शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला निराशा देणारे अधिवेशन

By अतुल कुलकर्णी | Updated: July 23, 2018 05:01 IST

नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे.

नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे. जनतेच्या करातील कोट्यवधी रुपये खर्चून अधिवेशन भरवायचे. त्यातून जनतेला काहीच मिळत नसेल तर तक्रार कुणाकडे करायची? सत्ताधारी भाजपा शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादीच्या पावलावर पाऊल टाकून वागू लागल्याचा समज या अधिवेशनाने पक्का करून टाकला.अधिवेशनाचा पहिला आठवडा पावसात वाहून गेला. दुसऱ्या आठवड्यात विविध प्रश्नांवर गदारोळ करत कामकाज गुंडाळले गेले. तर तिसºया आठवड्यात दिवसा गोंधळ रात्री १ वाजेपर्यंत कामकाज असे चित्र होते. शेवटच्या दिवशी विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्टÑासाठी २२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. हजारो कोटींचे आकडे जाहीर करण्याची सवयच हल्ली नेत्यांना लागली आहे. बजेटमध्ये जाहीर केलेल्या योजना एकत्र करून त्याला पॅकेजचे गोंडस नाव द्यायचे ही पद्धती तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुरू केली. सरकार बदलले तरीही त्यात बदल झालेला नाही. २२ हजार कोटीत जलसंपदा विभागावर साडे तेरा हजार कोटी खर्च होतील, यात किती सिंचन प्रकल्प पूर्ण होतील हे यावेळी सांगितले गेले. मात्र दोन दिवस आधीच ही सगळी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली होती. याचा अर्थ फक्त आठ साडेआठ हजार कोटी तीन विभागावर खर्च होणार. ही रक्कमदेखील अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजनांमधीलच आहे. मग या तीन विभागासाठी पावसाळी अधिवेशनाने वेगळे काय दिले?जे विरोधी पक्ष स्वत:च्या हक्काच्या अंतिम आठवडा प्रस्तावाचे स्वतंत्र अस्तित्व राखू शकत नाहीत ते या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षाही चुकीची आहे. सत्ताधाºयांच्या २९३ च्या आणि विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर एकत्र चर्चा करावी असे सुचवले जाते. दोघांचे विषय वेगळे असताना हे घडते आणि त्यावर विरोधी पक्ष कसलेहीे आक्षेप न घेता मान्यता देत असेल तर दोष सरकारला का द्यायचा? अंतिम आठवडा प्रस्तावाला वेगळे महत्त्व असते. ते महत्त्वच या निमित्ताने पुसले गेले. आजवर असे कधी घडले नव्हते.विरोधकांनी आणलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी त्यांच्या दालनात नाकारले असे सांगूनही त्यावर सभागृहात चर्चा होते, मंत्री त्यावर उत्तरही देतात तर मग अध्यक्षांनी प्रस्ताव नाकारण्याचे महत्त्व कुठे उरते? औचित्याचे मुद्दे किती आमदारांना उपस्थित करू द्यावे आणि आमदारांनी कोणते मुद्दे उपस्थित करावेत या संकेतांचे या अधिवेशनात नेमके काय झाले? विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या दिवशी चर्चेला घेतला आहे त्याच दिवशी ९० आमदार औचित्याचे मुद्दे मांडतात, कुणीही त्यावर आक्षेप घेत नाही, हे सगळे अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारे आहे.- अतुल कुलकर्णी

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMLAआमदार