शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास उडतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:23 IST

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जणू सामनाच सुरू झाला आहे.

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जणू सामनाच सुरू झाला आहे. सर्व विरोधी पक्षांनी नोटाबंदीचे वर्षश्राद्ध आणि काळा दिन पाळण्याचे जाहीर करताच, सरकार व भारतीय जनता पार्टीने काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक नेमके काय करणार, दोघांच्या कार्यक्रमांत, आंदोलनात सर्वसामान्य किती प्रमाणात सहभागी होणार, याकडे लक्ष लागणे स्वाभाविकच होते. नोटाबंदीचे वाईट व चांगले परिणाम अखेर सर्वसामान्यांनाच सहन करावे लागले. त्यामुळे देशातील जनता या प्रश्नावर कोणाच्या बाजूने आहे, हे समजणे महत्त्वाचे होते. प्रत्यक्षात काळा पैसाविरोधी दिन साजरा करू पाहणाºया भाजपाने रस्त्यांवर उतरून काहीच केले नाही. अगदी नोटाबंदीचे फायदे सांगण्यासाठी मेळावे, सभा, मिरवणुका यांचेही आयोजन केले नाही. एरवी प्रत्येक निर्णय व योजनांचा इव्हेंट करणाºया भाजपाला हे करावेसे वाटले नाही, हे आश्चर्यच. नोटाबंदीमुळे खूप काही जनतेला भोगावे लागले या जाणिवेमुळे लोक त्यात सहभागी होणार नाहीत, अशा भीतीनेच सत्ताधाºयांतर्फे इव्हेंट झाले नसावेत. भाजपाचे केंद्रीय मंत्रीच केवळ देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन नोटाबंदी हा देशहिताचा निर्णय कसा होता, हे सांगताना दिसले आणि सरकारच्या जाहिरातीच तेवढ्या प्रसिद्ध झाल्या. वर्षभर सरकारतर्फे जे सांगण्यात येत होते, त्यापेक्षा काहीच वेगळी माहिती सत्ताधाºयांना काळा पैसाविरोधी दिनाच्या निमित्ताने जनतेपुढे सादर करता आली नाही. नोटाबंदीमुळे किती काळा पैसा शोधून काढता आला, दहशतवादाला कसा फटका बसला, हे सरकारला आजही सांगता आलेले नाही. त्यातही ९९ टक्के पैसा बँकांत जमा झाल्याने नोटाबंदी यशस्वी ठरली, असेही खात्रीने सांगता येत नाही, अशी सरकारी पक्षाची अवस्था आहे. दुसरीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी रस्त्यांवर उतरून मोर्चे, निदर्शने, वर्षश्राद्धाच्या नावाने मुंडण, काही सभा, मेळावे यांचे आयोजन केले खरे, पण नोटाबंदीने होरपळून निघालेली, रोख रकमेसाठी रांगा लावणारी, रोकड नसल्याने अडचणीत आलेली जनता विरोधकांच्या काळा दिनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होती, असेही आढळले नाही. नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहार मंदावले, अनेकांचा रोजगार गेला, बरेच उद्योग डबघाईला आले. पण हा वर्गही सरकारच्या विरोधातील आंदोलनात दिसला नाही. केवळ विविध पक्षांचे नेते व कार्यकर्तेच आंदोलनात होते. नोटाबंदीविरोधात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि अहमदाबादसारख्या प्रमुख शहरात सर्व विरोधकांना एकत्र येऊनही प्रचंड म्हणावा असा मोर्चा काढता आला नाही. म्हणूनच देशातील बहुतांश जनतेने नोटाबंदीच्या प्रश्नावर विरोधक व सत्ताधारी यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. केंद्र सरकारच्या निर्णयाचा त्रास झाला आणि त्यातून काही फायदे मिळालेले नाहीत, म्हणून जनता खरोखर नाराज आहे. पण विरोधकही आंदोलनांद्वारे केवळ राजकारण करीत आहेत, असेच लोकांना वाटत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी हे चांगले लक्षण नाही. दोन्ही बाजूंविषयी जनतेच्या मनात शंका आहेत. दोघांचीही विश्वासार्हता कमी झाली, याचे हे उदाहरण आहे. निवडणुकांत लोक कोणाला मते देतील, हा मुद्दा अलाहिदा. पण दोन्ही बाजूंनी खेळल्या जाणाºया नोटाबंदीच्या खेळात भाग घेण्याची त्यांना इच्छा नाही. सामान्यांसाठी हा विषय सोशल मीडियावरील राजकारणाच्या गप्पांपुरता मर्यादित राहिला आहे. त्यांना आता मोर्चा, आंदोलने, मेळावे याऐवजी पोटाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. अशा राजकारणातून काही मिळत नाही, हे त्यांनी आता ओळखले आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी