शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

दानवे-खोतकरांच्या जोर-बैठका अन सत्तारांची गांधीटोपी 

By सुधीर महाजन | Published: February 08, 2019 12:17 PM

खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी डोईवरचे केस न वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली.

- सुधीर महाजन

आपल्या जिल्ह्यातील राज्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतात. त्यांनी पारध ते धामणगाव या रस्त्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान खासदार रावसाहेब दानवेंनी देताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर कामाला लागले. काम सुरू करण्यापूर्वी दानवेपुत्र आमदार संतोष यांनी रात्रीच घाईघाईत कामाचे उद्घाटन करून प्रारंभ केला. दानवे-खोतकर यांच्या राजकीय वैमनस्याचे हे ताजे उदाहरण; पण यामुळे का होईना, हा रस्ता चांगला झाला. जालन्याच्या राजकीय आखाड्यात सध्या हे दोघे भिडले आहेत. खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी डोईवरचे केस न वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली. गेल्या दीड वर्षापासून या निमित्ताने का होईना गांधी टोपीचे दर्शन होते.

खोतकर गेल्या काही दिवसांपासून दानवेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी करताना दिसतात. परवा तर मुख्यमंत्र्यांनी दोघांच्या भांडणात जाहीर शिष्टाईचा प्रयत्न केला; परंतु खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत. माघार घेतली तर ती राजकीय आत्महत्या ठरेल असे ते म्हणतात आणि आता तर दोघेही इरेला पेटले असल्याने शह-काटशहाच्या राजकारणाने जोर धरला आहे. मराठवाडा पॅकेजअंतर्गत पालकमंत्री या नात्याने खोतकरांनी ‘वैयक्तिक गाय वाटप योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला. ५० टक्के अनुदानावर गायीचे वाटप करण्याचे नियोजन केले. तसा हा पथदर्शी प्रकल्प होता; पण दानवेंनी त्यात खोडा घातला आणि ही योजना बासनात गेली. ही निवडणूक खोतकरांसाठी राजकीय अस्तित्वाची आहे. गेल्या वेळी ते २८६ इतक्या अल्पमतांनी विजयी झाले होते आणि गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांनी जो दानवेंच्या विरोधात उघड पवित्रा घेतला, तो पाहता ते म्हणतात त्याप्रमाणे आता माघार घेणे ही राजकीय आत्महत्या ठरू शकते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांच्या उमेदवारीसाठी पायघड्या टाकतील, अशी स्थिती आहे.

या राजकीय संघर्षाला २०१६ ची जिल्हा परिषद निवडणूक कारणीभूत आहे. भाजपचे २२ उमेदवार निवडून आले असताना खोतकरांनी शिवसेना-काँग्रेस अशी युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यांची ही खेळी दानवेंच्या जिव्हारी लागली. कारण त्यांची कन्या आशा मुकेश पांडे या जि.प. अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार होत्या. त्यामुळे हे अपयश त्यांनी वैयक्तिक घेतले. पुढे बाजार समितीतही त्यांनी भाजपला फारसे स्थान दिले नाही.

दुसरीकडे दानवेंनी जिल्हा व जालना शहरात विविध योजना  आणून खोतकरांना शह देण्याचा प्रयत्न केला जिल्हाभर रस्त्याची कामे हाती घेतली. ड्राय पोर्ट, रसायन संस्थासारखे महत्त्वाचे प्रकल्प आणले. कामाचा झपाटा दाखवून दिला. राजकारणाचा विचार केला, तर भोकरदन, बदनापूर या तालुक्यांवर त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. तरी भोकरदनमध्ये कुठेतरी सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराजी  दिसते. त्यांच्या मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ येतो. आजवर त्यांचे व अब्दुल सत्तार यांचे ‘आतून’ साटेलोटे होते. दोघेही एकमेकांना रसद पुरवत असत; पण अचानक काय बिघडले याची वाच्यता झालेली नाही; पण आज दोघेही एकमेकांच्या विरोधात दिसतात. सत्तार यांनी ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली आहे; पण या दोघांच्या भांडणावर सामान्य माणसाचा विश्वास नाही. वेळेवर दोघे हातमिळवणी करतील, असे त्यांना वाटते.  मुख्यमंत्र्यांनी परवा दोघांनाही जाहीरपणे समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्या किती मनावर घेतल्या जातील, याचा लवकरच उलगडा होईल. घोडा-मैदान जवळच आहे. दोघे खरेच एकमेकांना भिडतात की, नुसते शड्डू ठोकत मतदारांचे मनोरंजन करतात, हे कळेलच.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारJalanaजालना