शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

विश्वास उडतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:23 IST

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जणू सामनाच सुरू झाला आहे.

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जणू सामनाच सुरू झाला आहे. सर्व विरोधी पक्षांनी नोटाबंदीचे वर्षश्राद्ध आणि काळा दिन पाळण्याचे जाहीर करताच, सरकार व भारतीय जनता पार्टीने काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक नेमके काय करणार, दोघांच्या कार्यक्रमांत, आंदोलनात सर्वसामान्य किती प्रमाणात सहभागी होणार, याकडे लक्ष लागणे स्वाभाविकच होते. नोटाबंदीचे वाईट व चांगले परिणाम अखेर सर्वसामान्यांनाच सहन करावे लागले. त्यामुळे देशातील जनता या प्रश्नावर कोणाच्या बाजूने आहे, हे समजणे महत्त्वाचे होते. प्रत्यक्षात काळा पैसाविरोधी दिन साजरा करू पाहणाºया भाजपाने रस्त्यांवर उतरून काहीच केले नाही. अगदी नोटाबंदीचे फायदे सांगण्यासाठी मेळावे, सभा, मिरवणुका यांचेही आयोजन केले नाही. एरवी प्रत्येक निर्णय व योजनांचा इव्हेंट करणाºया भाजपाला हे करावेसे वाटले नाही, हे आश्चर्यच. नोटाबंदीमुळे खूप काही जनतेला भोगावे लागले या जाणिवेमुळे लोक त्यात सहभागी होणार नाहीत, अशा भीतीनेच सत्ताधाºयांतर्फे इव्हेंट झाले नसावेत. भाजपाचे केंद्रीय मंत्रीच केवळ देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन नोटाबंदी हा देशहिताचा निर्णय कसा होता, हे सांगताना दिसले आणि सरकारच्या जाहिरातीच तेवढ्या प्रसिद्ध झाल्या. वर्षभर सरकारतर्फे जे सांगण्यात येत होते, त्यापेक्षा काहीच वेगळी माहिती सत्ताधाºयांना काळा पैसाविरोधी दिनाच्या निमित्ताने जनतेपुढे सादर करता आली नाही. नोटाबंदीमुळे किती काळा पैसा शोधून काढता आला, दहशतवादाला कसा फटका बसला, हे सरकारला आजही सांगता आलेले नाही. त्यातही ९९ टक्के पैसा बँकांत जमा झाल्याने नोटाबंदी यशस्वी ठरली, असेही खात्रीने सांगता येत नाही, अशी सरकारी पक्षाची अवस्था आहे. दुसरीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी रस्त्यांवर उतरून मोर्चे, निदर्शने, वर्षश्राद्धाच्या नावाने मुंडण, काही सभा, मेळावे यांचे आयोजन केले खरे, पण नोटाबंदीने होरपळून निघालेली, रोख रकमेसाठी रांगा लावणारी, रोकड नसल्याने अडचणीत आलेली जनता विरोधकांच्या काळा दिनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होती, असेही आढळले नाही. नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहार मंदावले, अनेकांचा रोजगार गेला, बरेच उद्योग डबघाईला आले. पण हा वर्गही सरकारच्या विरोधातील आंदोलनात दिसला नाही. केवळ विविध पक्षांचे नेते व कार्यकर्तेच आंदोलनात होते. नोटाबंदीविरोधात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि अहमदाबादसारख्या प्रमुख शहरात सर्व विरोधकांना एकत्र येऊनही प्रचंड म्हणावा असा मोर्चा काढता आला नाही. म्हणूनच देशातील बहुतांश जनतेने नोटाबंदीच्या प्रश्नावर विरोधक व सत्ताधारी यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. केंद्र सरकारच्या निर्णयाचा त्रास झाला आणि त्यातून काही फायदे मिळालेले नाहीत, म्हणून जनता खरोखर नाराज आहे. पण विरोधकही आंदोलनांद्वारे केवळ राजकारण करीत आहेत, असेच लोकांना वाटत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी हे चांगले लक्षण नाही. दोन्ही बाजूंविषयी जनतेच्या मनात शंका आहेत. दोघांचीही विश्वासार्हता कमी झाली, याचे हे उदाहरण आहे. निवडणुकांत लोक कोणाला मते देतील, हा मुद्दा अलाहिदा. पण दोन्ही बाजूंनी खेळल्या जाणाºया नोटाबंदीच्या खेळात भाग घेण्याची त्यांना इच्छा नाही. सामान्यांसाठी हा विषय सोशल मीडियावरील राजकारणाच्या गप्पांपुरता मर्यादित राहिला आहे. त्यांना आता मोर्चा, आंदोलने, मेळावे याऐवजी पोटाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. अशा राजकारणातून काही मिळत नाही, हे त्यांनी आता ओळखले आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी