शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अडीच माणसांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:09 IST

सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. हे टीकाकार कोण आहेत?

सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. हे टीकाकार कोण आहेत? डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम् आणि राहुल गांधी. झालेच तर भाजपचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचेच माजी मंत्री अरुण शौरी आणि आता खुद्द रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. ही सारीच माणसे मोदींविषयीचे शल्य मनात घेऊन आहेत आणि त्यामुळे मोदींना जे दिसते ते या बिचाºयांना दिसत नाही हा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर खालावून ५.७ टक्क्यावर आला आहे, हे मनमोहनसिंगांनी सांगितले नाही की मोहन भागवतांनी म्हटले नाही. तो स्टेट बँकेच्या अहवालाच्या आधारे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेला आकडा आहे. या दोन्ही बँका मोदींचे ज्येष्ठ प्रचारक अरुण जेटली यांच्या नियंत्रणात आहेत. चलनबदलाचा सरकारचा निर्णय देशाला रस्त्यावर आणणारा आणि त्याला पार कॅशलेस करणारा ठरला. शिवाय त्यातून काळा म्हणतात तो पैसा जराही बाहेर आला नाही हे सगळ्या बँकांसह अर्थ मंत्रालयानेही जाहीर केले. या प्रकाराने सरकारलाच २६ हजार कोटींचा फटका बसला हे चिदंबरम किंवा अरुण शौरींनी सांगितले नाही, ते मोदींच्याच सरकारने सांगितले आहे. रोजगारात वाढ झाली नाही, ४०० हून अधिक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि तेवढ्याच आणखी त्यांची दिवाळखोरी जाहीर करायला सिद्ध आहेत हे सरकारच्याच आर्थिक अन्वेषण विभागाने सांगितले आहे. ते राहुल गांधींनी वा यशवंत सिन्हांनी सांगितले नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून सरकारने जनतेची लूट केली हे लोक म्हणतात, विरोधी पक्ष सांगत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २०० टक्क्यांनी वाढल्या हे सामान्य ग्राहक अनुभवतात, ते विरोधकांना म्हणावे लागत नाही. मोदींनी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचीही एक मोठी आकडेवारी दिली आहे. मात्र मनमोहनसिंग ते मोहन भागवत हेही काही कमी आकडेबहाद्दर नाहीत. मग मोदी म्हणतात ते शल्य कुणाच्या मनात आहे? अलीकडे त्यांच्या प्रशंसकांची संख्या कमी झाली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या आरत्या संपल्या आहेत. राहुल गांधींना दिल्या जाणाºया शिव्या थांबल्या आहेत आणि एक जेटली सोडले तर दुसरे कोणी मोदींचे समर्थन करताना दिसत नाहीत. त्यांनी ज्यांना बढती दिली ते नाहीत, ज्यांना खाली ढकलले ते नाहीत आणि दूर ठेवले तेही नाहीत. झालेच तर अडवाणी रिकामे आहेत, मुरली मनोहरांना काही काम नाही. त्यांनी तरी मोदींची पाठराखण करायची. पण तेही ती करताना दिसत नाहीत. परिणामी मोदी आणि जेटली यांनाच सरकारचे समर्थन करावे लागत आहे. अरुण शौरींनी त्याचमुळे हे अडीच माणसांचे सरकार असल्याचे परवा म्हटले. शौरी सभ्य आहेत त्यामुळे त्यांचा निर्देश असलेली दोन सगळी माणसे साºयांना समजली. मात्र तो अर्धा कोण, हे त्यांनी सांगायचे त्यांच्या अंगभूत सुसंस्कृतपणामुळे टाळले. सारांश, मी एकटा बोलतो, जेटली बोलतात आणि बाकीचे नुसतीच टीका करतात. ती करणाºयांत आमचीही माणसे असतात आणि आमच्यातले अनेकजण हे सारे ऐकून गप्प राहतात हे मोदींचे खरे शल्य आहे. वास्तव हे की सरकार एकट्या मोदींचे आहे. जेटली हे त्यांचे तुणतुणे आहे आणि तो अर्धा अजून अज्ञात आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावरून मोदी सारी उणीव स्वत:च भरून काढताना दिसत आहेत. भाजप व संघ यातील मोदीभक्तांना त्यामुळे आमची विनंती ही की, पुन्हा एकवार त्यांचे ढोल वाजवा, ते खोटे असले तरी चालतील. त्यांनी देशाला भूल घातली नाही तरी चालेल मात्र त्यामुळे मोदींचे शल्य दूर होईल हे नक्की.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा