शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

वरदायिनीची कृपा

By admin | Updated: August 19, 2016 04:17 IST

सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीची सध्या कृपा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आता गरज आहे ती पाणी नियोजनाची...

 - राजा मानेसोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीची सध्या कृपा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आता गरज आहे ती पाणी नियोजनाची...दुष्काळाच्या संकटाने गेली दोन वर्षे बळीराजाला नाडले. जिल्ह्यात पाऊस नाही म्हणून सर्वच शेतकरी अडचणीत आणि पाऊस नाही म्हणून उजनी धरणातही पाणी नाही. धरणात पाणी नाही म्हणून जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त! हे दुष्टचक्र सोलापूर जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेले. मागील दोन वर्षांत याच दुष्टचक्राने जिल्ह्याचे अर्थकारण बिघडविले. रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून खरीप हंगामात शेतकरी दुष्काळ असूनही शासनाच्या सवलतीपासून दूर राहिला. साखर कारखानदारी अडचणीत आल्याच्या धास्तीने ऊस उत्पादक शेतकरीही ऊस मोडू लागला. उसाचे क्षेत्र घटले. या पार्श्वभूमीवर या वर्षी पावसाची कृपा होईल, या आशेवर शेतकरी तग धरून राहिला. जिल्ह्याचे अर्थकारण उजनी धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.१२१ टीएमसी पाणी क्षमता असलेल्या या धरणात पाणी साठणे हे पूर्णपणे पुणे जिल्ह्यातील पाऊसमानावर अवलंबून असते. आतापर्यंत तरी तिकडे चांगला पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरण आज उणे साठ्यातून तब्बल ६२ टक्के अधिक साठ्यापर्यंत पोहोचले. कालव्यातून पाणी सोडावे, बोगद्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी गेली काही वर्षे आंदोलने आणि टोकाचा पाठपुरावा करूनही उजनी धरणातून पाणी सोडले जायचे नाही. या वर्षी मात्र अगदी मागणी पुढे यायच्या आतच पाणी सोडल्याने शेतकरी आनंदला! पाण्यासाठी कालवे आसुसलेले होते. तब्बल १७ महिने कोरडे पडलेल्या कालव्यांमधून आज पाणी वाहाते आहे. उजनी धरणातील वाढलेल्या पाणी साठ्यामुळे सर्वच आघाड्यांवर उत्साह आणि आनंद दिसत आहे. या आनंदी वातावरणाचे परिणाम सोलापूरच्या बाजारपेठेवरही दिसू लागले आहेत. सर्व काही आलबेल असताना वास्तवाचे भान मात्र ठेवायला हवे. उजनी धरणाला सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. या वरदायिनीचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेणार, हा खरा प्रश्न आहे. जलयुक्त शिवार योजना कामात राज्यात जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळविला. ठिबक सिंचन आघाडीवर देखील जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे विक्रम प्रस्थापित झाले ते जिल्ह्यावर पाण्याचे संकट असताना! आता उजनी धरणातील पाणी साठ्यामुळे पाण्याच्या संकटाची चिंता जवळजवळ संपल्याचे वातावरण सर्वच क्षेत्रांत दिसते आहे. वास्तविक जिल्ह्यात या वर्षीही पाऊस अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर ४८९ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. या वर्षी आजपर्यंत केवळ २१२ मि.मी. एवढाच पाऊस झालेला आहे. मान्सून राज्यात कधीही बरसला तरी परतीच्या पावसाचा जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. गत वर्षीपेक्षा कमी पाऊस होऊनही परतीच्या पावसाकडे खरीप हंगामाची शेती डोळे लावून बसलेली आहे. या वास्तवाचे भान ठेवून पुन्हा एकदा पाणी बचतीच्या महतीची आठवण प्रत्येकाला देण्याची वेळ आली आहे.सुमारे दोन लाख हेक्टर्स ऊसाचे क्षेत्र आणि ३५ साखर कारखाने असलेल्या या जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र या वर्षी घटलेले आहे. सध्या अनेक शेतकरी ऊसाचे बेणे मिळेल त्या किमतीत घेऊन नव्या ऊस लागवडीच्या प्रयत्नाला लागल्याचे दिसते. उजनी धरणातील पाणी साठा वाढत असताना वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचाही शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतो आहे. या सर्व अनुकूल बाबींचा शिस्तबद्ध उपयोग करण्यासाठी शेततळ्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. ‘मागेल त्याला शेततळी’ ही लोकप्रिय घोषणा केवळ कागदावरच यशस्वी होऊन चालणार नाही. प्रत्यक्षात किती शेत तळ्यांमध्ये किती पाणी साठले हे त्रयस्थपणे पाहाणे आवश्यक आहे. उजनी असेल वा वीर धरण वाहत्या पाण्याला शेत तळ्यांमध्ये साठविण्याची संधी सोडता कामा नये. ठिबक सिंचनाद्वारेच ऊस पीक घेण्याचा नियमही काटेकोरपणे पाळण्याची सवय अंगवळणी पाडण्याची गरज आहे. वरदायिनी उजनीची कृपा सध्या तरी जिल्ह्यावर झाली आहे. शाश्वत पाणीसाठा आणि त्याला अनुरूप पीकपद्धती हा विषय नेहमीच केवळ चर्चिला जातो. सध्याचे वातावरण तो कृतीत येण्यास अनुकूल आहे.