शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:02 IST

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर दररोज किमान एक अपघात होतो व त्यात निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. लग्न समारंभ आटोपून धुळ्याहून पाचोरा येथे जाणाºया वºहाडींच्या कारला ट्रकने धडक दिल्याने त्यात पाच जण ठार झाल्याची घटना पारोळानजीक महामार्गावर कालच पहाटे ...

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर दररोज किमान एक अपघात होतो व त्यात निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. लग्न समारंभ आटोपून धुळ्याहून पाचोरा येथे जाणाºया वºहाडींच्या कारला ट्रकने धडक दिल्याने त्यात पाच जण ठार झाल्याची घटना पारोळानजीक महामार्गावर कालच पहाटे घडली. या घटनेमुळे वाणी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिवसागणिक हा महामार्ग धोकादायक बनत असून अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्यात ४ हजार ७२ अपघात झाले, त्यात २ हजार १४५ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ८२० जण गंभीर आणि ४ हजार १४२ प्रवासी जखमी झाले. दरवर्षी साधारणत: १ हजार ते १२०० अपघात होतात. ही आकडेवारी चिंताजनक आहे. अपघातांची संख्या दरवर्षी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा वापर, चालकाने पुरेशी झोप न घेणे, महामार्गाची झालेली दैना व वाहनांची प्रचंड वर्दळ ही अपघातांची काही प्रमुख कारणे आहेत. अपघात झाल्यानंतर कारणांवर चर्चा होते मात्र उपाययोजना होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाने उपायोजना करणे आवश्यक आहे. मात्र या तीनही यंत्रणा बेपर्वा आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्ते सुरक्षा समिती शासनाने गठीत केली आहे, मात्र ही समिती नावालाच असल्याचे दिसून येते. या समितीची बैठक नियमित होत नाही. झालीच तर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित नसतात, त्यामुळे तहकूब करण्याची वेळ खुद्द खासदारांवर येते. बैठक झाली तरी त्यातील सूचनांची अंमलबजावणी होत नाही. परिणामी अपघातांची संख्या दिवसागणिक कमी होण्याऐवजी वाढतच आहे. जळगाव शहरातून जाणारा महामार्ग तर नागरिकांच्या जीवावर उठला आहे. दररोज लहान मोठा अपघात होतो. महामार्गावरील ताण कमी व्हावा यासाठी समांतर रस्त्यांसाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणातर्फे १३८ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र ते होताना दिसत नाही. तो मंजूर झाल्यानंतर निविदा निघेल व प्रत्यक्ष काम केव्हा सुरु होईल व महामार्गावरील अपघात कधी नियंत्रणात येतील? राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बांधकाम खाते त्यांच्याकडे असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागतील व नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली दिसत नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना २०२० पर्यंत अपघातातातील हानी ५० टक्क्यांवर कमी करायची आहे, त्यासाठी शासन व प्रशासनाला तातडीने निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. जर जळगावातून जाणाºया ९ कि.मी.च्या समातंर रस्त्यांचा डीपीआर बनविण्यात चार वर्षे खर्ची होत असतील तर गडकरींचे स्वप्न कसे पूर्ण होणार? केवळ घोषणा करुन उपयोग नाही तर कामाला गती दिली तरच नागरिकांना दिलासा मिळेल.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव