शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दोन अपत्य धोरण?

By admin | Updated: April 23, 2016 03:28 IST

देशात सरसकट सर्वच दाम्पत्यांसाठी दोन अपत्यांचे बंधन घालणारा कायदा करण्याची गरज, फटकळपणासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंह यांनी प्रतिपादित केली

देशात सरसकट सर्वच दाम्पत्यांसाठी दोन अपत्यांचे बंधन घालणारा कायदा करण्याची गरज, फटकळपणासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंह यांनी प्रतिपादित केली असून हा कायदा सर्व धर्मांच्या लोकाना लागू असावा, अशीही त्यांची अपेक्षा आहे. दोन अपत्यांचे बंधन घातले नाही, तर देशात मुला-मुलींचे प्रमाण व्यस्त होऊन, मुली सुरक्षित राहणार नाहीत, असे कारणही त्यांनी दिले. अर्थात त्यांनी पुढे बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या संख्येपेक्षा वेगाने वाढत असल्याची पुस्ती जोडताक्षणी त्यांना खरी चिंता कशाची लागली आहे, हे स्पष्ट झालेच! गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यामागचे कारण काहीही असले तरी, त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्याला तोंड फोडले आहे, हे निश्चित! लोकसंख्या नियंत्रणासाठी अपत्य संख्येवर बंदी घालण्याची मागणी पहिल्यांदाच होत आहे, अशातला अजिबात भाग नाही. चीनने तर तब्बल ३५ वर्षे एक दाम्पत्य-एक अपत्य धोरण राबविले. गेल्याच वर्षी, लोकसंख्येतील स्त्री-पुरुषांचे व्यस्त प्रमाण आणि वृद्धांची मोठी संख्या, ही कारणे पुढे करीत, त्या देशाने दोन अपत्यांचे धोरण स्वीकारले. चीनचा अनुभव विचारात घेतल्यास असे दिसते, की अपत्यांच्या संख्येवर मर्यादा घातल्यास स्त्री व पुरुषांचे प्रमाण व्यस्त होते. गिरीराज सिंह जे सांगत आहेत, त्याच्या हे अगदी उलट आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत असलेला ताण हलका करण्यासाठी भारतानेही चीनचा कित्ता गिरवायला हवा, अशी मागणी यापूर्वीही झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडतो, हे खरे असले तरी, अपत्य संख्येवर निर्बंध घालणे, हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही. विकसित देशांमध्ये असे कोणतेही बंधन नसतानाही, त्या देशांमधील दाम्पत्यांनी अपत्यांची संख्या मर्यादित ठेवल्याचे दुष्परिणाम ते देश आज भोगत आहेत. त्या देशांमध्ये लोकसंख्येत वृद्धांचा वाटा प्रमाणाबाहेर वाढला असून, नवनिर्माण किंवा सृजन करण्यास सक्षम युवा वर्गाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परिणामी, त्या देशांचा विकासाचा वेग जवळपास थांबल्यात जमा आहे. भारताच्या विकासाच्या साऱ्या आशा तंत्रज्ञान विकासावर केंद्रित झाल्या आहेत. युवा वर्गच नसेल, तर तंत्रज्ञानाचा विकास कोण करणार? भारताने आज एक दाम्पत्य-दोन अपत्य धोरण स्वीकारल्यास, आजपासून काही वर्षांनी भारताला युवांच्या अल्प प्रमाणाची समस्या निश्चितपणे भेडसावणार आहे. वरवर बघता असे धोरण कितीही आकर्षक वाटत असले, तरी दीर्घकालीन विचार करता ते स्वीकारणे नक्कीच लाभदायक ठरणार नाही. अर्थात याचा अर्थ लोकसंख्या अनिर्बंध वाढू द्यावी, असाही होत नाही; परंतु जसजसा देशाचा विकास होऊन आर्थिक समृद्धी वाढेल, शिक्षणाचे प्रमाण वाढेल, तसतसा लोकसंख्या वृद्धीचा दर आपोआप स्थिरावू लागेल. त्यासाठी गिरीराज सिंह यांची अजिबात गरज नाही!