शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

उद्रेकाचा अर्थ समजून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:08 IST

विचारमंथन आणि उद्रेक

मिलिंद कुलकर्णीनागरिकत्व संशोधन कायदा व एनआरसी या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांवरुन विचारमंथन आणि उद्रेक सुरु झाला आहे. केंद्र सरकारमधील भाजपने या दोन्ही विषयांसाठी पुढाकार घेतला असल्याने तो या विषयांसाठी समर्थनाची भूमिका घेत आहे. भाजपशी वैचारिक बांधिलकी असलेल्या रा.स्व.संघ, विद्यार्थी परिषद या संघटनांनी या कायद्याच्या समर्थनार्थ प्रचाराची, आंदोलनाची आघाडी उघडली आहे. भाजप वगळून इतर प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी, परिवर्तनवादी, तृणमूल काँग्रेस, मुस्लिम लिग, एमआयएम यांनी या कायद्याला कडाडून विरोध सुरु केला आहे. जेएनयू, दिल्ली व जमिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. समर्थक आणि विरोधक असा दुभंग प्रथमच ठळकपणे समोर आलेला आहे.वैचारिक पातळीवर मोठे मंथन या विषयावर सुरु आहे. समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांमध्ये समर्थन आणि विरोधासाठी मतमतांतरे, युक्तीवाद, इतिहासातील घटनांचा वेध, पुरावे असे तीव्रपणे मांडले जात आहे.असंतोष आणि उद्रेकाने संपूर्ण देश व्यापला आहे. प्रामुख्याने शिक्षणक्षेत्रामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटू लागले आहेत. त्यातून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची आठवण हे आंदोलन करुन देत असल्याची भावना व्यक्त होत आहे.या उद्रेकाचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपची सत्ता केंद्रात दुसऱ्यांदा आली. एकट्या भाजपला मोठे बहुमत मिळाले. यानंतरच्या सहा महिन्यात केंद्र सरकारकडून सामान्य नागरिकांशी संबंधित मुलभूत प्रश्नांविषयी निर्णय घेणे अपेक्षित होते. महागाई, बेरोजगारीमध्ये मोठी वाढ, सहकारी व राष्टÑीकृत बँकांमध्ये घोटाळ्यांमुळे सामान्य ठेवीदारांचा पैसा अडकला, जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन उद्योग- व्यापार क्षेत्रात असंतोष, शहरी व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांविषयी उदासिनता असे प्रश्न गंभीर होत आहेत. त्याविषयी केंद्र सरकारकडून कोणताही ठोस धोरणात्मक निर्णय घेतला जात असल्याचे दिसून येत नाही. मात्र काश्मिरमधील कलम ३७० हटविणे, नागरिकत्व संशोधन कायदा पारित करणे यासंबंधी तत्परता दाखविली गेली. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करणारा निकाल दिल्यानंतर भाजप नेत्यांकडून अमूक महिन्यात मंदिर पूर्ण करु अशी विधाने केली जात आहे.रा.स्व.संघ आणि भाजपची अल्पसंख्याक विरोधी भूमिका आणि लागोपाठ झालेले निर्णय यामुळे अल्पसंख्य समुदायामध्ये असुरक्षितता, असंतोषाचे वातावरण तयार झालेले दिसत आहे. एकीकडे संविधानावर विश्वास असल्याचे सांगत असताना त्यातील धर्मनिरपेक्ष या महत्त्वपूर्ण तत्त्वाकडे कानाडोळा करण्याच्या सरकारच्या कृतीमुळे उद्रेक निर्माण झाला आहे.नागरिक संशोधन कायद्याविषयी गैरसमज पसरविले जात असल्याचे आता सरकार, भाजपचे नेते सांगत आहेत, पण यावर चर्चा, विचारमंथन न होता थेट विधेयक मंजूर झाल्याने असंतोष पसरला आहे. बहुमताने घेतलेला निर्णय मान्य करायलाच हवा, असा जो आग्रह धरला जात आहे, मला वाटते त्यामुळे या उद्रेकात भर पडली आहे. सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा काळ्या दगडावरची रेघ नसते. जनसामान्यांसाठी कायदा बनविला जातो, त्याविषयी नागरिकांचा आक्षेप असेल तर त्यावर फेरविचार केला जातो. असे अनेक निर्णयांविषयी यापूर्वी झालेले आहे, त्यामुळे असा दुराग्रह चुकीचा आहे.जेएनयुमधील फी वाढीमुळे मध्यंतरी झालेले हिंसक आंदोलन, जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात शिरुन पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेली मारहाण, बेरोजगारी यामुळे विद्यार्थी वर्गात असंतोष आहे. त्यात नव्या कायद्याची भर पडल्याने अस्वस्थ असलेल्या शैक्षणिक परिसरात उद्रेक झाला. विद्यार्थी रस्त्यावर आले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला प्रथमच देशव्यापी विरोधाचा सामना करावा लागत आहे. इशान्येकडील राज्यांचा अस्मितेचा मुद्दा आहे. एकंदरीत हे आंदोलन हाताळण्यात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधील त्यांची भाषणे त्याची प्रचिती देत आहेत. या आंदोलनामुळे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची आठवण करुन दिली जात आहे. याच आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याचा परिणाम उलटा होऊन काँग्रेसचे सरकार पायउतार झाले होते. याचा बोध मोदी सरकारने घ्यायला हवा.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव