शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

आसक्तिरहित कर्म

By admin | Updated: October 18, 2016 06:55 IST

कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे.

कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे कर्माचे तीन प्रकार पडतात. वर्तमानात जे केले जाते, ते क्रियमान कर्म. त्याचे फळ तत्काळ मिळते. ज्या कर्माचे फळ कालांतराने मिळते, ते संचित कर्म. योग्य वेळी व संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देते, तेव्हा त्यास प्रारब्ध कर्म म्हणतात. या तिन्ही कर्मांच्या संयोगाने मानव जीवन नियंत्रित होत असते. हा संयोग अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म हेही कर्माचे प्रकार म्हटले जातात. चांगले ते कर्म, वाईट ते विकर्म आणि निष्क्रियता ते अकर्म. ्गीतेत नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे कर्माचे वर्णन आहे. नित्य कर्म देहधारी दररोज करतो. विशेष प्रसंगी केल्या जाणाऱ्या कर्माला नैमित्तिक कर्म तर काही इच्छा मनात ठेवून केल्या जाणाऱ्या कर्माला काम्य असे म्हणतात. जर कर्म मनुष्याला बांधून ठेवते, तर व्यक्ती त्यापासून मुक्त कशी होणार व तिला मुक्ती कशी मिळणार, हा विषय श्रीकृष्णांनी गीतेत विस्तृतपणे मांडला आहे.भगवान म्हणतात, जोवर मानव जीवन आहे, तोपर्यंत कर्म करावेच लागेल. त्यापासून मुक्ती नाही. जे गृहस्थ सन्यस्त होतात, त्यांनाही कर्म करावेच लागते. त्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी एक अद्वितीय उपाय सांगितला आहे. व्यक्ती कर्म तर करणारच, परंतु ती कर्मफलाच्या बंधनाने प्रभावित होणार नाही. हा उपाय म्हणजेच आसक्तिरहित कर्म. कर्मफलाची इच्छा मनुष्यामध्ये चिंता आणि उद्वेग निर्माण करते व तो कर्माला बांधला जातो. परंतु, तेच कर्म जेव्हा नि:स्वार्थ भावनेने केले जाते, तेव्हा व्यक्ती कर्म फळाला बांधली जात नाही. श्रीकृष्णाने कमळाचे उदाहरण दिले आहे. कमळाचे फूल चिखलात उगवूनसुध्दा त्याच्या वरती असते, त्याप्रमाणे मनुष्य त्रिगुणांनी युक्त जगात आसक्तिरहित कर्म करतानासुध्दा मुक्त होतो. ‘पद्मपत्रभिवाभ्यसा’ जेव्हा आम्ही महान व्यक्तींच्या जीवनाकडे बघतो, तेव्हा समजते की लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन नि:स्वार्थ कर्म करणे, हीच महामानवांची विशेषता आहे. जेव्हा आम्ही भूतकाळातील चिंता आणि भविष्यकाळातील आशंका सोडून वर्तमानकाळात जगणे शिकू, तेव्हाच आम्ही निरासक्त कर्म करण्यास प्रारंभ करु शकू. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय