शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘गॉडफादर’अभावी ए.टी.नानांची हॅटट्रिक हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 14:23 IST

जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे तीन गट भाजपामध्ये कार्यरत आहेत. पाटील हे तिन्ही गटांशी समान अंतर ठेवून असत. सहा महिन्यांपूर्वी अमळनेरात खडसे यांनी पाटील हेच पुढील उमेदवार असल्याचे भाकीत केले आणि त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाया सुरु झाल्या.

मिलिंद कुलकर्णीजळगाव : राजकारणातील अंतरंग आणि बाह्यरंग सामान्यांना काय भल्याभल्यांना लक्षात येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावरुन महाराष्टÑात सध्या जे काही सुरु आहे, त्यावरुन हा निष्कर्ष सहज काढू शकतो. जळगाव मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील हे त्या अनुभवातून जात आहेत. सलग दोन वेळा भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या पाटील यांना तिसऱ्यांदा तिकीट न मिळण्याला कारणीभूत ठरले एक निमित्त. कथित छायाचित्रांवरुन पाटील यांना लक्ष्य करण्यात आले आणि दहा वर्षांची त्यांची खासदारकी आणि २५ वर्षांचे राजकीय आयुष्य पणाला लागले. कोणतीही पोलीस तक्रार नाही, आरोप नाही, परंतु, समाजमाध्यमांद्वारे वाऱ्यासारखा विषय पोहोचला आणि पाटील यांना उमेदवारीसाठी टाचा झिजवाव्या लागल्या. तिसऱ्यांदा निवडून आल्यास मंत्रिपद मिळेल, अशी धास्ती वाटणाºया मंडळींनी षडयंत्र रचल्याची खंत त्यांनी चाळीसगावात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली. ‘गॉडफादर’ नसल्याने त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलीच नाही आणि एकतर्फी निर्णय घेत त्यांची उमेदवारी कापण्यात आली.पाटील यांच्या विरोधी वातावरण तापवण्यासाठी केवळ हेच एक कारण नव्हते, तर अशी अनेक कारणे उभी करण्यात आली. या विषयांची चर्चा एरवी झाली नसती. पाटील यांचे मूळ उकरुन काढण्यात आले. ते मूळचे राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. पारोळा पालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विधान परिषद निवडणूक लढवली. भाजपाचे डॉ.गुरुमुख जगवाणी यांच्याकडून ते पराभूत झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटलेला असताना प्रबळ उमेदवार म्हणून एकनाथराव खडसे यांनी ए.टी.पाटील यांना २००९ मध्ये भाजपामध्ये आणले. २०१४ मध्ये त्यांनी राज्यात दुसºया क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळविले.कोणत्याही गटबाजीत सामील झाले नाही, हा त्यांचा दुर्गुण ठरला. जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे तीन गट भाजपामध्ये कार्यरत आहेत. पाटील हे तिन्ही गटांशी समान अंतर ठेवून असत. सहा महिन्यांपूर्वी अमळनेरात खडसे यांनी पाटील हेच पुढील उमेदवार असल्याचे भाकीत केले आणि त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाया सुरु झाल्या. त्यांचे काही व्यवहार, वाद शोधून काढून प्रयत्नपूर्वक वातावरण पेटविण्यात आले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणगाव येथे आले असताना पाटील यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, तेव्हाच पाटील यांच्या तिकिटाविषयी साशंकता व्यक्त झाली.परंतु, पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यासारख्या राजकीय राजधानीतील रहिवासी असल्याने राजकीय करामती त्यांना अवगत आहेत. या संकटातून ते बाहेर पडतील, असा कयास व्यक्त होत होता. परंतु, तो फोल ठरला. पक्ष आणि पक्षश्रेष्ठींच्या मनातून एकदा सहकारी उतरला की, तो दूर फेकला जातो. याचा अनुभव पुन्हा एकदा आला. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप असलेले एम.के.पाटील, स्व.वाय.जी.महाजन हे तत्कालीन खासदार, लाच प्रकरणात अटक झालेले जळगावचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील, गैरव्यवहाराचा कथित आरोप झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यापाठोपाठ ए.टी.पाटील यांनाही पक्षाने दूर लोटले.

टॅग्स :Jalgaonजळगाव