शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

आसक्तिरहित कर्म

By admin | Updated: October 18, 2016 06:55 IST

कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे.

कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे कर्माचे तीन प्रकार पडतात. वर्तमानात जे केले जाते, ते क्रियमान कर्म. त्याचे फळ तत्काळ मिळते. ज्या कर्माचे फळ कालांतराने मिळते, ते संचित कर्म. योग्य वेळी व संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देते, तेव्हा त्यास प्रारब्ध कर्म म्हणतात. या तिन्ही कर्मांच्या संयोगाने मानव जीवन नियंत्रित होत असते. हा संयोग अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म हेही कर्माचे प्रकार म्हटले जातात. चांगले ते कर्म, वाईट ते विकर्म आणि निष्क्रियता ते अकर्म. ्गीतेत नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे कर्माचे वर्णन आहे. नित्य कर्म देहधारी दररोज करतो. विशेष प्रसंगी केल्या जाणाऱ्या कर्माला नैमित्तिक कर्म तर काही इच्छा मनात ठेवून केल्या जाणाऱ्या कर्माला काम्य असे म्हणतात. जर कर्म मनुष्याला बांधून ठेवते, तर व्यक्ती त्यापासून मुक्त कशी होणार व तिला मुक्ती कशी मिळणार, हा विषय श्रीकृष्णांनी गीतेत विस्तृतपणे मांडला आहे.भगवान म्हणतात, जोवर मानव जीवन आहे, तोपर्यंत कर्म करावेच लागेल. त्यापासून मुक्ती नाही. जे गृहस्थ सन्यस्त होतात, त्यांनाही कर्म करावेच लागते. त्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी एक अद्वितीय उपाय सांगितला आहे. व्यक्ती कर्म तर करणारच, परंतु ती कर्मफलाच्या बंधनाने प्रभावित होणार नाही. हा उपाय म्हणजेच आसक्तिरहित कर्म. कर्मफलाची इच्छा मनुष्यामध्ये चिंता आणि उद्वेग निर्माण करते व तो कर्माला बांधला जातो. परंतु, तेच कर्म जेव्हा नि:स्वार्थ भावनेने केले जाते, तेव्हा व्यक्ती कर्म फळाला बांधली जात नाही. श्रीकृष्णाने कमळाचे उदाहरण दिले आहे. कमळाचे फूल चिखलात उगवूनसुध्दा त्याच्या वरती असते, त्याप्रमाणे मनुष्य त्रिगुणांनी युक्त जगात आसक्तिरहित कर्म करतानासुध्दा मुक्त होतो. ‘पद्मपत्रभिवाभ्यसा’ जेव्हा आम्ही महान व्यक्तींच्या जीवनाकडे बघतो, तेव्हा समजते की लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन नि:स्वार्थ कर्म करणे, हीच महामानवांची विशेषता आहे. जेव्हा आम्ही भूतकाळातील चिंता आणि भविष्यकाळातील आशंका सोडून वर्तमानकाळात जगणे शिकू, तेव्हाच आम्ही निरासक्त कर्म करण्यास प्रारंभ करु शकू. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय