शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

वडापाव ते जिलेबी व्हाया झुणका-भाकर आणि कांदेपोहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 03:14 IST

वडापाव हे सेनेच्या झणझणीत राजकारणाचे हत्यार! नंतर झुणका-भाकर आली, मग शिववडापाव! काँग्रेसनेही कांदापोहे संमेलन आयोजित केले होतेच की!

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत -

‘लोकांचे मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो,’ असे लोकप्रिय वचन आहे. त्याचे प्रत्यंतर निवडणुकांमध्ये वरचेवर येते. याची आठवण होण्याचे तात्कालिक निमित्त शिवसेनेच्या गुजराती सेलचे प्रमुख हेमराज शहा यांनी दिलेल्या ‘जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या ताज्या घोषणेत आहे. भाजप-शिवसेना युती असताना मुंबईसह महाराष्ट्रातील गुजराती बांधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर मत द्यायचे असेल व त्यांच्या मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचा असेल, तरी डोळे झाकून मत देत होते. अर्थात, कुठलेच जात-धर्मीय बांधव एका पक्षाला मत देत नाहीत, परंतु महाविकास आघाडी सरकार स्थापन करून भाजपशी पंगा घेतल्यावर शिवसेनेला गुजराती खाद्यपदार्थांचा आधार घेत, त्या समाजाची सहानुभूती प्राप्त करावीशी वाटली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवसेना स्थापन झाली, तेव्हा ठिकठिकाणी उडपी हॉटेलांमधून इडली, डोसा वगैरे पदार्थ लोकप्रिय होऊ लागले होते. परप्रांतातून आलेले दाक्षिणात्य येथील नोकऱ्या व व्यवसायावर कब्जा करीत आहेत, हाच शिवसेनेच्या स्थापनेमागील मूळ अंगार असल्याने दाक्षिणात्यांच्या इडलीला ‘ठेचण्या’करिता वडापावचा जन्म झाला. त्यामुळे वडापाव हे सेनेच्या  झणझणीत राजकारणाचे हत्यार होते. १९६६ मध्ये दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य यांनी वडापावची गाडी लावली. दादरमध्येच सुधाकर म्हात्रे यांचीही वडापावची गाडी सुरू झाली. १९७०-८०च्या सुमारास मुंबईतील कापड गिरण्या बंद पडू लागल्या, त्यावेळी बेरोजगार गिरणी कामगारांनी किंवा त्यांच्या मुलाबाळांनी घरे चालविण्याकरिता वडापावच्या गाड्यांचा आधार घेतला व सेनेने त्यांना राजाश्रय दिला. या परिस्थितीतून जन्माला आलेला व वाढलेला वडापाव व्यवसाय  स्थिरस्थावर झाला आणि नावारूपाला आला. आता वेगवेगळ्या शहरांत ब्रँड बनलेल्या वडापावने आपली ओळख निर्माण केली आहे. अर्थात, सेना नेत्यांची मुले कॉन्व्हेंटमध्ये, त्यांच्या मालकीची पंचतारांकित हॉटेल्स, तर गोरगरीब शिवसैनिकांची मुले महापालिका शाळेत व त्यांच्या चरितार्थाकरिता वडापावच्या गाड्या अशी खिल्ली उडविण्याची संधी विरोधकांना नेहमीच मिळत आली. दक्षिणेकडील नेते हे लोकानुनयाकरिता एक रुपयात तांदूळ, दोन रुपयांत गहू देत आले. हेच राजकारण शिवसेनेने एक रुपयात झुणका-भाकर देऊन १९९५च्या निवडणुकीपूर्वी केले. शिवसेनेच्या सत्ता काळातच ही योजना गुंडाळली गेली. अर्थात, सेनेच्या पानात सत्तेची पुरणपोळी पडण्याची जी अनेक कारणे होती, त्यामध्ये ही झुणका-भाकर योजना होती हे नाकारता येत नाही. २००९ मध्ये शिवसेनेला अचानक शिववडा ग्लोबल ब्रँड करण्याची उबळ आली. खा.संजय राऊत यांनी याकरिता मुंबईतील वेगवेगळ्या वडापाव विक्रेत्यांकडून स्पर्धेकरिता एंट्री मागविल्या होत्या. २७ वडापाव विक्रेत्यांमधून बोरीवलीचा मंगेश वडापाव, दादरचा वसईकर वडापाव वगैरे अव्वल ठरले होते. वेगवेगळ्या वडापावची वेगवेगळी चव हेच वैशिष्ट्य असल्याने, स्वच्छता व किंमत यांचा सुयोग्य मिलाफ साधण्यातील मर्यादा यामुळे ग्लोबल शिववडापाव लोकलच राहिला. काँग्रेसने वडापाव नव्हे, तर कांदेपोहे ही मराठी माणसाची ओळख असल्याचे सांगत, कांदेपोहेे संमेलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र, ती फलद्रुप झाली नाही. शिववड्याला टक्कर देण्याकरिता नितेश राणे यांनी ‘छत्रपती वडापाव’ तळायला घेतला. यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पित्त खवळले व वडापावला ‘शिव’ म्हणणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याची आरोळी त्यांनी ठोकली होती.जी गोष्ट मराठी खाद्यपदार्थांची तीच बिर्याणी, कबाब वगैरे पदार्थांची! मुस्लीम मतदारांची मने जिंकण्याकरिता इफ्तार पार्ट्या देण्यात आता कुठलाही पक्ष मागे नाही. आता तर रमजानमध्ये पहाटेच्या वेळी मुस्लीम समाज नाश्ता करतो व मग दिवसभर काही खात नाही, म्हणून ‘सहेरी’ पार्ट्या करण्याकडे कल आहे. परप्रांतीयांना आपलेसे करण्याकरिता शिवसेनेनी ‘लाई चना’चे आयोजन केले होते. मागील निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने १० रुपयांत शिवथाळी देण्याची घोषणा केली व कोरोनाच्या काळात तिची किंमत पाच रुपये केली.भाषा ही ज्याप्रमाणे कुठल्याही समाजाची ओळख आहे. त्याचप्रमाणे, खाद्यपदार्थ हीही ओळखच! खाद्यसंस्कृतीला गोंजारण्यामुळे तो समाज आपलासा करणे शक्य होते, याच हेतूने हे सुरू आहे. अर्थात, कुणी काय खावे व काय खाऊ नये, या उचापतींपेक्षा हे निश्चित चांगले!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा