शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी स्वच्छतागृहे ठरताहेत निरुपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:33 IST

स्वच्छतागृहे उभारण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी स्वच्छतागृहे उभारली, तरी पाणी नसल्याने त्यांचा वापर कठीण बनला आहे.

- राजू नायक

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत २०१९पर्यंत ०.११ अब्ज स्वच्छतागृहे उभारण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी स्वच्छतागृहे उभारली, तरी पाणी नसल्याने त्यांचा वापर कठीण बनला आहे. गुजरात व उत्तराखंड राज्यांनी दोन वर्षांपूर्वीच हागणदारीमुक्त राज्ये म्हणून स्वत:ला घोषित केले असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या आकडेवारीतील तफावत आता जगासमोर आली व त्यांचेच हसे झाले आहे. पाण्याचे नियोजन व वाहून जाणा:या पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन न केल्याचा हा दुष्पपरिणाम आहे. स्वच्छ भारत मोहिमेची यशस्विता आता संपूर्णता पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

स्वच्छ भारत मोहिमेच्या शहरी योजनेत तर पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात कोणतीच मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. जरी त्यात शहरी नागरी संस्थांनी पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी असे म्हटले असले तरी नागरिकांना पाणी पुरवणे पालिकांना मोठीच डोकेदुखी ठरली आहे. स्वच्छ भारत मोहिमेच्या ग्रामीण योजनेत हागणदारीमुक्त गावांमध्ये प्रतिदिनी किमान दरडोई ४० लिटर पाणी पुरवण्याची शिफारस करण्यात आली असली तरी या निकषावर त्यांनी जोर दिलेला नाही. शिवाय या योजनेंतर्गत योग्य निधीची तरतूदही केलेली नाही. स्वच्छ भारत मोहिमेत (ग्रामीण) २०१७-१८ मध्ये १३ हजार ९४८ कोटींची तरतूद केलेली असली तरी प्रत्यक्षात पाणी पुरवठय़ासाठीची तरतूद केवळ सहा हजार कोटी इतकीच होती. कालांतराने पाणी पुरवण्यावरचा अग्रक्रम जाऊन स्वच्छतेला महत्त्व लाभले व अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचे रूपांतर अडगळीच्या खोल्यांमध्ये झालेले दिसते.

स्वच्छता दर्जासंबंधीच्या २०१६च्या तपासणीत आढळून आलेय की स्वच्छ पाण्याच्या अभावी ४० टक्के शहरी स्वच्छतागृहांचा वापरच केला जात नाही. सार्वजनिक व नागरी स्वच्छतागृहांचीही अशीच अवस्था आहे. बंगळूरमध्ये याच कारणासाठी स्वच्छतागृहे विनावापर पडली आहेत. याच अहवालात नोंद आहे की देशातील ग्रामीण भागातील केवळ ४२.५ टक्के शौचालये पाण्याच्या उपलब्धतेमुळे वापरली जातात.

ग्रामीण भागात पाण्याच्या दर्जाकडेही लोकांचे लक्ष असते. जलसंसाधन, नदी विकास व गंगा पुनर्निमाण योजनेत ग्रामीण घरकुलांना ४० एलपीसीडी पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. दुर्दैवाने ते उद्दिष्ट पाळणे त्यांना शक्य झाले नाही. ग्रामीण घरकुलाला प्रतिदिनी ८-१० लिटर पाणी आवश्यक असते. हे पाणी प्रामुख्याने स्वयंपाक, कपडे धुणे यासाठी वापरले जाते. त्यामुळे स्वच्छतागृहे जेथे १५ लिटर पाण्याची आावश्यकता असते- लोकांना दिवास्वप्नच ठरते आहे. पाणी पुरवण्याच्या अभावामुळे महिलांना भल्या पहाटे उठून पाण्याचे डबे घेऊन एकांतवासात शौचासाठी जावे लागते. त्यातून त्यांचे शारीरिक आरोग्य धोक्यात येतेच शिवाय त्यांच्या शाळा किंवा रोजगारावर परिणाम होत असल्याचे जागतिक बँकेने नोंदविले आहे. महिलांचा प्रथम अधिकार म्हणून शौचालयांचे निर्माण होत असल्याचे भासविले जात असले तरी महिला त्यांचा कमीच वापर करू शकतात व त्यांना उघडय़ावर जाणे नशिबी आले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेच्या उद्दिष्टावरच परिणाम झाला आहे. 

स्वच्छ भारत मोहिमेने २०१९ पर्यंत पाण्यावर चालणा-या ०. ११ अब्ज शौचालयांचे निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगले असले तरी सरकारने अद्याप पाण्याच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रित केलेले नाही. ही शौचालये तयार झाल्यानंतर पाण्याची आवश्यकता दुपटीने वाढणार आहे. त्यातून पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईलच शिवाय प्रक्रियेच्या अभावामुळे भूगर्भातील पाणीही प्रदूषित होईल. राजस्थानमध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरोमेंट संस्थेच्या अनिल अग्रवाल कार्यशाळेत तज्ज्ञांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या यशस्वीतेवर भर दिला; परंतु योजनेचे परखड परीक्षण होण्याचीही आवश्यकता व्यक्त केली.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)