शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

‘जय महाराष्टÑ’ नाऱ्याने सूर जुळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:17 IST

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन भिन्न विचाराच्या पक्षांचे संयुक्त सरकार महाराष्टÑात स्थापन झाले आहे.

मिलिंद कुलकर्णीउध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन भिन्न विचाराच्या पक्षांचे संयुक्त सरकार महाराष्टÑात स्थापन झाले आहे. शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्ष हे राष्टÑीय पक्ष असले आणि अशा दर्जासाठी आवश्यक निकष पूर्ण करीत असले तरीही या दोन्ही पक्षांचे संपूर्ण लक्ष्य आणि प्रभावक्षेत्र हे महाराष्ट्र हेच राहिले आहे. काँग्रेसचे मात्र तसे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला, स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलेला आणि दीर्घकाळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष सर्वात जुना राजकीय पक्ष आहे.शिवसेना ही संघटना म्हणून उदयास आली आणि राजकीय पक्ष असे त्याचे पुढे स्वरुप झाले. भारतीय राजकारणात एखाद्या संघटना आणि पक्षाच्या आयुष्यात इतकी वळणे बहुदा आली नसावी, जेवढी शिवसेनेच्या वाटचालीत आली. राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही संघटना शतकाकडे वाटचाल करीत आहे. एकचालकानुवर्ती असे तिचे स्वरुप आहे. पण ही संघटना प्रत्यक्षात राजकारणात आली नाही. संघाच्या मंडळींनीच पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप स्थापन केला. सेनेने मुंबई हे प्रभावक्षेत्र मानून कार्याला सुरुवात केली. कामगार चळवळीत साम्यवादी नेते आणि संघटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्या काळात काँग्रेस सरकार आणि नेत्यांनी सेनेला मदत केल्याचे म्हटले जाते. वैचारिक वळणेदेखील झाली. दक्षिण, उत्तर भारतीयांना विरोध, मराठी बाणा, हिंदुत्व अशा भूमिका सेनेने घेतल्या. हिंदुत्व या समान धाग्यावर भाजपशी ३० वर्षे युती केली. लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा तर विधानसभा निवडणुकीत सेनेला अधिक जागा असे समीकरण असायचे. महाराष्टÑात मोठा भाऊ शिवसेना तर भाजप लहान भाऊ होते. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती पहिल्यांदा महाराष्टÑात आली. मनोहर जोशी यांच्यासारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेच्या वेगळ्या कार्यपध्दतीचा पुन्हा एकदा परिचय करुन दिला. सुमारे चार वर्षे जोशी मुख्यमंत्री होते. नंतर पाऊण वर्षासाठी नारायण राणे यांना संधी देण्यात आली. जोशी आणि राणे मुख्यमंत्री असले तरी सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती होता. जे त्यांनी उघडपणे सांगितले होते. हा सेनेतील आणि इतर पक्षातील फरळ ठळकपणे लक्षात येतो. भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी या पक्षातही हायकमांड या नावाने रिमोट कंट्रोल असतोच, फक्त तो अदृष्य असतो, एवढेच.अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी पाडला. रा.स्व.संघ, विहिंप आणि भाजपचे कार्यकर्ते त्यात अग्रभागी होते. पुढे त्यांच्यावर खटलेदेखील दाखल झाले. परंतु, ढाचा पडल्यानंतर त्याची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे आले नाही. कारसेवकांनी केलेली ती कृती आहे, असे सगळ्या उच्चपदस्थांनी म्हटले. तेव्हा एकटे बाळासाहेब ठाकरे असे नेता होते, की त्यांनी जाहीरपणे विधान केले की, हे कृत्य माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला अभिमान आहे. ही सेनेची कार्यपध्दती आहे.छगन भुजबळ यांनी सेना फोडून काँग्रेसला समर्थन दिल्यानंतर बाळासाहेब आणि शिवसैनिकांचा झालेला संताप, ठाकरे आणि पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा, राज ठाकरे यांच्या सेना त्यागानंतर उद्विग्न झालेले बाळासाहेब, ‘चिमण्यांनो, परत फिरा रे’ पासून ‘टाळी’पर्यंत शिवसैनिकांचे ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचे स्वप्न असे टप्पे सेनेत येत गेले. उध्दव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब असतानाच नेतृत्व आले. परंतु, त्यांच्याकडे बाळासाहेबांसारखा आक्रमकपणा आणि राज यांच्यासारखा आवेश नसल्याचे म्हटले जात असले, तरी उध्दव यांनी शिवसेनाप्रमुखांचा शेवटचा काळ, सेनेतील पडझड, नेत्यांमधील चढाओढ ही सर्व परिस्थिती अतीशय संयमाने हाताळली. २०१४ मध्ये भाजपने युती तोडली, तरीही त्वेषाने लढून आमदार निवडून आणले. भाजपने दुय्यम वागणूक दिली तरीही पाच वर्षे सरकार टिकवित असतानाच विरोधकाची भूमिका तेवढयाच प्रभावीपणे निभावली. खिशात राजीनामे घेऊन फिरतोय, या घोषणेची खिल्ली उडवली गेली तरी शिवसैनिक, सामान्य जनता आणि दोन्ही काँग्रेसला सेनेच्या याच परखड भूमिकेचे आकर्षक आणि विश्वास वाटला. बाळासाहेबांच्या कार्यपध्दतीची चुणूक पुन्हा एकदा उध्दव यांच्या काळात दिसून आली. ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे म्हणून आदित्यने निवडणूक लढविण्याचा निर्णय, बहुमत मिळाले असतानाही युती तोडून, रिमोट कंट्रोलऐवजी स्वत: नेतृत्वाची धुरा हाती घेणारे शिवसेना पक्षप्रमुख हे निर्णय सेनेच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.मात्र राजकीय विरोध असूनही वैयक्तीक संबंध, कौटुंबिक सौहार्द लक्षात घेऊन शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली, हे विसरुन चालणार नाही. कर्नाटकात कमी संख्याबळ असलेल्या जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे कुमारस्वामी यांना काँग्रेसने यापूर्वी पाठिंबा दिला असल्याने महाराष्टÑात वेगळे काही केले नाही. भाजपला सत्तेपासून दूर राखणे हा एककलमी कार्यक्रम ठरवून तिन्ही पक्ष एकत्र आले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड नंतर अनपेक्षितपणे महाराष्टÑाची सत्ता हाती येण्याचा आनंद काँग्रेस नेतृत्वाला होणे स्वाभाविक आहे. ‘जय महाराष्टÑ’ या नाºयाने तिघांना र् ैएकसूत्रात गुंफून ठेवले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव