शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
2
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
3
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
4
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
5
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
6
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
7
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
8
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
9
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
10
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
11
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
12
या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 
13
तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी
14
Usha Nadkarni : ऑफिसमध्ये भावाला मारल्याचं समजताच उषा नाडकर्णींची सटकली, त्याला पकडलं अन्...
15
Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य!
16
इंधनावरील दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विम्यात फरक काय असतो? एकदा दोन्हींचे फायदे पहाच...
17
Water Taxi: वेळही वाचणार, प्रवासही सुखकर; मुंबईत सुरू होतेय वॉटर टॅक्सी, अवघ्या ४० मिनिटांत नवी मुंबई गाठा!
18
'रामायण'मधील शूर्पणखा आठवतेय का? रावणाची बहीण बनण्यासाठी मिळालेलं फक्त इतकं मानधन
19
“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे
20
IPL Final ची ओढ! विराटची साथ सोडल्याची चर्चा रंगली, पण तो दिवस उगवायच्या आत RCB च्या ताफ्यात

दोन अपत्य धोरण?

By admin | Updated: April 23, 2016 03:28 IST

देशात सरसकट सर्वच दाम्पत्यांसाठी दोन अपत्यांचे बंधन घालणारा कायदा करण्याची गरज, फटकळपणासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंह यांनी प्रतिपादित केली

देशात सरसकट सर्वच दाम्पत्यांसाठी दोन अपत्यांचे बंधन घालणारा कायदा करण्याची गरज, फटकळपणासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंह यांनी प्रतिपादित केली असून हा कायदा सर्व धर्मांच्या लोकाना लागू असावा, अशीही त्यांची अपेक्षा आहे. दोन अपत्यांचे बंधन घातले नाही, तर देशात मुला-मुलींचे प्रमाण व्यस्त होऊन, मुली सुरक्षित राहणार नाहीत, असे कारणही त्यांनी दिले. अर्थात त्यांनी पुढे बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या संख्येपेक्षा वेगाने वाढत असल्याची पुस्ती जोडताक्षणी त्यांना खरी चिंता कशाची लागली आहे, हे स्पष्ट झालेच! गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यामागचे कारण काहीही असले तरी, त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्याला तोंड फोडले आहे, हे निश्चित! लोकसंख्या नियंत्रणासाठी अपत्य संख्येवर बंदी घालण्याची मागणी पहिल्यांदाच होत आहे, अशातला अजिबात भाग नाही. चीनने तर तब्बल ३५ वर्षे एक दाम्पत्य-एक अपत्य धोरण राबविले. गेल्याच वर्षी, लोकसंख्येतील स्त्री-पुरुषांचे व्यस्त प्रमाण आणि वृद्धांची मोठी संख्या, ही कारणे पुढे करीत, त्या देशाने दोन अपत्यांचे धोरण स्वीकारले. चीनचा अनुभव विचारात घेतल्यास असे दिसते, की अपत्यांच्या संख्येवर मर्यादा घातल्यास स्त्री व पुरुषांचे प्रमाण व्यस्त होते. गिरीराज सिंह जे सांगत आहेत, त्याच्या हे अगदी उलट आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत असलेला ताण हलका करण्यासाठी भारतानेही चीनचा कित्ता गिरवायला हवा, अशी मागणी यापूर्वीही झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडतो, हे खरे असले तरी, अपत्य संख्येवर निर्बंध घालणे, हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही. विकसित देशांमध्ये असे कोणतेही बंधन नसतानाही, त्या देशांमधील दाम्पत्यांनी अपत्यांची संख्या मर्यादित ठेवल्याचे दुष्परिणाम ते देश आज भोगत आहेत. त्या देशांमध्ये लोकसंख्येत वृद्धांचा वाटा प्रमाणाबाहेर वाढला असून, नवनिर्माण किंवा सृजन करण्यास सक्षम युवा वर्गाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परिणामी, त्या देशांचा विकासाचा वेग जवळपास थांबल्यात जमा आहे. भारताच्या विकासाच्या साऱ्या आशा तंत्रज्ञान विकासावर केंद्रित झाल्या आहेत. युवा वर्गच नसेल, तर तंत्रज्ञानाचा विकास कोण करणार? भारताने आज एक दाम्पत्य-दोन अपत्य धोरण स्वीकारल्यास, आजपासून काही वर्षांनी भारताला युवांच्या अल्प प्रमाणाची समस्या निश्चितपणे भेडसावणार आहे. वरवर बघता असे धोरण कितीही आकर्षक वाटत असले, तरी दीर्घकालीन विचार करता ते स्वीकारणे नक्कीच लाभदायक ठरणार नाही. अर्थात याचा अर्थ लोकसंख्या अनिर्बंध वाढू द्यावी, असाही होत नाही; परंतु जसजसा देशाचा विकास होऊन आर्थिक समृद्धी वाढेल, शिक्षणाचे प्रमाण वाढेल, तसतसा लोकसंख्या वृद्धीचा दर आपोआप स्थिरावू लागेल. त्यासाठी गिरीराज सिंह यांची अजिबात गरज नाही!