शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 22:01 IST

घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात....

आरोग्य सुदृढ राहावे, साथीचे आजार उद्भवू नये यासाठी शासनाने ग्रामीण भागात विविध उपक्रम हाती घेतले. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना गावोगावी राबविण्यात आली. पण शासनाच्या योजनांची स्थिती म्हणजे पुढे पाठ, मागे सपाट अशी झाली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लाखो  कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले. प्रशासनाने त्यांची दप्तरी तशी नोंद करून घेतली. १०० टक्के शौचालय बांधकाम झालेल्या काही गावांचा हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरवही झाला. गावस्तरावर होणाऱ्या निवडणुकांमध्ये यावर अनेकांनी मतेही मागितली. गेल्या १० ते १२ वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाने गाव कारभाऱ्यांना हाताशी धरून गावे कागदोपत्री नंदनवन केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचा पुरवठा करण्यात आला. अनेक गावात हागणदारीमुक्त गाव म्हणून फलक लागले. मात्र, परिस्थिती उलट निर्माण झाली. पुन्हा सुरू झाले ये रे माझ्या मागल्या...ही बाब लक्षात आल्यावर पंचायत समितीने गुड मॉर्निंग पथक तयार करून भल्या पहाटे अनेकांची अडवणूक केली. लोटाबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. एवढे करूनही पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला नाही. गावात कोण आले अन् कोण गेले, याची यत्किंचितही तमा गावकारभाऱ्यांनाही राहिली नाही. केवळ पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर देखावा करण्यासाठी स्टंटबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या गावात मुक्काम ठोकून शौचालय बांधकाम व त्याच्या वापरातून होणाऱ्या फायद्याचे महत्त्व गावकऱ्यांना उद्धृत केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला १२ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांना देण्यात आले. लाभार्थ्यांची यादी घेऊन सरपंच, ग्रामसेवक दारोदारी फिरले. अनुदान मिळणार असल्याचे सांगूनही अनेकांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठांचा रेटा असल्याने स्थानिक पातळीवर शौचालय उभारणीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. रेडिमेड शौचालय स्वस्तात मिळाली. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. स्वत: उत्पादकांनी घरपोच सेवा देत शौचालय उभारून दिले. लाभार्थ्यांनी वापरासाठी तयार असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढली अन् अनुदान पदरी पाडून घेतले. गाव हागणदारीमुक्त झाल्याचा आनंद अधिकाऱ्यांपर्यंत गाव कारभाऱ्यांनी पोहोचविला. अनेक ठिकाणी तर एका रात्रीतून शौचालय उभारण्याचे काम करण्यात आले. हागणदारीमुक्त मुक्त गावाच्या यादीत आपलेही गाव आले पाहिजे, यासाठी कारभाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून तात्पुरते पैसे लावून बांधकाम करून दिले. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता सोय झाल्याने गांभीर्य लाभार्थ्यांना आले नाही. घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात.... 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान