शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

सत्वशुद्धी

By admin | Updated: February 10, 2015 23:44 IST

यामध्ये अंत:करणाची संकल्प, विकल्प करणारी वृत्ती म्हणजे मन होय. अंत:करणाची निश्चय करणारी वृत्ती म्हणजे बुद्धी होय. तसेच अंत:करणाची पूर्वापा

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले - मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चार गोष्टींंना अंत:करणचतुष्ट्य असे म्हटले जाते. संत एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात -संकल्प, विकल्प मनाचे।निश्चयो कर्म बुद्धीचे।चिंतन जाण चित्ताचे।अहंकाराचे मी पण।।यामध्ये अंत:करणाची संकल्प, विकल्प करणारी वृत्ती म्हणजे मन होय. अंत:करणाची निश्चय करणारी वृत्ती म्हणजे बुद्धी होय. तसेच अंत:करणाची पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती म्हणजे चित्त होय आणि अंत:करणाची अहंग्रह धारण करणारी वृत्ती म्हणजे अहंकार होय. याच्या शुद्धीलाही सत्वशुद्धी असे म्हटले जाते.श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘सत्वशुद्धी’ ची व्याख्या अशी सांगितली आहे की, तेवी सत्स्वरूपी रूचलेपणे।बुद्धी जे ऐसे अनन्य होणे।ते ‘सत्वशुद्धी’ म्हणे। केशीहंता।।सत्य स्वरूप जे परमात्मतत्व त्याच्या ठिकाणी बुद्धी अनन्यपणे राहणे यालाच ज्ञानेश्वर महाराज सत्वशुद्धी म्हणतात. खरे तर बुद्धी ही फार चंचल आहे. ती क्षणाक्षणाला रंग बदलते, असे संत तुकाराम महाराज सांगतात.अनेक बुद्धीचे तरंग।क्षणक्षणा पालटे रंग।धरू जाता संग।तव तव होय बाधक।।अलीकडच्या काळात माणसाच्या ठिकाणी चंचलता वाढलेली आहे. आहाराने, विचाराने, श्रवणाने बुद्धीच्या ठिकाणी शुद्धपणा आणणे खूप महत्त्वाचे आहे. महाभारतातील एका प्रसंगात भीष्माचार्य शरपंजरी उत्तरायणाची वाट पाहत पडले होते. त्यांना भेटण्याकरिता भगवान श्रीकृष्ण पाच पांडव, द्रौपदी यांच्याबरोबर गेले होते. धर्मराजाने भीष्मांना नमस्कार केला. त्याच्याकडे पाहून भीष्माचार्यांनी नैतिकतेच्या, धर्माच्या गोष्टी बोलायला सुरूवात केली. धर्माची ही भाषा ऐकून द्रौपदीला हसू आले. सर्वजण घाबरून गेले. हिच्या पहिल्या हसण्यामुळेच तर युद्ध झाले होते. भीष्माचार्यांनी तिच्याकडे पाहिले व हसण्याचे कारण विचारले. तेव्हा धाडस करून द्रौपदी म्हणाली, भरसभेत माझे वस्त्रहरण होत असताना त्यावेळेस तुम्ही तिथेच होता, मग त्यावेळेस तुमची धर्मबुद्धी कुठे गेली होती. भीष्माचार्य म्हणाले, द्रौपदी तू म्हणतेस ते खरे आहे. परंतु त्यावेळी मी दुर्योधनाचे अन्न खात होतो व त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता मात्र या अर्जुनाच्या बाणाने ते दुष्ट रक्त सगळे निघून गेले आहे व आता माझी बुद्धी शुद्ध झाल्यामुळे मी धर्माच्या गोष्टी बोलत आहे. या कथेतून आपणास असे लक्षात येते की, आपला आहार शुद्ध असेल तर आपली बुद्धी शुद्ध होईल, हीच ती सत्वशुद्धी होय.