शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

ब्रह्मपुरीचे तुरूक

By admin | Updated: June 6, 2014 08:52 IST

महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे

अध्यात्मडॉ. यू. म. पठाणआम्ही ब्रह्मपुरीचे तुरूक। द्वैत मिळोनि जालो एक।।१।।अहं-टोणगा भक्षिला।निज प्रेमाचा प्यालों प्याला।।२।।सांडवलों आचारविचारा।कोणी ‘भले’ म्हणा ‘बुरा’।।३।।कोणी आम्हांसी बाटले।बाटुनि मूळ ठायां गेले।।४।।शेख महंमदीं वाटले।यातीवेगळें घातले।।५।।महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे. अशा संतांपैकी शेख महंमद हे एक प्रमुख संत होत. त्यांनी इस्लाम व हिंदू धर्मांच्या तत्त्वज्ञानातील साम्यस्थळांवर प्रकाश टाकून दोन्ही धर्मीयांमध्ये ऐक्य प्रस्थापित केले. स्वत: शेख महंमद हे सुफींच्या काद्री शाखेचे संत असूनही वारकरी संप्रदायाशीही इतके एकरूप झाले, की पुढे वारकरी संत म्हणूनही ख्यातनाम झाले.त्यांच्या या अभंगात त्यांनी स्वत:ला ‘ब्रह्मपुरीचे तुरूक’ म्हटले आहे. आम्ही हिंदू व इस्लाम धर्मीयांनी दोन्ही धर्मांतील वेगळेपण (‘द्वैत’) नाहीसे केले. एकमेकांनी अहंभावाचा त्याग करून परस्परांच्या धर्मांचा आदर केला व ‘प्रेमाचा प्याला प्यालो’- म्हणजे स्नेहभावना वृद्धिंगत केली. एकमेकांच्या आचारविचारांचे आदानप्रदान केले. त्यामुळे समाजातील काही सनातनी प्रवृत्तींच्या लोकांनी आम्ही बाटलो, म्हणून आमच्यावर टीका केली व आमच्याविषयी अपप्रचार केला; पण आम्हाला त्याचे काहीही सोयरसुतक वाटले नाही. कुणी आम्हाला ‘भले’ म्हणो वा ‘बुरे’ म्हणो, त्याची आम्हाला चिंता नाही, कारण आमचा मार्ग हा खर्‍या धर्माचा, मानवतेचा नि बंधुभावाचा मार्ग होता. त्यावर आमची अढळ निष्ठा होती. त्यामुळे आम्ही परस्परांच्या कल्याणाची चिंता वाहिली व समाज दुभंगू दिला नाही. खरा धर्म कोणताही भेदभाव मानीत नाही.D