शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

आजचा अग्रलेख - गुन्हेगारीचे राजकीयीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 06:50 IST

मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

‘सत्या’ चित्रपटात माफिया टोळीचा गॉडफादर भाऊ ठाकूरदास जावळे महापालिका निवडणुकीत विजयी झालेला असतो. त्याच्या घरात विजयश्रीचा माहोल असतो. निवडणुकीत त्याच्या विजयात सिंहाचा वाटा असलेला मुंबईचा डॉन भिकू म्हात्रे हसत प्रवेश करतो. भाऊला आलिंगन देतो आणि खुर्चीत बसतो. लागलीच भाऊ बंदूक काढून भिकूला गोळी घालतो, असे दृश्य आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी दहिसरमधील मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नामे तथाकथित समाजसेवकाबरोबर फेसबुक लाइव्ह करताना असेच हसत होते. दोघे एकमेकांच्या खांद्यावर थोपटून बरोबर काम करण्याच्या आणाभाका घेत होते. संवाद संपताच अभिषेक हसत उठले आणि मॉरिस भाईने त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव केला. ‘सत्या’ चित्रपटातील पडद्यावरील क्रौर्य वास्तवात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आणि समाजमन हादरून गेले. अभिषेक यांचे शेकडो कार्यकर्ते बाहेर असल्याने गोळीबारानंतर ते आपली खांडोळी करतील, याची कल्पना असल्याने मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

आठवडाभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणमधील शहरप्रमुखावर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला. द्वारली येथील जमिनीच्या वादातून दोन गायकवाड परस्परांच्या जिवावर उठल्याचे दिसले. धक्कादायक म्हणजे आ. गायकवाड यांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्याची कबुली माध्यमांकडे दिली. दहिसरमध्ये मॉरिस भाई नामे समाजसेवक कोरोनाकाळात उदयाला आला. या मॉरिसवर बलात्कारापासून वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कॅसिनो व तत्सम व्यवसायातून त्याने माया गोळा केली, असे सांगितले जाते. त्यातून कोरोनाकाळात त्याने लोकांना अन्नधान्य वाटले. गुरुवारी त्याने अभिषेक यांना साडीवाटपाच्या कार्यक्रमाकरिता बोलावले होते. मॉरिस याच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना अंकुर फुटला होता. हीच गोष्ट अभिषेक यांना खटकली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. बलात्काराच्या आरोपात अभिषेक यांनी आपल्याला गुंतवले, अशी मॉरिसची भावना होती. गेले पाच महिने तुरुंगात असलेला मॉरिस अलीकडेच जामिनावर सुटला होता. अभिषेकचा सूड घ्यायचा, या भावनेने तो पेटला होता. मात्र, मॉरिसने मैत्रीचा हात अभिषेकपुढे केला. मॉरिसचे हे प्रेमाचे उमाळे पूतना मावशीचे प्रेम असल्याची कल्पना राजकारणातील उन्हाळे- पावसाळे पाहिलेल्या अभिषेक यांना व गेली किमान चार दशके दहिसरच्या शिवसेनेच्या राजकारणात असलेले अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर यांना आली नाही.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी नव्वदच्या दशकात ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या विषयावरून महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविरोधात रान उठवले होते. उल्हासनगरचे पप्पू कलानी व वसईचे भाई ठाकूर हे मुंडे यांच्या रडारवर होते. त्याच उल्हासनगरात भाजपचा आमदार गायकवाड पोलिस ठाण्यात मित्रपक्षाच्या नेत्यावर गोळीबार करतो, हा दैवदुर्विलास नव्हे काय? गेल्या ३० वर्षांत परिस्थिती इतकी खराब झालीय की, आता गुन्हेगारीचे राजकीयीकरण झाले आहे. मुंडेंनी एल्गार केला तेव्हा राजकारणातून बळ प्राप्त करून गुन्हेगारी कृत्ये केली जात होती. आता राजकारणात उमेदवारी वाटताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ या गोंडस नावाखाली गुंडांना उमेदवारी दिली जाते. खंडणी, बलात्कार, हत्या, असे आरोप असलेली ही मंडळी पक्षात उजळ माथ्याने प्रवेश देऊन पवित्र केली जातात. निवडून आल्यावर ते आपला पसारा वाढवतात. सत्तेच्या वळचणीला राहून ते आपल्या जुन्या केसेस एकतर बंद करून घेतात किंवा साक्षीदारांना धमकावून सुटका करून घेतात. या गुंडांना पक्ष, वैचारिक बांधीलकी वगैरे गोष्टींचे सोयरसुतक नसते. सत्तेच्या जवळ राहून संरक्षण मिळवणे, एवढा एकच किमान समान कार्यक्रम सर्वपक्षीय गुंडांचा असतो.

मॉरिसला ठाकरेंच्या शिवसेनेने मोठे केले, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे, तर मॉरिस हा सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार होता, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. त्यामधील तथ्य आता कदाचित बाहेर येणार नाही. एका शिवसेनेच्या दोन सेना, तर राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने निवडणुकीत उमेदवारांची वानवा जाणवणार असल्याने सगळेच पक्ष गल्लीबोळांतील गुंड शोधून काढून त्यांना उमेदवारी वाटण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर ‘ए गोली मार भेजे में... अरे, तू करेगा दुसरा भरेगा कल्लू’ हाच शोर कानावर पडणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर