शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत

By सुधीर लंके | Published: April 30, 2018 1:48 AM

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़ राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नगर दौऱ्यात केली. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर शेजारी बसले असताना त्यांच्यासमोरच राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे वाभाडे ठाकरे यांनी काढले.सरकार निकम्मे आहे म्हणजे उद्धवजींची सरकारमध्ये सहभागी असलेली सेनाही निकम्मी आहे, असा अर्थ निघतो. कायदा सुव्यवस्था ढासळली असेल तर त्यास केसरकरही जबाबदार ठरतात. केसरकर यांनी नगरची घटना मंत्री म्हणून हाताळण्यापेक्षा पक्ष प्रवर्तक म्हणून हाताळली आहे. पोलिसांना त्यांनी नि:पक्षपाणीपणे काम करु दिलेले दिसत नाही. पोलीसही मंत्र्यांच्या दबावाला बळी पडलेले दिसतात. खरेतर शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तातडीने सूत्रे हलवली. राष्टÑवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केली. आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले गेले. या सर्वांचा हत्याकांडात कसा सहभाग आहे, याचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. पण, तरीही पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल केले.पोलीस अधीक्षक कार्यालयावर जगताप समर्थकांनी हल्ला केला म्हणून भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक करण्यात आली. यातून जरब निर्माण झाली. कारण, हत्याकांडाइतकाच हा गुन्हा गंभीर आहे. पण, ही एक बाजू झाली. जी राज्याला ठळकपणे दिसली.दुसरी बाजू असे सांगते की, हत्याकांडानंतर शिवसेनेनेही केडगाव येथे धुडगूस घातला. तेथे दगडफेक झाली. स्थानिक नागरिकांना, गोळीबारातील जखमी पोलिसांना वेठीला धरले गेले. पोलीस, पत्रकार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. याबाबत गुन्हाही दाखल झाला. सेना नेते अनिल राठोड यांची चिथावणीखोर भाषा असलेले ‘व्हिडीओ’ व्हायरल झाले. या प्रकाराबाबत मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. शिवसैनिकांनी गुन्हा केला असेल तर त्याचे पुरावे द्या, असे केसरकर पत्रकारांना म्हणाले. वास्तविकत: पोलिसांसमक्ष हा प्रकार घडला. पोलीसच फिर्यादी आहेत. असे असताना गृहराज्यमंत्री पत्रकारांना पुरावे मागताहेत. एकाच प्रकरणात सरकार कसे पक्षपाती वागते याचा हा नमुना आहे. त्यामुळे उद्ववजी म्हणतात ते खरे आहेच. सरकार निकम्मेच आहे.नगरमध्ये कोतकर, जगताप, कर्डिले या परिवारांनी सामूहिकपणे नात्यागोत्याचे राजकारण केले. त्यांची दहशतही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनातून या ना त्या प्रकारे दिसते. पण, सेनेनेही या शहरात सतत भावनांचे, भडकाविण्याचे व आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारणच केले. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या परिवाराला ठाकरे यांनी स्वत: भेट दिली. या घटनेनंतर अटकेत असलेल्या राष्टÑवादीच्या कैलास गिरवले या नगरसेवकाचा मृत्यू झाला. तिकडे ठाकरे गेले नाहीत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे गिरवले परिवाराकडे गेले पण, केडगावात फिरकले नाहीत. ज्याने त्याने आपापले पाहिले. या जिल्ह्यात ‘प्रशासन’ आणि राजकीय संस्कृती अशी संपली आहे.दरम्यान शनिवारी पुन्हा राष्टÑवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येने नगर ढवळून निघाले. यातून कोणते राजकारण बाहेर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.- सुधीर लंके