शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

गणवेश नव्हे मानसिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:03 AM

महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर खालावत चालल्याची ओरड सातत्याने होत असल्याचे पहायला मिळते. यामुळेच पगारदारांसह हातावर कमावणाऱ्या पालकांचीही पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्याची तयारी असते.

महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर खालावत चालल्याची ओरड सातत्याने होत असल्याचे पहायला मिळते. यामुळेच पगारदारांसह हातावर कमावणाऱ्या पालकांचीही पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्याची तयारी असते. खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी पालक पहाटेपासून रांगा लावतात. तर सरकारी शाळांतील शिक्षकांना मुलांचा शोध घेण्यासाठी वस्ती-वस्तीत फिरावे लागते. याच जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांनी मोठमोठे संशोधक, अधिकारी घडविले आहेत. मात्र, सद्यस्थितीत याचा विसर पालकांसह प्रशासनाला व शिक्षण व्यवस्थेलाही पडला आहे. मुळात सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच उदासीन झाला आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी अधून मधून काहीसे प्रयत्न होताना दिसतात. मात्र, त्या प्रयत्नांना सरकार, प्रशासनाचे पाहिजे तसे पाठबळ मिळत नाही. साधे गणवेशाचेच बघाना. गेल्यावर्षी शाळेचे अर्धे सत्र संपले पण नागपूर महापालिकेच्या शाळेत शिकणाºया सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. मिळाले ते टिकावू नव्हते. यावर्षी शाळा सुरू होताच गणवेश देण्यासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, गणवेश मिळेल तोच दिवस खरा. जिल्हा परिषदेने यापुढे एक पाऊल टाकत गरीब विद्यार्थ्यांची थट्टाच चालविली आहे. इतिहासात पहिल्यांदा गेल्यावर्षी हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. २०१६ पर्यंत गणवेशाचे वाटप हे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून होत होते. शाळा व्यवस्थापन समिती तडजोड करून, सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करीत होती. मात्र, डीबीटीमुळे खाते उघडू न शकल्याने एससी, एसटी व बीपीएलच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही. आता जि.प.च्या शिक्षण विभागाने इतर मागासवर्गीय व खुल्या संवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी योजना आखली. हे पाऊल कौतुकास्पद आहे. मात्र, त्यासाठी बजेटमध्ये फक्त १०० रुपयांची तरतूद केली हे तेवढेच संतापजनक अन् क्लेषदायक आहे. १० हजारावर विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी करण्यात आलेली ही ‘भरीव’ तरतूद सरकारी शाळांमधील शिक्षणाप्रती सरकार किती गंभीर आहे, हे दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे. मुळात अंगावर गणवेश असला म्हणजेच शैक्षणिक दर्जा उंचावतो असे नाही. मात्र, सद्यस्थितीत सरकारी शाळांमध्ये शिकणाºया मुलांच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला तर हे गणवेश गरीब विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मोठा मानसिक आधार देण्याचे काम करतात. परिस्थितीशी झगडणाºया या गुणवंतांचे हे मानसशास्त्रही समजून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Schoolशाळा