शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बदल्यांचे गुऱ्हाळ संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:14 IST

महिन्यात राज्यात किमान एक लाख शिक्षकांच्या बदल्या होतील

बदली झाली की, नव्या जागी निमूटपणे हजर होणारे आपल्याकडे केवळ लष्करी अधिकारी आणि जवानच असावेत, बाकी सगळीकडे बदली प्रकरणावरून रणकंदन सुरू असते. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. बदल्या होणार, असे जाहीर करून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला घोळ संपविला. त्यानुसार पुढील महिन्यात राज्यात किमान एक लाख शिक्षकांच्या बदल्या होतील, या अध्यादेशानुसार अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र, अशा दोन्ही घटकांतील शिक्षकांना नियमाप्रमाणे पसंतीचे ठिकाण देण्याची संधी आहे. तरी याला शिक्षक संघटनांचा विरोध होता आणि अध्यादेशाच्या विरोधात या संघटना मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही ठिकाणी उच्च न्यायालयात गेल्या; पण या तिन्ही याचिका फेटाळल्या गेल्याने संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढली. तेथेही सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. बदल्यांमुळे अन्याय होणार, हा संघटनांचा मुद्दा टिकला नाही. अगोदर बदल्या स्वीकारा. खरोखरच अन्याय झाला का हे सिद्ध होईपर्यंत अन्याय होणार, असा मुद्दा गैरलागू आहे, असे न्यायसंस्थेने सुनावले. यानंतर प्रलंबित प्रश्नांवर संघटनांनी जिल्हाधिकारी कचेऱ्यांवर मोर्चे काढले. शिवाय दिवाळीच्या सुटीनंतर बदल्या केल्या, तर शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असा मुद्दा मांडला. म्हणून त्यावेळी बदल्या टळल्या होत्या. उन्हाळ्यात बदल्या करा आम्ही विरोध करणार नाही, असे शपथपत्रही दाखल केले होते. आता प्रक्रिया सुरू होताच २९ एप्रिल रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर करताच पुन्हा घोळ कायम राहणार, असे वातावरण निर्माण झाले; पण पंकजा मुंडेंच्या निर्णयाने या प्रकरणावर पडदा पडला. शिक्षकांच्या बदल्यांमधील राजकारण हे नवे नाही. वर्षानुवर्षे शहरांमध्ये किंवा शहरालगतच्या शाळांमध्ये ठाण मांडून असलेल्या व्यक्तींना बदली नको असते. शिवाय संघटनेच्या जिल्हा व तालुका स्तरांवरील प्रत्येकी चार नेत्यांना बदलीतून सूट मिळत असे; पण या अध्यादेशाने ही सूट रद्द केली. आपल्याकडे नियमांच्या चौकटीत बसवून कायद्याला मुरड घालण्याच्या कलेत आपण वाक्बगार आहोत. नि:संशयपणे यात आपला हात कुणीच धरू शकणार नाही. संघटनेच्या जिल्हा, तालुका चार स्तरांवरील नेत्यांची बदली होत नव्हती. त्यावेळी बदलीच्या धोका क्षेत्रात असलेल्या आपल्या जवळच्या मंडळींना वाचविण्यासाठी केवळ बदल्यांच्या काळात संघटनेतील पदे बहाल केली जात, अशा एक ना अनेक क्लृप्त्या बदल्या टाळण्यासाठी वापरण्यात येत होत्या. संघटना ही कर्मचाºयांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी असते; पण त्याअगोदर ज्या कामासाठी आपली नेमणूक असते त्याचे सार्वजनिक हित महत्त्वाचे ठरते. याकडे लक्ष गेले नाही. यामुळे आडवळणाच्या गावातील शिक्षकांमध्ये या शहरी मंडळींबद्दल नेहमी असूया दिसून येते. आम्हीच का दुर्गम भागात नोकरी करायची, असा प्रश्नही त्यांना पडत होता. दुसरीकडे वर्षानुवर्षे दुर्गम भागात काम करणाºया शिक्षकांनाही शहरातील किंवा जवळच्या शाळा हव्या असतात. बदलीतून सूट नसणे ही गोष्ट नेत्यांच्या पचनी पडणे अवघड होते आणि ही मंडळी दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी असल्याने अध्यादेशानुसार त्यांची बदली अपरिहार्य होती. म्हणूनच बदल्यांना विरोध होता. महिलांसाठी काम करण्यास अयोग्य ठिकाणे यावेळी निश्चित केली असून, अशा शाळांमध्ये महिलांची बदली होणार नाही हा आणखी एक दिलासा महिला शिक्षकांना या अध्यादेशाने दिला आहे. आडवळणाच्या गावात यापुढे महिला शिक्षकांना जावे लागणार नाही. बदल्यांच्या अनिश्चित वातावरणामुळे गेले वर्षभर राज्यातील शिक्षणावर परिणाम झाला. शिवाय विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले; पण आता जूनपूर्वी ही प्रक्रिया संपली. सरकारवर कोणत्याच दबावतंत्राचा परिणाम झाला नाही, हे विशेष. शेवटी हे गुऱ्हाळ संपले.

टॅग्स :educationशैक्षणिक