शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

लक्ष्मीदर्शनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:31 IST

देशातील एकूण वातावरण लक्षात घेता ‘विकास’ विरुद्ध ‘जुमला’ असा सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे.

२०१९ च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारी लागले असून त्याचे नियोजनदेखील सुरू झाले आहे. देशातील एकूण वातावरण लक्षात घेता ‘विकास’ विरुद्ध ‘जुमला’ असा सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे. हे दोन मुद्दे घेऊनच दोन्ही बाजू निवडणुकांमध्ये उतरतील, असे अंदाज लावण्यात येत आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.कपिल सिब्बल यांनी नागपुरात झालेल्या एका गटचर्चेत अचंबित करणारे वक्तव्य केले. आगामी निवडणुकांत जो पक्ष जास्त पैसे खर्च करेल तोच जिंकेल, असा दावा त्यांनी केला. त्यांचे हे शब्द ‘बिटविन द लाईन्स’ राजकीय वास्तवाची माहिती देणारे निश्चितच आहेत. तसे पाहिले तर निवडणुका आणि लक्ष्मीदर्शन हे एक समीकरणच तयार झाले आहे. निवडणुका या निष्पक्ष, निर्भय व मोकळ्या वातावरणात होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांकडून ‘साम, दाम, दंड, भेद’चा वापर करण्यात येतो. निवडणूक आयोगाचे यासंदर्भात प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. २०१४ च्या निवडणुकांपासून ‘सोशल मीडिया’चे प्रस्थ जास्त प्रमाणात वाढले आहे. विशेषत: त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी ‘सोशल मीडिया’वरून प्रचारावर जास्त जोर दिला. एखादी गोष्ट हवी तशी फिरवायची व थेट लोकांच्या खिशापर्यंत पोहोचवायची असा ‘ट्रेन्ड’च सुरू झाला आहे. ‘फेक न्यूज’चे प्रमाण यातून वाढले अन् सत्य-असत्य नेमके काय या विचारात मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तंत्रज्ञान क्रांतीमुळे देशाची लोकशाही पूर्णपणे बदलली आहे हे निश्चित आहे. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांच्या ‘आयटी सेल’कडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. एका पक्षाने तर देशात ठिकठिकाणी ‘आयटी’तील तज्ज्ञ मंडळींची भरतीदेखील सुरू केली आहे. साहजिकच यासाठी निधी लागणार हे निश्चित आहे. ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण ठेवणारी किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर बारीक लक्ष ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. प्रत्यक्ष प्रचाराच्या काळात मतदारांना भेटून ‘विशेष’ सेवा करणे, यापेक्षा ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून थेट त्यांच्या भावनांना साद घालणे सोपी बाब आहे. निवडणुकांच्या अगोदर वातावरणनिर्मिती करण्यासाठी नियोजन करत असलेल्या राजकीय पक्षांना याची चांगल्याने जाण आहे. त्यामुळे यावर जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची पक्षांची तयारी आहे. अशा स्थितीत निवडणुकांदरम्यान विकास, जनतेचे प्रश्न व भविष्यातील ‘ब्ल्यूप्रिंट’ यांना किती महत्त्व राहील, हा कळीचा प्रश्नच आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९