शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

'राष्ट्रवादी'चं विसावं वरीस धोक्याचं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 08:26 IST

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे.

- नंदकिशोर पाटील शरद पवारांचाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे. या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या शुभेच्छा! साधारणपणे माणसाच्या आयुष्यात वयाच्या दहा ते वीस वर्षांपर्यंत कालखंड हा संक्रमणाचा काळ मानला जातो. कारण याच वयात मुलाची शारीरिक, मानसिक वाढ होऊन शहाणपण आलेलं असतं. आयुष्यात आपणांस कुठं जायचंय, काय मिळवाचंय, याचा निर्णय देखील याच टप्प्यावर घ्यावा लागतो. या वयाला ' पौगंडावस्था' असंही म्हणतात.राष्ट्रवादीची सध्याची अवस्था आणि आजवरच्या वाटचालीवर नजर टाकली तर दिसते ते एवढेच की, स्थापनादिनी (10 जून 1999) या पक्षाच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं झाली होती. आणि आजही तेवढीच आहेत ! सांगायचं तात्पर्य काय, तर हा पक्ष 20 वर्षांनंतरही आहे तिथेच आहे. धड ना वृद्धी, ना घट. या अवस्थेला मुडदूस अवस्था म्हणतात. हे असं का झालं? शरद पवार यांच्यासारखा चाणाक्ष, धूर्त, अत्यंत  महत्त्वाकांक्षी आणि हवेची दिशा अचूक ओळखणारा जाणता नेता, सोबत जिल्ह्या-जिल्ह्यातील मातब्बर सुभेदार, त्यांनी उभारलेलं संस्थात्मक जाळं , त्यावर पोसलेले कार्यकर्ते एवढं सगळं असताना राष्ट्रवादी का वाढली नाही? पवारांच्याच शब्दांत सांगायचं तर 'भाकरी न फिरवल्यामुळं'!राजकारण प्रवाही असतं. ते विशिष्ट व्यक्ती अथवा घराण्यात अडकून राहिले तर त्याचं डबकं होतं. पवारांच्या राष्ट्रवादीचं असंच डबकं झालंय का? पवार, मोहिते, भोसले, क्षीरसागर, पाटील, देशमुख, भुजबळ, सोळंके, टोपे, नाईक, निंबाळकर आणि तटकरे अशा बारा घरांचा हा पक्ष. (आडनावं वानगीदाखल. बरोबर असतील तर निव्वळ योगायोग !) पंचायत समिती,  जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असो की साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती असो. सगळं काही या घराण्यात. सतरंजी उचलणारे थकून भागून शेवटी शिवसेना- भाजपाच्या आश्रयाला गेले. कार्यकर्त्यांनी सतरंजी झटकली तसे हे सुभेदार उघडं पडले. शरद पवार यांचं आजवर सगळं राजकारण ऊस आणि साखर कारखानदारीभोवती फिरत आलं आहे. पवारांनी नेहमीच धनिक बागायतदारांची बाजू घेतली. ऊस, द्राक्षे आणि डाळिंबासाठी पवारांनी जेवढे प्रयत्न केले तेवढा ओलावा त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांबद्दल दाखवला नाही, ही वस्तुस्थिती त्यांचे समर्थकही मान्य करतील. 

जागतिक बाजारपेठेमुळे गेल्या दहा वर्षांत साखर कारखानदारी अडचणीत आली. पण त्या अगोदर 2004 ते 2009 या पाच वर्षांत सत्तेच्या बळावर सहकारी साखर कारखाने कुणी मोडीत काढले? तोट्यात चालणारे हेच कारखाने खासगी मालकीचे होताच नफ्यात कसे आले? साखर कारखान्यांचे जे झाले तेच दूध संघाचे. सरकारी आणि सहकारी दूध संकलन यंत्रणा मोडीत काढून ती स्वतःच्या मालकीची कुणी केली? या व्यवहारात नेते मातब्बर झाले, पण सहकार संपला आणि पवारांच्या राजकारणाला घरघर लागली.राजकीय पक्षाकडे किमान काही ध्येय, धोरण असावे लागते. कालानुरूप त्यात बदल होऊ शकतो, पण मुळात काहीतरी 'असावं' लागतं. या निकषांवर राष्ट्रवादीकडे काय आहे? सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले ( वस्तुतः हकालपट्टी ) शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा या तीन महत्त्वाकांक्षी नेत्यांनी एकत्र येऊन 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. 1999ची विधानसभा लढविली आणि निकालानंतर सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन केले! पवारांना दहा वर्षं राज्य आणि केंद्रात सत्ता मिळाली खरी, पण ती देखील काँग्रेसच्या आश्रयाला जाऊन. जिथे पर्याय म्हणून उभं राहायला हवं होतं तिथंच ते परावलंबी बनले!
शरद पवार यांच्या राजकारणाला धरसोडीचा शाप आहे. त्यांच्याविषयी कुणालाच खात्री बाळगता येत नाही. आज भलेही ते भाषणात शाहू, फुले, आंबेडकर या थोरांची नावं घेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातीयवादी ठरवत असतील, 1978च्या पुलोद सरकारमध्ये जनसंघाला त्यांनीच सत्तेत सहभागी करून घेतले होते. आजही काही जिल्हा परिषदेत ते भाजपासोबत आहेतच की! आज देशाला/ राज्याला सक्षम अशा पर्यायी राजकीय पक्षाची, नेत्याची गरज आहे. वयोमानानुसार पवारांच्यावर अनेक मर्यादा आहेत. पक्षाची आज दशकपूर्ती साजरी करताना काळाची पावलं वेळीच ओळखून एक तर हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अथवा अपेक्षित/ वंचित घटकातील तरुणांच्या हाती पक्षाची धुरा सुपूर्द करून आपण मार्गदर्शक व्हावे, एवढाच फुकटचा ( न मागता दिलेला ) सल्ला! पुनःश्च एकदा शुभेच्छा!!( कार्यकारी संपादक, लोकमत )

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस