शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘गॉडफादर’अभावी ए.टी.नानांची हॅटट्रिक हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 14:23 IST

जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे तीन गट भाजपामध्ये कार्यरत आहेत. पाटील हे तिन्ही गटांशी समान अंतर ठेवून असत. सहा महिन्यांपूर्वी अमळनेरात खडसे यांनी पाटील हेच पुढील उमेदवार असल्याचे भाकीत केले आणि त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाया सुरु झाल्या.

मिलिंद कुलकर्णीजळगाव : राजकारणातील अंतरंग आणि बाह्यरंग सामान्यांना काय भल्याभल्यांना लक्षात येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावरुन महाराष्टÑात सध्या जे काही सुरु आहे, त्यावरुन हा निष्कर्ष सहज काढू शकतो. जळगाव मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील हे त्या अनुभवातून जात आहेत. सलग दोन वेळा भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या पाटील यांना तिसऱ्यांदा तिकीट न मिळण्याला कारणीभूत ठरले एक निमित्त. कथित छायाचित्रांवरुन पाटील यांना लक्ष्य करण्यात आले आणि दहा वर्षांची त्यांची खासदारकी आणि २५ वर्षांचे राजकीय आयुष्य पणाला लागले. कोणतीही पोलीस तक्रार नाही, आरोप नाही, परंतु, समाजमाध्यमांद्वारे वाऱ्यासारखा विषय पोहोचला आणि पाटील यांना उमेदवारीसाठी टाचा झिजवाव्या लागल्या. तिसऱ्यांदा निवडून आल्यास मंत्रिपद मिळेल, अशी धास्ती वाटणाºया मंडळींनी षडयंत्र रचल्याची खंत त्यांनी चाळीसगावात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली. ‘गॉडफादर’ नसल्याने त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलीच नाही आणि एकतर्फी निर्णय घेत त्यांची उमेदवारी कापण्यात आली.पाटील यांच्या विरोधी वातावरण तापवण्यासाठी केवळ हेच एक कारण नव्हते, तर अशी अनेक कारणे उभी करण्यात आली. या विषयांची चर्चा एरवी झाली नसती. पाटील यांचे मूळ उकरुन काढण्यात आले. ते मूळचे राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. पारोळा पालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विधान परिषद निवडणूक लढवली. भाजपाचे डॉ.गुरुमुख जगवाणी यांच्याकडून ते पराभूत झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटलेला असताना प्रबळ उमेदवार म्हणून एकनाथराव खडसे यांनी ए.टी.पाटील यांना २००९ मध्ये भाजपामध्ये आणले. २०१४ मध्ये त्यांनी राज्यात दुसºया क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळविले.कोणत्याही गटबाजीत सामील झाले नाही, हा त्यांचा दुर्गुण ठरला. जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे तीन गट भाजपामध्ये कार्यरत आहेत. पाटील हे तिन्ही गटांशी समान अंतर ठेवून असत. सहा महिन्यांपूर्वी अमळनेरात खडसे यांनी पाटील हेच पुढील उमेदवार असल्याचे भाकीत केले आणि त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाया सुरु झाल्या. त्यांचे काही व्यवहार, वाद शोधून काढून प्रयत्नपूर्वक वातावरण पेटविण्यात आले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणगाव येथे आले असताना पाटील यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, तेव्हाच पाटील यांच्या तिकिटाविषयी साशंकता व्यक्त झाली.परंतु, पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यासारख्या राजकीय राजधानीतील रहिवासी असल्याने राजकीय करामती त्यांना अवगत आहेत. या संकटातून ते बाहेर पडतील, असा कयास व्यक्त होत होता. परंतु, तो फोल ठरला. पक्ष आणि पक्षश्रेष्ठींच्या मनातून एकदा सहकारी उतरला की, तो दूर फेकला जातो. याचा अनुभव पुन्हा एकदा आला. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप असलेले एम.के.पाटील, स्व.वाय.जी.महाजन हे तत्कालीन खासदार, लाच प्रकरणात अटक झालेले जळगावचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील, गैरव्यवहाराचा कथित आरोप झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यापाठोपाठ ए.टी.पाटील यांनाही पक्षाने दूर लोटले.

टॅग्स :Jalgaonजळगाव