरवी अत्यंत पसरट, संदिग्ध, काहीसे अव्यवहार्य आणि वाऱ्याची दिशा पाहून बोलणाऱ्या अण्णा हजारे यांनी सुरक्षा यंत्रणेचे काढलेले वाभाडे मात्र अत्यंत रास्त, टोकेरी आणि मर्मभेदी आहेत.

एरवी अत्यंत पसरट, संदिग्ध, काहीसे अव्यवहार्य आणि वाऱ्याची दिशा पाहून बोलणाऱ्या अण्णा हजारे यांनी सुरक्षा यंत्रणेचे काढलेले वाभाडे मात्र अत्यंत रास्त, टोकेरी आणि मर्मभेदी आहेत. त्यांचे वर्तन आणि त्यांची वक्तव्ये यांच्या विषयी भले कितीही प्रवाद असले तरी आपल्याला सरकारची सुरक्षा व्यवस्था नको, ही त्यांची भूमिका अगदी प्रथमपासून ठाम आहे. राज्यातील भ्रष्टाचाराचे आणि भ्रष्टाचार्यांचे समूळ उन्मूलन व्हावे हा त्यांचा प्रथमपासूनचा प्रयत्न आणि आग्रह आहे व त्यासाठी त्यांनी वेळोवेळी विभिन्न उपायदेखील योजले आहेत. सरकारनेदेखील वेळोवेळी केवळ त्यांच्या समाधानासाठी काही लटकी पावलेही उचलली आहेत. त्यातून ज्यांच्या हितसंबंधांना बाधा पोहोचली अशा लोकानी अण्णांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. परिणामी सरकारने आपणहून त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली. ती प्रत्येकवेळी त्यांनी नाकारली पण सरकारने ती कायम ठेवली. नुकतीच या सुरक्षा व्यवस्थेत सरकारने वृद्धी केली. त्यावर मात्र संतापाचा कडेलोट झाला म्हणून की काय अण्णांनी या व्यवस्थेचे वाभाडे काढणारे एक पत्रच सरकारला पाठविले आहे. त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी दोन-चार नव्हे तर चांगले ३७ लोक सरकारने तैनात केले असले तरी त्यापैकी एकाचाही आणि काडीमात्र उपयोग नसल्याचे या पत्रात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. उलट या साऱ्यांची तैनात राखण्यासाठी अवघ्या दोन-अडीच हजार उंबऱ्यांच्या राणेगण सिद्धीसारख्या गावाला मोठा आर्थिक भार उचलावा लागत आहे. ज्यांनी अण्णांचा जीव वाचवायचा ते आरामात लोळत किंवा मोबाईलवर खेळत बसलेले असतात. त्यामुळे अण्णा एकटेच कुठेही फिरत असतात. त्यांच्या या पत्रानंतर आता कदाचित सरकार त्यांच्या तैनातील लोकांना धाडकन निलंबित करेल आणि त्यांची चौकशी सुरु करेल. ते होऊ नये म्हणूनच कदाचित अण्णा एवढे दिवस स्पष्ट बोलण्याचे टाळीत असावेत. त्यांच्या पत्रातील एक मुद्दा तर साऱ्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच उचित प्रश्नचिन्ह उमटविणारा आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही त्यांचे प्राण जर वाचवता आले नाहीत तर अशी व्यवस्था असण्यापेक्षा ती नसलेलीच काय वाईट?