शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक आणि आश्वासक...! हे ‘सचिवालय’ नव्हे तर ‘मंत्रालय’...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:08 IST

मंत्रालय ‘सोडवणूक’ करण्यासाठी आहे. ‘अडवणूक’ करण्यासाठी नाही, हे ज्यादिवशी यंत्रणांना समजेल, तेव्हाच खरे ‘लोकराज्य’ अवतरेल.

हे ‘सचिवालय’ नव्हे तर ‘मंत्रालय’ आहे, असे ठणकावून सांगितले गेले, तेव्हा त्यामागे एक ठोस भूमिका होती. हे लोकांचे राज्य आहे. लोकशाहीमध्ये ‘लोक’ केंद्रबिंदू असतात. मंत्री महत्त्वाचे यासाठी कारण लोक त्यांना निवडून देतात. मंत्र्यांचा अथवा आमदारांचा सन्मान, म्हणजे लोकांचा सन्मान. राज्य सरकारचे जे मुखपत्र आहे, त्याचे नावच मुळी ‘लोकराज्य’ आहे. असे असताना, मंत्रालयात सामान्य माणसांपेक्षा भलतेच लोक दिसत असतात. काहीजणांचा वावर तर एवढा सराईत असतो, की ते जणू नोकरी करत असल्याप्रमाणे मंत्रालयातच रेंगाळताना दिसतात. सामान्य लोक आणि मंत्री यांच्यामधील यंत्रणा एवढी मोठी झाली आहे की, भलतेच लोक मंत्रालय चालवतात की काय, असा प्रश्न पडावा! 

अशा वेळी राज्य सरकारने मंत्रालयातील अभ्यागतांसाठी बनवलेले नवे नियम स्वागतार्ह आहेत. मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात नवीन पद्धत आणण्याची भूमिका घेतली. या निर्णयामुळे मंत्रालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड आता असेल. त्यातून अनेक बाबींवर सहजतेने नियंत्रण ठेवता येणार आहे. यातून अनेक गोष्टी पारदर्शक पद्धतीने पार पडू शकतील. मंत्रालयात खुलेआम दलाली करणाऱ्या दोघांना काही महिन्यांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीने मंत्रालयातील दलालांच्या अनुषंगाने राज्य सरकारला धारेवर धरले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तेव्हा संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तेव्हाच्या आरोपांना या निर्णयातून उत्तर देण्याचा प्रयत्न आताच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे मूळ उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टिकोनातून हे आश्वासक पाऊल असले तरी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय हे थांबणार नाही. गैरव्यवहारांना हिंमत देणाऱ्यांमध्ये मंत्रालयातील काही भ्रष्ट अधिकारी, खुद्द मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असतात, हे लपून राहिलेले नाही. 

सर्वसामान्यांना मंत्रालयात लवकर प्रवेश मिळत नाही. याउलट सत्ताधारी पक्षाच्या, आमदारांच्या पंधरा-वीस कार्यकर्त्यांना एकाच वेळी सहजतेने प्रवेशाचे ‘पास’ मिळतात. या पक्षपातीपणामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच राहतात आणि ‘कमिशन’च्या लालसेने, मध्यस्थांना सोबत घेऊन अनेक अधिकारी नको ते उद्योग करतात. आता कडेकोट सुरक्षा प्रणाली विकसित होणार असल्यामुळे अशा अपप्रवृत्तींचा मंत्रालयातील वावर काहीअंशी तरी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. आधीच्या काळात मंत्रालयाच्या आवारात आत्महत्येचे प्रयत्न झाले. आंदोलने झाली. हे प्रकार रोखण्यासाठी तेव्हा व्यवस्था करण्यात आली होती. पण, तरीही त्याचा परिणाम झाला नाही. 

या पार्श्वभूमीवर नव्या सुरक्षा प्रणालीचा फायदा होणार आहे. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाचे ‘फेशिअल रेकग्निशन’ होणार आहे. प्रवेशासाठी ‘ऑनलाइन पास’ मिळणार असल्यामुळे सर्वसामान्यांना सहजतेने प्रवेश मिळण्याची शक्यता वाढणार आहे. हे खरे असले तरी सत्ताधाऱ्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांवरही अंकुश ठेवावा लागणार आहे. त्यासोबतच मंत्री, आमदारांसोबत किती लोकांना प्रवेश मिळेल, याचेही ठोस धोरण ठरवावे लागणार आहे. ज्या विभागात काम असेल त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार असल्याने दिवसभर मंत्रालयात फिरणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी होणार आहे. शिवाय ‘एआय’चा वापर करून ही यंत्रणा राबविण्यात येणार असल्यामुळे मंत्रालय प्रवेश सर्वसामान्यांसाठी सोईचा होणार आहे. नागरिकांना केंद्रस्थानी मानून यंत्रणेने पारदर्शक पद्धतीने काम केले तर गरजू लोकांची कामे होतील. मात्र, या नव्या यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची काळजीही प्रशासनाला घ्यावी लागेल. 

बदलणाऱ्या काळात मंत्रालयातील प्रवेशाची यंत्रणाही बदलतेय, हे सकारात्मक आहे. हा बदल सर्वसामान्य माणसाला बळ देणारा असला पाहिजे. नाहीतर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चेहरे दिसतील; पण मूळ प्रश्न कायम राहील ! मुळात मंत्रालयात न येता, त्या त्या स्थानिक स्तरावरच लोकांची कामे व्हायला हवीत. गावखेड्यातल्या कोणत्याही माणसाला कोणाच्याही शिफारशीशिवाय, दलालांशिवाय मंत्रालयात अडलेले आपले काम मार्गी लावता आले पाहिजे. मंत्रालय ‘सोडवणूक’ करण्यासाठी आहे. ‘अडवणूक’ करण्यासाठी नाही, हे ज्यादिवशी यंत्रणांना समजेल, तेव्हाच खरे ‘लोकराज्य’ अवतरेल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारministerमंत्री