शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

अडीच माणसांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:09 IST

सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. हे टीकाकार कोण आहेत?

सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. हे टीकाकार कोण आहेत? डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम् आणि राहुल गांधी. झालेच तर भाजपचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचेच माजी मंत्री अरुण शौरी आणि आता खुद्द रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. ही सारीच माणसे मोदींविषयीचे शल्य मनात घेऊन आहेत आणि त्यामुळे मोदींना जे दिसते ते या बिचाºयांना दिसत नाही हा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर खालावून ५.७ टक्क्यावर आला आहे, हे मनमोहनसिंगांनी सांगितले नाही की मोहन भागवतांनी म्हटले नाही. तो स्टेट बँकेच्या अहवालाच्या आधारे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेला आकडा आहे. या दोन्ही बँका मोदींचे ज्येष्ठ प्रचारक अरुण जेटली यांच्या नियंत्रणात आहेत. चलनबदलाचा सरकारचा निर्णय देशाला रस्त्यावर आणणारा आणि त्याला पार कॅशलेस करणारा ठरला. शिवाय त्यातून काळा म्हणतात तो पैसा जराही बाहेर आला नाही हे सगळ्या बँकांसह अर्थ मंत्रालयानेही जाहीर केले. या प्रकाराने सरकारलाच २६ हजार कोटींचा फटका बसला हे चिदंबरम किंवा अरुण शौरींनी सांगितले नाही, ते मोदींच्याच सरकारने सांगितले आहे. रोजगारात वाढ झाली नाही, ४०० हून अधिक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि तेवढ्याच आणखी त्यांची दिवाळखोरी जाहीर करायला सिद्ध आहेत हे सरकारच्याच आर्थिक अन्वेषण विभागाने सांगितले आहे. ते राहुल गांधींनी वा यशवंत सिन्हांनी सांगितले नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून सरकारने जनतेची लूट केली हे लोक म्हणतात, विरोधी पक्ष सांगत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २०० टक्क्यांनी वाढल्या हे सामान्य ग्राहक अनुभवतात, ते विरोधकांना म्हणावे लागत नाही. मोदींनी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचीही एक मोठी आकडेवारी दिली आहे. मात्र मनमोहनसिंग ते मोहन भागवत हेही काही कमी आकडेबहाद्दर नाहीत. मग मोदी म्हणतात ते शल्य कुणाच्या मनात आहे? अलीकडे त्यांच्या प्रशंसकांची संख्या कमी झाली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या आरत्या संपल्या आहेत. राहुल गांधींना दिल्या जाणाºया शिव्या थांबल्या आहेत आणि एक जेटली सोडले तर दुसरे कोणी मोदींचे समर्थन करताना दिसत नाहीत. त्यांनी ज्यांना बढती दिली ते नाहीत, ज्यांना खाली ढकलले ते नाहीत आणि दूर ठेवले तेही नाहीत. झालेच तर अडवाणी रिकामे आहेत, मुरली मनोहरांना काही काम नाही. त्यांनी तरी मोदींची पाठराखण करायची. पण तेही ती करताना दिसत नाहीत. परिणामी मोदी आणि जेटली यांनाच सरकारचे समर्थन करावे लागत आहे. अरुण शौरींनी त्याचमुळे हे अडीच माणसांचे सरकार असल्याचे परवा म्हटले. शौरी सभ्य आहेत त्यामुळे त्यांचा निर्देश असलेली दोन सगळी माणसे साºयांना समजली. मात्र तो अर्धा कोण, हे त्यांनी सांगायचे त्यांच्या अंगभूत सुसंस्कृतपणामुळे टाळले. सारांश, मी एकटा बोलतो, जेटली बोलतात आणि बाकीचे नुसतीच टीका करतात. ती करणाºयांत आमचीही माणसे असतात आणि आमच्यातले अनेकजण हे सारे ऐकून गप्प राहतात हे मोदींचे खरे शल्य आहे. वास्तव हे की सरकार एकट्या मोदींचे आहे. जेटली हे त्यांचे तुणतुणे आहे आणि तो अर्धा अजून अज्ञात आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावरून मोदी सारी उणीव स्वत:च भरून काढताना दिसत आहेत. भाजप व संघ यातील मोदीभक्तांना त्यामुळे आमची विनंती ही की, पुन्हा एकवार त्यांचे ढोल वाजवा, ते खोटे असले तरी चालतील. त्यांनी देशाला भूल घातली नाही तरी चालेल मात्र त्यामुळे मोदींचे शल्य दूर होईल हे नक्की.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा