शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सम्मेद शिखरजी आणि जैन धर्मीयांमधील अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 10:31 IST

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात येईल, अशी भीती जैन बांधवांना वाटते; आणि ही भीती गैरलागू नव्हे!

- संजय सोनवणी(सांस्कृतिक अभ्यासक)

सम्मेद शिखरजी पर्वतरांगेतील पार्श्वनाथ हे सर्वात उंच ठिकाण आहे. छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेला असलेले हे शिखर झारखंड राज्यात मोडते. सम्मेद शिखरजी हे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून, याच पर्वतावर जैनांच्या चोवीस तीर्थंकरांपैकी २० तीर्थंकरांना निर्वाण प्राप्त झाले, अशी मान्यता आहे. यातील तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ फार महत्त्वाचे! या शिखरावर भगवान पार्श्वनाथांसहित सर्व तीर्थंकर व अनेक महान मुनींची प्राचीन मंदिरे आहेत. या ‘शाश्वत तीर्थ’स्थानाला भेट देण्यासाठी जगभरातून जैन धर्मीय आणि जैन तत्त्वज्ञानाबाबत आस्था असलेले भाविक येत असतात. 

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित करणारी अधिसूचना जारी झाल्यानंतर जैन धर्मीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून, नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मुनी सुज्ञयसागरजी यांचे निधन झाले आहे. सम्मेद शिखरजीला  पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात येईल, अशी भीती जैन बांधवांना वाटते. सर्वच पर्यटनस्थळांची सध्याची अनावस्था पाहता ही भीती गैरलागू नाही. अगदी राजपूत व मुघल सत्तांनीही या तीर्थस्थळाला सहकार्यच केले असल्याचे इतिहास सांगतो. पृथ्वीराज चौहान यांच्या  काळात या तीर्थस्थळाचा सर्व करही माफ केला गेला होता. १५९२मध्ये  बादशहा अकबराने एक फर्मान काढून शत्रुंजय (पालीताना), अबू, राजगीर आणि सम्मेद शिखरजी या पवित्र ठिकाणी कोणत्याही प्राण्याच्या हत्येस प्रतिबंध केला. 

शिवाय करमाफीची जुनी योजना तशीच कायम ठेवली. त्यावेळचे प्रसिद्ध जैन जगद्गुरू आचार्य हिरविजय सुरीश्वरजी महाराज यांच्या विनंतीवरून अकबराने हे फर्मान जारी केले होते. १६९८मध्ये जहांगीराचा द्वितीय पुत्र आलमगीरने शिखरजी हे स्थान जैन तीर्थयात्रींसाठी करमुक्त केले होते. परधर्मियांबाबत अनास्था न ठेवता मोगल सत्तेने या तीर्थस्थळाचे जनमानसातील स्थान मान्य करून हे निर्णय घेतले. ब्रिटिश काळात मात्र बंगाल सुभ्याचा सुभेदार नबाब अहमदशहा बहादूरने सम्मेद शिखरजी पर्वतावरील जमीन मुर्शिदाबादच्या जगत शेठ या धनाढ्यास विकली. जगत शेठने पालगंजच्या राजाला एका पत्रान्वये सम्मेद शिखरजी पर्वताचा काळजीवाहक म्हणून नेमले.

ब्रिटिश सरकारने याच पत्राचा आधार घेत पालगंजच्या राजाला या जमिनीचे सर्वाधिकार दिले. राजाने तीर्थस्थानाचा खर्च करावा, पण त्या बदल्यात तीर्थक्षेत्राला मिळणाऱ्या उत्पन्नात त्याला भागीदारीही दिली. राजाने याच अधिकाराचा वापर करत या पर्वतावरच्या जमिनीपैकी दोन हजार एकर जमीन चहाच्या मळ्यासाठी एका इंग्रजाला भाडेपट्ट्याने दिली आणि नव्या मालकाने १८८८ साली तेथे  कत्तलखानाही काढला. पूर्वीच्या सत्तांनी दिलेले परंपरागत मालकी व वहिवाट हक्क तर डावलण्यात आलेच, पण सम्मेद शिखरजीचे पावित्र्यही डागाळले. जैन धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यावेळी पावित्र्याची आणि अहिंसेच्या मूलतत्वाची उद्घोषणा करण्यासाठी उभे ठाकले प्रसिद्ध प्रज्ञावंत व जैन तत्वज्ञ बॅरिस्टर वीरचंद गांधी. त्यांनी खुद्द पालगंजचा राजा आणि एका इंग्रज व्यक्तीविरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात केस दाखल केली. प्राचीन आज्ञापत्रे व फर्माने पुराव्यादाखल पुढे ठेवली. इंग्रज न्यायालयाने ते पुरावे ग्राह्य धरून सम्मेद शिखरजीवरील कत्तलखाना बंद करण्याचा आदेश तर दिलाच, पण तो बेकायदा भाडेपट्टाही रद्द केला. 

तेव्हापासून आतापर्यंत सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा घोषित करेपर्यंत येथील शांतता व पावित्र्य अढळ राहिले. जे तत्व पूर्वीच्या हिंदू, मुघल आणि ब्रिटिश सत्तांनी  पाळले त्याला आता मात्र छेद मिळाला आहे. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, या मागणीकडे कानाडोळा करून या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणे हा या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात आणण्याचा प्रकार आहे, अशी समस्त जैन बांधवांची भावना झाली आहे.त्या भागात राहणाऱ्या बहुसंख्य आदिवासींनाही सरकारचे हे कृत्य मान्य नाही. पार्श्वनाथ यांचे असंख्य अनुयायी गोंड, संथाल या आदिवासी समाजांपैकी होते.  येथे केवळ पर्यटनाच्या हेतूने गर्दी वाढली व पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारने या पर्वताचे मूळचे सौंदर्य डागाळणारी बांधकामे केली तर शांतीच्या शोधात येणाऱ्या भाविकांचे येथे वावरणे कठीण होऊन जाईल. सरकारने पर्यटनस्थळासाठी सम्मेद शिखरजीकडे  नजर वळवावी हे अनाकलनीय आहे, हेच खरे!

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र