शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

परिवर्तनाची चळवळ...

By admin | Updated: February 10, 2016 04:27 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहापूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक करुन परिवर्तनाची चळवळ गतीमान केली आहे.

- सुधीर महाजन

औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहापूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक करुन परिवर्तनाची चळवळ गतीमान केली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा, विधवा विवाह, स्त्री शिक्षण यासाठी कृती करून देशापुढे आदर्श ठेवण्याचा सुधारणावादी वारसा असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या शिंगणापूरच्या शनीचे दर्शन घेण्याचा अधिकार महिलाना असावा का, या मुद्यावर गदारोळ उठला आहे. पुरोगामी विचारांची परंपरा असणाऱ्या राज्यात अशा मुद्यावरून गदारोळ उठणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह लावण्यासारखी बाब आहे. अशी परिस्थिती असतानाच एखादी कृती अशी घडते की, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारा अव्याहत चालू राहील याची खात्री पटते. औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहपूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक केली आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या खेड्याने असे पाऊल उचलणे हे पुरोगामित्वाचेच लक्षण आहे. कन्नड तालुक्यातील या तिन्ही गावांनी हा निर्णय गणतंत्रदिनानिमित्त बोलावलेल्या ग्रामसभेत घेतला आणि गावातील लोकानी ग्रामपंचायतींच्या या प्रस्तावाला मान्यता दिली.वेगाने बदलणाऱ्या समाजाच्या पावित्र्याच्या कल्पनाही बदलल्या आहेत. पूर्वीच्या रूढी, कल्पनांचा पगडा सैल झाला, त्याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर झाला. मध्यंतरी एड्ससारख्या रोगाचा विळखा समाजाला पडतो काय अशी भीती निर्माण झाली होती; पण समाजजागृती आणि या रोगाचे भयावह परिणाम यामुळे काही बदल झाले. एड्स झाला असे इतराना समजले तर एड्सचा रुग्ण बहिष्कृत समजला जात असे. त्याच्याशी संपर्क सर्वच टाळत. मरणापेक्षा हे बहिष्कृत जगणे वाईट असते याचा प्रत्यय अनेकाना आला. या तीन गावांनी निर्णय घेतला; पण या निर्णयापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांचे मत परिवर्तन करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर होते. अशा प्रक्रियेत एक नव्हे तर अनेक डोकी एकमेकांवर आपटतात. यापैकी हतनूरच्या सरपंच मंगला काळे तर महिला आहेत. त्यांनी या कामी पुढाकार घेणे ही महत्त्वाची घटना होती. गाव छोटे असेल तर असे गावासाठी निर्णय घेणे सोपे असते. कारण विरोधकांची संख्या मर्यादेत असते; पण हतनूर गावची लोकसंख्या बारा हजार आहे. मोठ्या गावात असे मतैक्य घडवून आणणे अवघड असते आणि त्यासाठी चिकाटीने प्रबोधनाचे काम करावे लागते. या तिन्ही गावात ही चाचणी होते. वर किंवा वधू बाहेरगावची असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा ही चाचणी बंधनकारक आहे. येथे विवाहापूर्वी वधू-वरांना ग्रामपंचायत, वेगळे स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देते. काही वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील एड्सच्या रुग्णात १६ टक्क्यांवरून १.०१ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.परिवर्तनाची ही चळवळ चालू असताना सामाजिक बांधिलकीची भावनाही टिकून असल्याचे काही घटनांमधून जाणवते. दुष्काळामुळे मराठवाडा होरपळत आहे. सर्वत्र पाणीटंचाईने कहर केला. बदनापूर तालुक्यातील पाडळी हे खेडे इतर खेड्यांसारखे पाणीटंचाईने त्रस्त झालेले. शासनाकडून उपाययोजना नाही. अशावेळी डॉ. विवेक वडके या उद्योजकाने आपल्या मुलीचा विवाह साधेपणाने पार पाडला आणि पाडळीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत म्हणून तीन लाख रुपये दिले. वडकेंच्या कृतीने ग्रामस्थांमध्येही गावासाठी आपणच काही केले पाहिजे ही जबाबदारीची भावना निर्माण झाली आणि गावकऱ्यांनी चार लाख रुपये उभारण्याचा निर्णय घेतला. या पैशातून गावाजवळील नदीवर बंधारा बांधण्यात येईल. आपला मार्ग आपण शोधणारी, आपल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारी ही या खेड्यांची कहाणी प्रातिनिधिक असली तरी महाराष्ट्रात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात असे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत. कधी कधी पुरोगामित्वावर शनीची छाया पडते; पण संक्रमण अटळ असते.