शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वरदायिनीची कृपा

By admin | Updated: August 19, 2016 04:17 IST

सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीची सध्या कृपा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आता गरज आहे ती पाणी नियोजनाची...

 - राजा मानेसोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीची सध्या कृपा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आता गरज आहे ती पाणी नियोजनाची...दुष्काळाच्या संकटाने गेली दोन वर्षे बळीराजाला नाडले. जिल्ह्यात पाऊस नाही म्हणून सर्वच शेतकरी अडचणीत आणि पाऊस नाही म्हणून उजनी धरणातही पाणी नाही. धरणात पाणी नाही म्हणून जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त! हे दुष्टचक्र सोलापूर जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेले. मागील दोन वर्षांत याच दुष्टचक्राने जिल्ह्याचे अर्थकारण बिघडविले. रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून खरीप हंगामात शेतकरी दुष्काळ असूनही शासनाच्या सवलतीपासून दूर राहिला. साखर कारखानदारी अडचणीत आल्याच्या धास्तीने ऊस उत्पादक शेतकरीही ऊस मोडू लागला. उसाचे क्षेत्र घटले. या पार्श्वभूमीवर या वर्षी पावसाची कृपा होईल, या आशेवर शेतकरी तग धरून राहिला. जिल्ह्याचे अर्थकारण उजनी धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.१२१ टीएमसी पाणी क्षमता असलेल्या या धरणात पाणी साठणे हे पूर्णपणे पुणे जिल्ह्यातील पाऊसमानावर अवलंबून असते. आतापर्यंत तरी तिकडे चांगला पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरण आज उणे साठ्यातून तब्बल ६२ टक्के अधिक साठ्यापर्यंत पोहोचले. कालव्यातून पाणी सोडावे, बोगद्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी गेली काही वर्षे आंदोलने आणि टोकाचा पाठपुरावा करूनही उजनी धरणातून पाणी सोडले जायचे नाही. या वर्षी मात्र अगदी मागणी पुढे यायच्या आतच पाणी सोडल्याने शेतकरी आनंदला! पाण्यासाठी कालवे आसुसलेले होते. तब्बल १७ महिने कोरडे पडलेल्या कालव्यांमधून आज पाणी वाहाते आहे. उजनी धरणातील वाढलेल्या पाणी साठ्यामुळे सर्वच आघाड्यांवर उत्साह आणि आनंद दिसत आहे. या आनंदी वातावरणाचे परिणाम सोलापूरच्या बाजारपेठेवरही दिसू लागले आहेत. सर्व काही आलबेल असताना वास्तवाचे भान मात्र ठेवायला हवे. उजनी धरणाला सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. या वरदायिनीचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेणार, हा खरा प्रश्न आहे. जलयुक्त शिवार योजना कामात राज्यात जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळविला. ठिबक सिंचन आघाडीवर देखील जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे विक्रम प्रस्थापित झाले ते जिल्ह्यावर पाण्याचे संकट असताना! आता उजनी धरणातील पाणी साठ्यामुळे पाण्याच्या संकटाची चिंता जवळजवळ संपल्याचे वातावरण सर्वच क्षेत्रांत दिसते आहे. वास्तविक जिल्ह्यात या वर्षीही पाऊस अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर ४८९ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. या वर्षी आजपर्यंत केवळ २१२ मि.मी. एवढाच पाऊस झालेला आहे. मान्सून राज्यात कधीही बरसला तरी परतीच्या पावसाचा जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. गत वर्षीपेक्षा कमी पाऊस होऊनही परतीच्या पावसाकडे खरीप हंगामाची शेती डोळे लावून बसलेली आहे. या वास्तवाचे भान ठेवून पुन्हा एकदा पाणी बचतीच्या महतीची आठवण प्रत्येकाला देण्याची वेळ आली आहे.सुमारे दोन लाख हेक्टर्स ऊसाचे क्षेत्र आणि ३५ साखर कारखाने असलेल्या या जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र या वर्षी घटलेले आहे. सध्या अनेक शेतकरी ऊसाचे बेणे मिळेल त्या किमतीत घेऊन नव्या ऊस लागवडीच्या प्रयत्नाला लागल्याचे दिसते. उजनी धरणातील पाणी साठा वाढत असताना वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचाही शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतो आहे. या सर्व अनुकूल बाबींचा शिस्तबद्ध उपयोग करण्यासाठी शेततळ्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. ‘मागेल त्याला शेततळी’ ही लोकप्रिय घोषणा केवळ कागदावरच यशस्वी होऊन चालणार नाही. प्रत्यक्षात किती शेत तळ्यांमध्ये किती पाणी साठले हे त्रयस्थपणे पाहाणे आवश्यक आहे. उजनी असेल वा वीर धरण वाहत्या पाण्याला शेत तळ्यांमध्ये साठविण्याची संधी सोडता कामा नये. ठिबक सिंचनाद्वारेच ऊस पीक घेण्याचा नियमही काटेकोरपणे पाळण्याची सवय अंगवळणी पाडण्याची गरज आहे. वरदायिनी उजनीची कृपा सध्या तरी जिल्ह्यावर झाली आहे. शाश्वत पाणीसाठा आणि त्याला अनुरूप पीकपद्धती हा विषय नेहमीच केवळ चर्चिला जातो. सध्याचे वातावरण तो कृतीत येण्यास अनुकूल आहे.