शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

(अ) सत्याचे प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:12 IST

पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग आहेत तरी, काय? या उत्सुकतेपोटी...

- - नंदकिशोर पाटीलपुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग आहेत तरी, काय? या उत्सुकतेपोटी त्यांनी पुस्तक मागवून घेतले. गांधीजींच्या आत्मकथनातून प्रेरणा घेत त्यांनीही मग आत्मकथन लिखाणाचा घाट घातला. आपणही आपल्या आयुष्यातील काही ‘प्रयोग’ शब्दबद्ध केले तर आपलाही नावलौकिक होईल, ही त्यामागची भावना. आत्मचरित्राशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही, म्हणून या मंडळींनी चांगली ऐसपैस ‘बैठक’ मारली. पण गरिबीतील दिवस, शाळेतील हुशारी, घराण्याचा वारसा, सामाजिक कार्याचे बाळकडू इत्यादी मजकुराने प्रस्तावनेची आठ-दहा पाने खरडल्यानंतर मूळ विषयावर घोडे अडले. सुरुवात नेमकी कुठून करावी? हे काही त्यांना सूचेना. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही!’ अशा एखाद्या दमदार ‘लोकमान्य’ वाक्याने आत्मकथनाची सुरुवात झाली पाहिजे, या आग्रहामुळे आत्मकथन प्रस्तावनेच्या पुढे काही सरकेना. अनेकदा खाडाखोड, डोकेफोड केल्यानंतर ‘मंत्रिपदाची शपथ घेताना मला माझे जुने दिवस आठवले...’ अशी सुरुवात एका महोदयांनी केली. पण जुने दिवस म्हणजे नेमके कोणते? आपला भूतकाळ तर राडेबाजी, खंडणीखोरी, दलाली, फसवाफसवी आणि दंगेखोरी अशा अजामीनपात्र घडामोडींनी भरलेला! आज आपण पदावर आहोत म्हणून हा ‘इतिहास’ लोकांच्या विसराळी पडला म्हणून काय झाले? उद्या आपले हे आत्मकथन वाचून कोणी खोलात शिरले तर उगीच पंचाईत व्हायला नको म्हणून त्यांनी त्या वाक्यावर फुली मारली आणि गदिमांच्या गीतातील ‘बंदीवान आहे जगती...’ या भुतकाळाशी साजेशा ओळीने सुरुवात करून टाकली!एका शिक्षणमहर्र्षींनी तर ‘शाळेची घंटा वाजायला उशीर, सर्वांत अगोदर मी वर्गात हजर असे!’ अशी सुरुवात केली. ते वाचून त्यांच्या सौभाग्यवतींना हसू आवरेना. बंटीचे बाबा फेकाफेकीत मास्टर आहेत, हे ठाऊक होते. पण या वाक्यावर तर त्यांना ज्ञानपीठच मिळायला हवे. कारण, यांनीच तर शाळेची घंटा चोरून लोहाराला विकली होती अन् त्या पैशातून आम्ही दोघांनी चोरून सिनेमा पाहिला होता! नमनालाच पत्नीकडून असा अपशकुन झाल्यामुळे त्यांनी ते वाक्य बदलून ‘शिक्षणाने माणूस मोठा होतो’ अशी सुरुवात केली. पण ‘बाबा तुमची डिग्री बोगस आहे’, अशी बंटीनं आठवण करून देताच त्यांनी तेही वाक्य खोडले अन् ‘शहाणपणासाठी शिक्षणाची गरज नाही!’ अशी वास्तवदर्शी सुरुवात करून पत्नी अन् मुलगा दोघांचीही दाद मिळवली!सावकारीच्या पैशातून दुस-यांचा सातबारा स्वत:च्या नावे केलेल्या समाजसेवी नेत्याने लिहिले, ‘...अखेर वडिलोपार्जित पडिक जमिनीला कष्टाची फळं लागली!’तर अतिक्रमणं आणि अवैध बांधकामात नावलौकिक मिळविलेल्या रिअल इस्टेटीच्या धंद्यातील एका दातृत्ववान नेत्याने आपल्या आत्मकथनाला नाव दिले, ‘कष्टाचे इमले!’(ता.क. लवकरच या आत्मकथांचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे म्हणे!)

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र