शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यशिक्षण

By admin | Updated: June 22, 2015 23:25 IST

शिक्षणाच्या विविध व्याख्या होऊ शकतात. मनाची मशागत करणारी प्रक्रिया अशीही एक व्याख्या करता येऊ शकते. विनोबाजींनी जीवन आणि शिक्षण

डॉ. दिलीप धोंडगेशिक्षणाच्या विविध व्याख्या होऊ शकतात. मनाची मशागत करणारी प्रक्रिया अशीही एक व्याख्या करता येऊ शकते. विनोबाजींनी जीवन आणि शिक्षण यांच्या फारकतीबद्दल चिंता व्यक्त करताना शिक्षण देताना जीवनाचा संदर्भ वगळला जातो व जीवन जगताना शिक्षणाला काहीही स्थान उरत नाही असे चिंतन प्रस्तुत केले आहे. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अनेक घटकांची उपस्थिती आवश्यक असते. सगळ्यांच्याच वाट्याला सर्वच घटकांची अनुकूलता असते, असे नव्हे. ज्यांच्या वाट्याला अत्यल्प घटकांची उपस्थिती लाभते अशा व्यक्ती निराश होतात, विफल होतात व नको हे जगणे असा विचार करून आपल्या जगण्याला अनैसर्गिकपणे पूर्णविराम देतात. स्पर्धेचे आपण समजू शकतो. पण स्पर्धेला काही विकृत परिमाणे लाभतात, तेव्हा भयावह परिस्थिती निर्माण होते. या स्पर्धेला सामाजिक संदर्भात स्तरीय संदर्भ प्राप्त झाले की त्यांची विभागणी श्रेष्ठ-कनिष्ठ अशी होती. मानापमानाच्या कल्पनाही मग यावरच अवलंबून राहतात. मानाच्या प्रसंगांनी खूप संतुष्ट होणे व अपमानाच्या प्रसंगांनी अतोनात दु:खी-कष्टी होणे असे घडते. अनेक मानाचे प्रसंग अनुभवूनही अपमानाच्या प्रसंगाने एकदम खचून जाणे घडते. असे घडणे हे मनोकायिक स्वास्थ्याला बाधत ठरते. यासाठी सुकाणूरूप असलेल्या मनाची मशागत करावी लागते. ही मशागत होण्यासाठी जगण्यातल्या अनुभवांच्या आधारावरचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. अशा अभ्यासक्रमासाठी आपल्या श्रेष्ठ ग्रंथांमध्ये अनेक सूत्रे मिळतात. आपल्या या प्रस्तुत विवेचनाच्या संदर्भात श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायातील १९व्या श्लोकाचा विचार करता येईल. श्लोक असा आहे :तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित् । अनिकेत: स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नर: ।।निंदा आणि स्तुती समान मानणे, मौनी (मौन बाळगणारा), जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणारा; याचा अर्थ आपली क्षमता जाणणारा व क्षमतेपेक्षा अधिक मिळावे अशी अपेक्षा न ठेवणारा, कोठेच आश्रय न धरणारा; याचा अर्थ आपल्या जगण्याची आपणच कुवत वाढवणारा स्वावलंबी असा, स्थिरबुद्धीचा असा मनुष्य, जो श्रेष्ठच गणला जातो व त्याच्या अंगभूत श्रेष्ठतेमुळे तो परमेश्वरालाही प्रिय असतो. स्थिरबुद्धी या घटकाचाही थोडा ऊहापोह करायला हवा. स्थिरबुद्धी ही निश्चयात्मक बुद्धी असते. निश्चयाचे बळ हेच स्वयमेव फळ असते असे तुकोबांनी सांगून ठेवलेले आहे. मनाच्या मशागतीसाठी जीवनसंबद्ध, अनुभवसंबद्ध घटकांचे शिक्षण द्यायला हवे. याला मूल्यशिक्षण म्हणता येईल.