शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

वाकडी ते राईनपाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 12:12 IST

- मिलिंद कुलकर्णीभौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून ...

- मिलिंद कुलकर्णीभौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून दोन कुमारवयीन मुलांची नग्न धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्याची चित्रफित बनवून स्वत:ची मर्दुमकी गाजविण्यासाठी समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावात आठवडे बाजारात भविष्य सांगणाऱ्या मंगळवेढा (जि.सोलापूर) येथील पाच जणांना मुलांना पळवून नेणाºया टोळीचे सदस्य समजून ३ ते ५ हजार लोकांच्या जमावाने ठेचून मारण्याचे राक्षसी कृत्य केले. मुले पळवून नेण्याची अफवा सध्या खान्देशसह संपूर्ण देशभर पसरली आहे. समाजमाध्यमांमुळे या अफवेचा अधिक वेगाने प्रसार होत आहे. मास हिस्टेरिया असे त्याला म्हटले जाते. कोणतीही खातरजमा न करता, विवेक, भान न वापरता समूहाची मानसिकता प्रभावी ठरुन अशी राक्षसी कृत्ये घडू लागली तर हाहाकार माजेल. विशेष म्हणजे, या घटना ग्रामीण भागात सर्वाधिक घडत आहे. पाचोरा, म्हसावद, घोटाणे, भादली बुद्रूक, सुभाष वाडी अशा गावांमध्ये केवळ गैरसमजापोटी हे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘समाजमाध्यम दिन’ साजरा करण्यात आला. या संपर्काच्यादृष्टीने प्रभावी असलेल्या माध्यमाचे उपयोग, चांगल्या बाजूंवर साधकबाधक चर्चा झाली. परंतु अफवा पसरविण्यात, चुकीच्या गोष्टी प्रसारीत करण्यासाठी या माध्यमांचा दुरुपयोग होत असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये एकविसाव्या शतकात अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे. भुताटकी, डाकीण असे प्रकार सर्रास घडतात. ज्योतिषावर गाढ विश्वास असतो. त्यातूनच मुले पळविणारी टोळी, किडन्या काढून विकणारी टोळी अशी अफवा पसरली तर भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांचा त्यावर पटकन विश्वास बसतो. समूह मानसिकतेच्या प्रभावात मग असे राक्षसी क्रौर्य घडून येते. माणूस माणसाचा जीव घेण्यापर्यंत बेभान होऊ शकतो हे खरोखर भयंकर कृत्य आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर खेडोपाडी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज, पाणी पोहोचविण्यात यश मिळाले. भौतिक सुविधा दिल्या गेल्या. परंतु ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ ही भावना पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेत अडकून राहिली. आमच्या मन आणि हृदयात ती पोहोचली नाही. शहाणपण, समंजसपणा आला नाही. प्रबोधनाच्या निव्वळ गप्पा झाल्या; पण माणसे अद्यापही जातपात, अंधश्रध्दा, प्रांतभेद या जोखडात अडकून पडली आहेत. मानसिकदृष्टया सक्षमीकरणाची नितांत गरज अशा घटनांमधून आवर्जून दिसून येते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJalgaonजळगाव