शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 22:01 IST

घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात....

आरोग्य सुदृढ राहावे, साथीचे आजार उद्भवू नये यासाठी शासनाने ग्रामीण भागात विविध उपक्रम हाती घेतले. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना गावोगावी राबविण्यात आली. पण शासनाच्या योजनांची स्थिती म्हणजे पुढे पाठ, मागे सपाट अशी झाली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लाखो  कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले. प्रशासनाने त्यांची दप्तरी तशी नोंद करून घेतली. १०० टक्के शौचालय बांधकाम झालेल्या काही गावांचा हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरवही झाला. गावस्तरावर होणाऱ्या निवडणुकांमध्ये यावर अनेकांनी मतेही मागितली. गेल्या १० ते १२ वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाने गाव कारभाऱ्यांना हाताशी धरून गावे कागदोपत्री नंदनवन केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचा पुरवठा करण्यात आला. अनेक गावात हागणदारीमुक्त गाव म्हणून फलक लागले. मात्र, परिस्थिती उलट निर्माण झाली. पुन्हा सुरू झाले ये रे माझ्या मागल्या...ही बाब लक्षात आल्यावर पंचायत समितीने गुड मॉर्निंग पथक तयार करून भल्या पहाटे अनेकांची अडवणूक केली. लोटाबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. एवढे करूनही पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला नाही. गावात कोण आले अन् कोण गेले, याची यत्किंचितही तमा गावकारभाऱ्यांनाही राहिली नाही. केवळ पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर देखावा करण्यासाठी स्टंटबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या गावात मुक्काम ठोकून शौचालय बांधकाम व त्याच्या वापरातून होणाऱ्या फायद्याचे महत्त्व गावकऱ्यांना उद्धृत केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला १२ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांना देण्यात आले. लाभार्थ्यांची यादी घेऊन सरपंच, ग्रामसेवक दारोदारी फिरले. अनुदान मिळणार असल्याचे सांगूनही अनेकांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठांचा रेटा असल्याने स्थानिक पातळीवर शौचालय उभारणीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. रेडिमेड शौचालय स्वस्तात मिळाली. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. स्वत: उत्पादकांनी घरपोच सेवा देत शौचालय उभारून दिले. लाभार्थ्यांनी वापरासाठी तयार असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढली अन् अनुदान पदरी पाडून घेतले. गाव हागणदारीमुक्त झाल्याचा आनंद अधिकाऱ्यांपर्यंत गाव कारभाऱ्यांनी पोहोचविला. अनेक ठिकाणी तर एका रात्रीतून शौचालय उभारण्याचे काम करण्यात आले. हागणदारीमुक्त मुक्त गावाच्या यादीत आपलेही गाव आले पाहिजे, यासाठी कारभाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून तात्पुरते पैसे लावून बांधकाम करून दिले. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता सोय झाल्याने गांभीर्य लाभार्थ्यांना आले नाही. घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात.... 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान