शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

एक अनुत्तरित ‘अभिजात’ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:21 IST

यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होत आहे. तारीखही जवळ आलेली...कालच महामंडळाच्या अध्यक्षांचं पत्र मिळालं... मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या; अन्यथा सरकारच्या विरोधात ठराव आणू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

- नंदकिशोर पाटीलयंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होत आहे. तारीखही जवळ आलेली...कालच महामंडळाच्या अध्यक्षांचं पत्र मिळालं... मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या; अन्यथा सरकारच्या विरोधात ठराव आणू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे...काही करून हा प्रश्न एकदाचा मार्गी लावला पाहिजे. गरज पडली तर दिल्लीत तळ ठोकू, पण संमेलनापूर्वी हे प्रकरण निस्तारून टाकले पाहिजे. बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांना जे जमलं, ते २१ व्या शतकात आपणांस जमू नये? छे!छे!! हे तर खूपच लाजिरवाणं आहे. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळायला नको. हा ‘अभिजात’ प्रश्न आपण सोडवू शकलो नाही, तर विरोधक म्हणतील, फडणवीसांना शिवारातलं काही कळत नाहीच, पण साहित्यातलंही कळू नये? शिवाय, ते दादरकर आणि बांद्रेकर (अरे व्वा, छान टोपणनावं सुचली!) टपूनच बसलेत. कळ लावायला त्यांना मराठीचा हा मुद्दा पुरेसा आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपण जसा नकळत डबाबंद करून टाकला, तसा अभिजात दर्जाचा मुद्दा गायब करता येणार नाही. विचारवंतांची ती मेणबत्ती ब्रिगेड जागी होऊन पुन्हा पुरस्कार वापसी सुरू होईल. तसे झाले तर मोदीजी रागावतील. मागच्या दिल्लीवारीत आपण हा विषय अमितजींपुढे काढला होता. ते तर म्हणाले, ‘मार्इंड युवर लँग्वेज!’अनेकदा असं वाटतं की, हा विषय पंतप्रधानांच्या कानावर घालून बघू या. पण अमितजींचे ते शब्द आठवले की, तोंड उघडण्याचे धाडस होत नाही. खरं म्हणजे, भाषा व्यवहार मंत्र्यांनी यात लक्ष घालून पाठपुरावा करायला हवा. पण प्रत्येक गोष्टीचा ते ‘विनोद’ करून टाकतात! आधीच शिक्षणाची पुरती शाळा झालेली. किमान मराठीचं तरी हसू व्हावयास नको. परवाच्या कॅबिनेटमध्ये हा विषय आणला. पण चंदूदादांनी तिकडे जाऊन कानडीचे गोडवे गायले! तोंड उघडायला जागा उरली नाही. परवा एका शाळेत ते ‘टिमक्याची चोळी बाई...’ हे गीत गाऊन आले म्हणे!! एकेक निस्तारता निस्तारता इकडे माझ्या घशाला कोरड पडली आहे अन् दादांना गाणी सुचताहेत! बरं गायचंच होतं तर किमानज्ञानेश्वरांच्या शब्दात‘माझा मराठाचि बोलू कौतुके।परि अमृताते पैजा जिंके ।हे तरी गायला हवे. त्यावर दादांचं म्हणणं असं की, ‘मराठाचि’ की ‘मराठीचि’ यावरून विद्वानांमध्ये मतभेद आहेत. जर ज्ञानेश्वरीवर आपलं एकमत नसेल, तर मग मराठीला अभिजात दर्जा कसा मिळणार? असो.बारामतीकरही कविता करतात, ही बातमी वाचून मी अभिनंदनासाठी पवारसाहेबांना फोन लावला. तर ते म्हणाले, ‘मराठीसाठी तुम्ही दिल्लीला शिष्टमंडळ पाठवणार असाल तर मी नेतृत्व करायला तयार आहे. पण एका अटीवर.’ मी विचारलं, ‘कसली अट?’ तर ते म्हणाले, शिष्टमंडळात पाडगावकर, करंदीकर, जवळकर, या आडनावाच्या साहित्यिकांसोबत महानोर, नेमाडे, बोराडे, कºहाडे, मोरे, सावंत आदी देशीवादी साहित्यिकांचाही समावेश करा. उगीच अभिजन-बहुजन वाद नको. मला प्रश्न पडला. मग विदर्भातील एलकुंचवारांचं काय करायचं? त्यांची नाटकं तर बहुजनी वास्तव मांडणाºया अभिजनी कलाकृती आहेत नं भाऊ!!