शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास उडतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:23 IST

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जणू सामनाच सुरू झाला आहे.

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जणू सामनाच सुरू झाला आहे. सर्व विरोधी पक्षांनी नोटाबंदीचे वर्षश्राद्ध आणि काळा दिन पाळण्याचे जाहीर करताच, सरकार व भारतीय जनता पार्टीने काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक नेमके काय करणार, दोघांच्या कार्यक्रमांत, आंदोलनात सर्वसामान्य किती प्रमाणात सहभागी होणार, याकडे लक्ष लागणे स्वाभाविकच होते. नोटाबंदीचे वाईट व चांगले परिणाम अखेर सर्वसामान्यांनाच सहन करावे लागले. त्यामुळे देशातील जनता या प्रश्नावर कोणाच्या बाजूने आहे, हे समजणे महत्त्वाचे होते. प्रत्यक्षात काळा पैसाविरोधी दिन साजरा करू पाहणाºया भाजपाने रस्त्यांवर उतरून काहीच केले नाही. अगदी नोटाबंदीचे फायदे सांगण्यासाठी मेळावे, सभा, मिरवणुका यांचेही आयोजन केले नाही. एरवी प्रत्येक निर्णय व योजनांचा इव्हेंट करणाºया भाजपाला हे करावेसे वाटले नाही, हे आश्चर्यच. नोटाबंदीमुळे खूप काही जनतेला भोगावे लागले या जाणिवेमुळे लोक त्यात सहभागी होणार नाहीत, अशा भीतीनेच सत्ताधाºयांतर्फे इव्हेंट झाले नसावेत. भाजपाचे केंद्रीय मंत्रीच केवळ देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन नोटाबंदी हा देशहिताचा निर्णय कसा होता, हे सांगताना दिसले आणि सरकारच्या जाहिरातीच तेवढ्या प्रसिद्ध झाल्या. वर्षभर सरकारतर्फे जे सांगण्यात येत होते, त्यापेक्षा काहीच वेगळी माहिती सत्ताधाºयांना काळा पैसाविरोधी दिनाच्या निमित्ताने जनतेपुढे सादर करता आली नाही. नोटाबंदीमुळे किती काळा पैसा शोधून काढता आला, दहशतवादाला कसा फटका बसला, हे सरकारला आजही सांगता आलेले नाही. त्यातही ९९ टक्के पैसा बँकांत जमा झाल्याने नोटाबंदी यशस्वी ठरली, असेही खात्रीने सांगता येत नाही, अशी सरकारी पक्षाची अवस्था आहे. दुसरीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी रस्त्यांवर उतरून मोर्चे, निदर्शने, वर्षश्राद्धाच्या नावाने मुंडण, काही सभा, मेळावे यांचे आयोजन केले खरे, पण नोटाबंदीने होरपळून निघालेली, रोख रकमेसाठी रांगा लावणारी, रोकड नसल्याने अडचणीत आलेली जनता विरोधकांच्या काळा दिनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होती, असेही आढळले नाही. नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहार मंदावले, अनेकांचा रोजगार गेला, बरेच उद्योग डबघाईला आले. पण हा वर्गही सरकारच्या विरोधातील आंदोलनात दिसला नाही. केवळ विविध पक्षांचे नेते व कार्यकर्तेच आंदोलनात होते. नोटाबंदीविरोधात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि अहमदाबादसारख्या प्रमुख शहरात सर्व विरोधकांना एकत्र येऊनही प्रचंड म्हणावा असा मोर्चा काढता आला नाही. म्हणूनच देशातील बहुतांश जनतेने नोटाबंदीच्या प्रश्नावर विरोधक व सत्ताधारी यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. केंद्र सरकारच्या निर्णयाचा त्रास झाला आणि त्यातून काही फायदे मिळालेले नाहीत, म्हणून जनता खरोखर नाराज आहे. पण विरोधकही आंदोलनांद्वारे केवळ राजकारण करीत आहेत, असेच लोकांना वाटत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी हे चांगले लक्षण नाही. दोन्ही बाजूंविषयी जनतेच्या मनात शंका आहेत. दोघांचीही विश्वासार्हता कमी झाली, याचे हे उदाहरण आहे. निवडणुकांत लोक कोणाला मते देतील, हा मुद्दा अलाहिदा. पण दोन्ही बाजूंनी खेळल्या जाणाºया नोटाबंदीच्या खेळात भाग घेण्याची त्यांना इच्छा नाही. सामान्यांसाठी हा विषय सोशल मीडियावरील राजकारणाच्या गप्पांपुरता मर्यादित राहिला आहे. त्यांना आता मोर्चा, आंदोलने, मेळावे याऐवजी पोटाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. अशा राजकारणातून काही मिळत नाही, हे त्यांनी आता ओळखले आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी