शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण अधोरेखित... 

By किरण अग्रवाल | Updated: September 23, 2021 11:01 IST

Underlining the universality of crime : महंत नरेंद्र गिरी यांचेच शिष्य महंत आनंद गिरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, अनेकविध चर्चांना आता तोंड फुटले आहे.

- किरण अग्रवाल धार्मिक व अध्यात्माच्या क्षेत्रातील व्यक्तींकडे प्रेरणेचे स्रोत म्हणून आदराने पाहिले जाते; परंतु अशा व्यक्तीबद्दलही जेव्हा अनपेक्षित घटना घडून जातात तेव्हा श्रद्धांना धक्के बसून गेल्याखेरीज राहत नाही. विशेषतः या क्षेत्रातील मान्यवरांनाही गुन्हेगारीचे किटाळ लागुन जाते तेव्हा तर या धक्क्यांची तीव्रता अधिकच बोचल्याखेरीज राहात नाही. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा हरिद्वारमध्ये झालेला संशयास्पद मृत्यूही असाच धक्का देऊन जाणारा म्हणता यावा. 

 साधू संन्याशी संप्रदायाचे नेतृत्व करून त्र्यंबकेश्वर, प्रयागराज, हरिद्वार आदी ठिकाणचे कुंभमेळे यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्र गिरी यांच्या प्रयागराजमधील वाघम्बरी मठात संशयास्पद मृत्यूच्या घटनेने केवळ साधू समाजच नव्हे तर धर्म व अध्यात्मात श्रद्धा ठेवणारा सामान्य भाविकही हादरून गेला आहे. याप्रकरणी महंत नरेंद्र गिरी यांचेच शिष्य महंत आनंद गिरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, अनेकविध चर्चांना आता तोंड फुटले आहे. भाविकांना मनोबल उंचावण्याचा उपदेश देणारे महंत स्वतः आत्महत्या कशी करू शकतात व भलीमोठी सुसाईड नोट कशी लिहू शकतात, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, संशयाचे मळभ दाटून आले आहे. पोलीस तपासात याबद्दलचा काय तो उलगडा यथावकाश होईलच; परंतु या घटनेमुळे सर्वसंगपरित्यागाच्या भूमिकेतून वावरणाऱ्या संन्याशांच्या जीवनाची अखेरही संशयास्पद व वादग्रस्त ठरून गेल्याचे पाहता गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण उघड होऊन जावे.  तसे पाहता गुन्हेगारी सर्वत्रच वाढली आहे. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणाची चर्चा नेहमी घडून येते, तशी ती अध्यात्माच्या क्षेत्रातही वाढीस लागल्याने भाबड्या भक्तांच्या श्रद्धांना धक्का बसणे स्वाभाविक ठरले आहे. खरे तर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम तसेच रामपाल व आसाराम बापू आदी बुवा बापूंना तुरुंगात जावे लागले. तेव्हाही श्रद्धांना मोठ्या प्रमाणात धक्के बसून गेले होते. पूर्वी समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा व्याप्त होती, त्यामुळे समाजमनात श्रद्धेचे स्थान मिळवून असलेल्या काही जणांचे प्रताप उघड होऊनही सार्वत्रिक पातळीवर त्याबद्दलच्या निषेधाचे तितकेसे सूर उमटू शकत नव्हते. समाज जागृत झाल्यावर श्रद्धेआड चालणाऱ्या भोंदूपणाची चिकित्सा होऊ लागल्याने घडल्या वा उघड झालेल्या प्रकारांची चर्चा होऊ लागली. बरे, यात साध्या फसवणुकीपासून जमीन जुमला हडपण्यापर्यंतची व त्याहीपुढे जाऊन काही जणांकडून भक्त भगिनींच्या अब्रूशी खेळण्याचे प्रकारही पुढे आल्याने बुवाबाजी अधोरेखित होऊन गेली. महंत नरेंद्र गिरी बुवाबाजीतले नव्हते, उलट अनाचारी व चुकीच्या मार्गावर असणाऱ्या बुवा बापूंबद्दल त्यांनी वेळोवेळी परखडपणे भूमिका घेतलेली दिसून आली. मुठभर चुकीच्या लोकांमुळे समस्त साधू समाजाची प्रतिमा डागाळते, याबद्दल ते नेहमी खेद व्यक्त करीत. त्यांना जाणून असणारे सारेच त्यांच्या धर्म कार्याबद्दल व सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्व प्रवाहांना एकत्र घेऊन जाण्याच्या सामोपचारी भुमिकांबद्दल भरभरून व आदरानेच बोलताना आढळतात. अशा कुणाशीही कसलाही वैर नसलेल्या महंतांचाही अखेरचा प्रवास संशयास्पद ठरावा हे दुर्दैवी असून, या घटनेमागील कारणांना लाभलेला कथित गुन्हेगारीचा दर्प श्रद्धाळूंना अस्वस्थ करून जाणे स्वाभाविक आहे.