शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - गुन्हेगारीचे राजकीयीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 06:50 IST

मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

‘सत्या’ चित्रपटात माफिया टोळीचा गॉडफादर भाऊ ठाकूरदास जावळे महापालिका निवडणुकीत विजयी झालेला असतो. त्याच्या घरात विजयश्रीचा माहोल असतो. निवडणुकीत त्याच्या विजयात सिंहाचा वाटा असलेला मुंबईचा डॉन भिकू म्हात्रे हसत प्रवेश करतो. भाऊला आलिंगन देतो आणि खुर्चीत बसतो. लागलीच भाऊ बंदूक काढून भिकूला गोळी घालतो, असे दृश्य आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी दहिसरमधील मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नामे तथाकथित समाजसेवकाबरोबर फेसबुक लाइव्ह करताना असेच हसत होते. दोघे एकमेकांच्या खांद्यावर थोपटून बरोबर काम करण्याच्या आणाभाका घेत होते. संवाद संपताच अभिषेक हसत उठले आणि मॉरिस भाईने त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव केला. ‘सत्या’ चित्रपटातील पडद्यावरील क्रौर्य वास्तवात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आणि समाजमन हादरून गेले. अभिषेक यांचे शेकडो कार्यकर्ते बाहेर असल्याने गोळीबारानंतर ते आपली खांडोळी करतील, याची कल्पना असल्याने मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

आठवडाभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणमधील शहरप्रमुखावर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला. द्वारली येथील जमिनीच्या वादातून दोन गायकवाड परस्परांच्या जिवावर उठल्याचे दिसले. धक्कादायक म्हणजे आ. गायकवाड यांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्याची कबुली माध्यमांकडे दिली. दहिसरमध्ये मॉरिस भाई नामे समाजसेवक कोरोनाकाळात उदयाला आला. या मॉरिसवर बलात्कारापासून वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कॅसिनो व तत्सम व्यवसायातून त्याने माया गोळा केली, असे सांगितले जाते. त्यातून कोरोनाकाळात त्याने लोकांना अन्नधान्य वाटले. गुरुवारी त्याने अभिषेक यांना साडीवाटपाच्या कार्यक्रमाकरिता बोलावले होते. मॉरिस याच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना अंकुर फुटला होता. हीच गोष्ट अभिषेक यांना खटकली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. बलात्काराच्या आरोपात अभिषेक यांनी आपल्याला गुंतवले, अशी मॉरिसची भावना होती. गेले पाच महिने तुरुंगात असलेला मॉरिस अलीकडेच जामिनावर सुटला होता. अभिषेकचा सूड घ्यायचा, या भावनेने तो पेटला होता. मात्र, मॉरिसने मैत्रीचा हात अभिषेकपुढे केला. मॉरिसचे हे प्रेमाचे उमाळे पूतना मावशीचे प्रेम असल्याची कल्पना राजकारणातील उन्हाळे- पावसाळे पाहिलेल्या अभिषेक यांना व गेली किमान चार दशके दहिसरच्या शिवसेनेच्या राजकारणात असलेले अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर यांना आली नाही.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी नव्वदच्या दशकात ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या विषयावरून महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविरोधात रान उठवले होते. उल्हासनगरचे पप्पू कलानी व वसईचे भाई ठाकूर हे मुंडे यांच्या रडारवर होते. त्याच उल्हासनगरात भाजपचा आमदार गायकवाड पोलिस ठाण्यात मित्रपक्षाच्या नेत्यावर गोळीबार करतो, हा दैवदुर्विलास नव्हे काय? गेल्या ३० वर्षांत परिस्थिती इतकी खराब झालीय की, आता गुन्हेगारीचे राजकीयीकरण झाले आहे. मुंडेंनी एल्गार केला तेव्हा राजकारणातून बळ प्राप्त करून गुन्हेगारी कृत्ये केली जात होती. आता राजकारणात उमेदवारी वाटताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ या गोंडस नावाखाली गुंडांना उमेदवारी दिली जाते. खंडणी, बलात्कार, हत्या, असे आरोप असलेली ही मंडळी पक्षात उजळ माथ्याने प्रवेश देऊन पवित्र केली जातात. निवडून आल्यावर ते आपला पसारा वाढवतात. सत्तेच्या वळचणीला राहून ते आपल्या जुन्या केसेस एकतर बंद करून घेतात किंवा साक्षीदारांना धमकावून सुटका करून घेतात. या गुंडांना पक्ष, वैचारिक बांधीलकी वगैरे गोष्टींचे सोयरसुतक नसते. सत्तेच्या जवळ राहून संरक्षण मिळवणे, एवढा एकच किमान समान कार्यक्रम सर्वपक्षीय गुंडांचा असतो.

मॉरिसला ठाकरेंच्या शिवसेनेने मोठे केले, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे, तर मॉरिस हा सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार होता, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. त्यामधील तथ्य आता कदाचित बाहेर येणार नाही. एका शिवसेनेच्या दोन सेना, तर राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने निवडणुकीत उमेदवारांची वानवा जाणवणार असल्याने सगळेच पक्ष गल्लीबोळांतील गुंड शोधून काढून त्यांना उमेदवारी वाटण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर ‘ए गोली मार भेजे में... अरे, तू करेगा दुसरा भरेगा कल्लू’ हाच शोर कानावर पडणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर