शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
4
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
5
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
6
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
7
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
8
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
9
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
10
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
11
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
12
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
13
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
14
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
15
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
16
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
17
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
18
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
19
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
20
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - पावसाचा धिंगाणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 09:42 IST

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकाेला, बुलढाणा तसेच खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांत सुमारे पन्नास हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

हवामानातील बदलांची चर्चा नेहमी हाेते आहे. त्यासाठीची कारणे अनेक असली तरी वेळी-अवेळी त्याच्या परिणामांचे फटके वारंवार जाणवू लागले आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता जर पहिली तर याची जाणीव अधिकच तीव्र हाेत आहे. उन्हाळा सुरू हाेताच सर्वत्र सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची पातळी गाठली आहे. उष्माघातापासून सावध राहण्याची सूचना देण्याची आणि केंद्र सरकारला दक्षतेचे उपाय करण्यासाठी नियाेजन करण्याची वेळ आली. त्याच्या परिणामीच महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिंगाेली, परभणी, जालना, आदी जिल्ह्यांत अवकाळी पावसाने गेले तीन-चार दिवस धिंगाणा घातला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातही तुरळक पाऊस; मात्र जाेरदार वाऱ्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. कडकडणाऱ्या विजांसह गारपिटीचा मारा हाेत हाेता. त्याचा माेठा फटका आंबा, संत्री, लिंबू, केळी, आदी पिकांना बसला आहे. उशिरा आलेला गहू, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाल्याचेही अताेनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याची नाेंद घेत नुकसानीची पाहणी करायला सांगितले आहे. त्यामुळे या घटकेला तरी किती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकाेला, बुलढाणा तसेच खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांत सुमारे पन्नास हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अकाेला जिल्ह्यात पिके जमीनदाेस्त झाल्याचा वृत्तान्त आला आहे. अकाेला आणि अमरावती जिल्ह्यांत तर सलग तीन दिवस वारा, विजा आणि पावसाचा धिंगाणा चालू हाेता. याचा सर्वाधिक माेठा फटका लिंबूबागा आणि आंबाबागांना बसला आहे. गतवर्षीच्या हंगामात वेळी-अवेळी झालेल्या पावसाने खरीप तसेच रब्बी पिके साधली नव्हती. उत्पादन घटले आहे. त्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्याचा तडाखा असताना निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाला संकटात टाकले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वांत माेठी गारपीट झाली आहे. त्यात सुमारे १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर तसेच धाराशिव जिल्ह्यात गारपिटीने झाेडपून काढले आहे. सर्वाधिक फटका परभणीला बसला आहे. तीन दिवसांच्या या वादळी पावसाने तिघांचा जीव घेतला आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. घरांची पडझड झाली आहे. विशेषत: वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरांचे माेठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा लाेकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुंतलेली आहे. आमदार-खासदार निवडणूक प्रचारात दंग आहेत. त्यांना वाटते की, ही नेहमीची पावसाची मारझाेड आहे. आपल्या राजकीय वर्चस्वाचे तळे जपण्यात सारे गुंतले आहेत.

जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांची सभागृहे अस्तित्वात नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला काेणालाच सवड नाही, ज्याची-त्याची आपल्या राजकीय भविष्याची चिंता वाढते आहे. दुर्दैव हे की, शेतकरी, शेतमजूर, आदींसाठी झटणाऱ्या संघटनाही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार झाल्या आहेत. पन्नालाल सुराणा थकले, दत्ता देशमुख, बा. ज. राजहंस, संतराम पाटील, माधवराव गायकवाड, आदी मातीशी नाळ असणारी साेन्याच्या ताेलाची माणसं काळाच्या पडद्याआड गेली. अवकाळी किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटाच्या काळात सरकारला गदगदा हलविणारे नेते तथा कार्यकर्त्यांची साखळीच संपली आहे. गेल्या दाेन्ही पिकांच्या हंगामांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याचे पुढे काय झाले याची काेणालाही माहिती नाही. खरीप हंगामात सलग ५० दिवस पाऊस न झाल्याने पिके संकटात आली. गेल्या ऑक्टाेबर महिन्यातच ४० तालुक्यांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र एक पैशाची मदत शेतकऱ्यांना दिली नाही. डिसेंबरमध्ये केंद्र सरकारची नैसर्गिक आपत्ती समिती दुष्काळाची पाहणी करून गेली, त्याला चार महिने झाले. त्यांचे निष्कर्षही समजले नाहीत. केंद्र सरकारने एक पैशाचा निधी दिला नाही. हा मागील बॅकलाॅग असताना, निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना शेतकऱ्यांची अडचण काेणाला दिसणार आहे? बहुतांश सुपर क्लास वन अधिकारी राज्यात किंवा राज्याच्या बाहेर निवडणूक कामात गुंतले आहेत. ४ जूनपर्यंत अर्थात मतमाेजणी हाेईपर्यंत अवकाळी असाे की दुष्काळ, याकडे काेणी लक्ष देणार नाही, हे खरे आहे. सतत बदलत असणाऱ्या हवामानाचा हा फटका एकत्रित परिणाम करून जात असला तरी ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम जाणवताे आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी