शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 22:01 IST

घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात....

आरोग्य सुदृढ राहावे, साथीचे आजार उद्भवू नये यासाठी शासनाने ग्रामीण भागात विविध उपक्रम हाती घेतले. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना गावोगावी राबविण्यात आली. पण शासनाच्या योजनांची स्थिती म्हणजे पुढे पाठ, मागे सपाट अशी झाली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लाखो  कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले. प्रशासनाने त्यांची दप्तरी तशी नोंद करून घेतली. १०० टक्के शौचालय बांधकाम झालेल्या काही गावांचा हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरवही झाला. गावस्तरावर होणाऱ्या निवडणुकांमध्ये यावर अनेकांनी मतेही मागितली. गेल्या १० ते १२ वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाने गाव कारभाऱ्यांना हाताशी धरून गावे कागदोपत्री नंदनवन केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचा पुरवठा करण्यात आला. अनेक गावात हागणदारीमुक्त गाव म्हणून फलक लागले. मात्र, परिस्थिती उलट निर्माण झाली. पुन्हा सुरू झाले ये रे माझ्या मागल्या...ही बाब लक्षात आल्यावर पंचायत समितीने गुड मॉर्निंग पथक तयार करून भल्या पहाटे अनेकांची अडवणूक केली. लोटाबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. एवढे करूनही पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला नाही. गावात कोण आले अन् कोण गेले, याची यत्किंचितही तमा गावकारभाऱ्यांनाही राहिली नाही. केवळ पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर देखावा करण्यासाठी स्टंटबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या गावात मुक्काम ठोकून शौचालय बांधकाम व त्याच्या वापरातून होणाऱ्या फायद्याचे महत्त्व गावकऱ्यांना उद्धृत केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला १२ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांना देण्यात आले. लाभार्थ्यांची यादी घेऊन सरपंच, ग्रामसेवक दारोदारी फिरले. अनुदान मिळणार असल्याचे सांगूनही अनेकांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठांचा रेटा असल्याने स्थानिक पातळीवर शौचालय उभारणीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. रेडिमेड शौचालय स्वस्तात मिळाली. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. स्वत: उत्पादकांनी घरपोच सेवा देत शौचालय उभारून दिले. लाभार्थ्यांनी वापरासाठी तयार असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढली अन् अनुदान पदरी पाडून घेतले. गाव हागणदारीमुक्त झाल्याचा आनंद अधिकाऱ्यांपर्यंत गाव कारभाऱ्यांनी पोहोचविला. अनेक ठिकाणी तर एका रात्रीतून शौचालय उभारण्याचे काम करण्यात आले. हागणदारीमुक्त मुक्त गावाच्या यादीत आपलेही गाव आले पाहिजे, यासाठी कारभाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून तात्पुरते पैसे लावून बांधकाम करून दिले. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता सोय झाल्याने गांभीर्य लाभार्थ्यांना आले नाही. घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात.... 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान