शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लक्ष्मीदर्शनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:31 IST

देशातील एकूण वातावरण लक्षात घेता ‘विकास’ विरुद्ध ‘जुमला’ असा सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे.

२०१९ च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारी लागले असून त्याचे नियोजनदेखील सुरू झाले आहे. देशातील एकूण वातावरण लक्षात घेता ‘विकास’ विरुद्ध ‘जुमला’ असा सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे. हे दोन मुद्दे घेऊनच दोन्ही बाजू निवडणुकांमध्ये उतरतील, असे अंदाज लावण्यात येत आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.कपिल सिब्बल यांनी नागपुरात झालेल्या एका गटचर्चेत अचंबित करणारे वक्तव्य केले. आगामी निवडणुकांत जो पक्ष जास्त पैसे खर्च करेल तोच जिंकेल, असा दावा त्यांनी केला. त्यांचे हे शब्द ‘बिटविन द लाईन्स’ राजकीय वास्तवाची माहिती देणारे निश्चितच आहेत. तसे पाहिले तर निवडणुका आणि लक्ष्मीदर्शन हे एक समीकरणच तयार झाले आहे. निवडणुका या निष्पक्ष, निर्भय व मोकळ्या वातावरणात होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांकडून ‘साम, दाम, दंड, भेद’चा वापर करण्यात येतो. निवडणूक आयोगाचे यासंदर्भात प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. २०१४ च्या निवडणुकांपासून ‘सोशल मीडिया’चे प्रस्थ जास्त प्रमाणात वाढले आहे. विशेषत: त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी ‘सोशल मीडिया’वरून प्रचारावर जास्त जोर दिला. एखादी गोष्ट हवी तशी फिरवायची व थेट लोकांच्या खिशापर्यंत पोहोचवायची असा ‘ट्रेन्ड’च सुरू झाला आहे. ‘फेक न्यूज’चे प्रमाण यातून वाढले अन् सत्य-असत्य नेमके काय या विचारात मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तंत्रज्ञान क्रांतीमुळे देशाची लोकशाही पूर्णपणे बदलली आहे हे निश्चित आहे. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांच्या ‘आयटी सेल’कडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. एका पक्षाने तर देशात ठिकठिकाणी ‘आयटी’तील तज्ज्ञ मंडळींची भरतीदेखील सुरू केली आहे. साहजिकच यासाठी निधी लागणार हे निश्चित आहे. ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण ठेवणारी किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर बारीक लक्ष ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. प्रत्यक्ष प्रचाराच्या काळात मतदारांना भेटून ‘विशेष’ सेवा करणे, यापेक्षा ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून थेट त्यांच्या भावनांना साद घालणे सोपी बाब आहे. निवडणुकांच्या अगोदर वातावरणनिर्मिती करण्यासाठी नियोजन करत असलेल्या राजकीय पक्षांना याची चांगल्याने जाण आहे. त्यामुळे यावर जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची पक्षांची तयारी आहे. अशा स्थितीत निवडणुकांदरम्यान विकास, जनतेचे प्रश्न व भविष्यातील ‘ब्ल्यूप्रिंट’ यांना किती महत्त्व राहील, हा कळीचा प्रश्नच आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९