शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - काँग्रेसच्या बळावर रयतवारी करणारे शरद पवार ‘जमीनदार’ही झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 11:49 IST

शरद पवार यांना अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका करण्याची सवय आहे. त्यांचा अर्थ काढण्यात अनेक प्रसारमाध्यमे वेळ घालवितात.  मराठी सिनेमामध्ये विनोद म्हणजे द्विअर्थी शब्द किंवा वाक्याचा वापर करण्याचा प्रघात पडला होता.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जे धाडस केले, ते करण्याची तयारी किती राजकीय पक्षांची आहे? शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदाराचे दिलेले उदाहरण सध्याच्या काँग्रेस अवस्थेला चपखल लागू व्हावे असेच आहे

काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. अशा मानसिकतेमुळे काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे,’  असे आज ज्या अवस्थेत काँग्रेस पक्ष आहे त्याचे वर्णन शरद पवार यांनी केेले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी केलेले वर्णन किंवा दिलेले उदाहरण वास्तवाशी जुळणारे असले तरी त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत दोन वेळा काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी वेगळी भूमिका घेतली आणि पुन्हा बदललीदेखील. शिवाय काँग्रेसच्या बळावर रयतवारी करणारे शरद पवार ‘जमीनदार’ही झाले. त्यांची रया गेली नसेल; पण वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या राजकारणाचा पट आकसला गेला हे मान्य करावे लागेल. काँग्रेस नेतृत्वाविषयी अनेकांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. कदाचित सध्याच्या परिस्थितीविषयी अर्थात श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व पुढे आले पाहिजे, असे त्यांना वाटत असावे. भाजपविरोधी देशव्यापी विरोधकांची आघाडी करण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यायला हवा. रया गेली असली तरी काँग्रेसमध्येच ती ताकद आहे, असेही अप्रत्यक्ष ते मान्य करतात.

शरद पवार यांना अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका करण्याची सवय आहे. त्यांचा अर्थ काढण्यात अनेक प्रसारमाध्यमे वेळ घालवितात.  मराठी सिनेमामध्ये विनोद म्हणजे द्विअर्थी शब्द किंवा वाक्याचा वापर करण्याचा प्रघात पडला होता. तसे अनेक अर्थाने शरद पवार बोलत असतात, त्यांचा राजकारणाचा अनुभव मोठा आहे, पण काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध वेगळी भूमिका घेण्याची मन:स्थिती नसते, हे त्यांचे म्हणणे योग्य नाही. अनेकांनी आपली राजकीय कारकीर्द  अडचणीत येणार असताना वैचारिक पातळीवर आणि राजनैतिक सिद्धांतावर वेगळी भूमिका घेऊन संघर्ष केला आहे. त्यांनी स्वत:ही १९७८ आणि १९९९ मध्ये वेगळी भूमिका घेतली. मात्र, कालांतराने त्याच काँग्रेस पक्षाशी तडजोड करून सत्तेतही सहभागी झाले आहेत. वास्तव असे आहे की, काँग्रेसने आपला जनाधार गमावता कामा नये, हे खरे असले तरी वेगळी भूमिका घेऊन पक्षातील लोकशाही संपुष्टात आणून चालेल का? शिवाय त्या ताकदीचे नेतृत्व आज त्या पक्षात कोठे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते के. कामराज यांनी काँग्रेसला नवे वळण घेण्याचे आवाहन करताना मंत्र्यांनी सत्तापदे सोडून पक्षाच्या कामाला वाहून घ्यावे, असे म्हटले होते. त्याला कामराज योजना म्हटले जात असे. मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री, आदी ज्येष्ठ नेत्यांनी आणि सहा मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पदांचे राजीनामे दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छोटा असूनही आजच्या स्थितीत हा प्रयोग करता येत नाही. शरद पवार यांच्यामुळे अजित पवार यांना महाराष्ट्र ओळखतो. ते अजित पवारही न सांगता काय करू शकतात किंबहुना पक्ष नेतृत्वाविषयी वेगळी भूमिका घेऊ शकतात. जी भूमिका शरद पवार यांना पटणारी नाही हे माहीत असूनही त्यांनी ती घेण्याचे धाडस केले. हा काळाचा महिमा आहे. त्याऐवजी भाजपविरोधी यूपीएचा प्रयोग पुन्हा झाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन संघर्षाची तयारी आहे, असे शरद पवार उघड कधी बोलणार आहेत?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जे धाडस केले, ते करण्याची तयारी किती राजकीय पक्षांची आहे? शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदाराचे दिलेले उदाहरण सध्याच्या काँग्रेस अवस्थेला चपखल लागू व्हावे असेच आहे. उत्तर प्रदेशातून काँग्रेस पक्ष १९८९ मध्ये सत्तेबाहेर फेकला गेला. त्याला आता तेहतीस वर्षे झाली. अनेक निवडणुका लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव उतरत्या क्रमानेच झाला आहे. गत लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचाही पराभव अमेठी मतदारसंघातून झाला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसला जनाधार होता; पण त्याचवेळी अनेकांची सत्तेची महत्त्वाकांक्षा सतत जागृत होती. रामजन्मभूमी-बाबरी मशीदसारख्या किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी स्पष्ट भूमिका घेण्याचे धाडस अनेकांकडे नव्हते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल; पण विविध प्रश्नांवर ते भाजपवर तुटून पडतात. त्याचवेळी शरद पवार यांचे अनुयायी किंवा त्यांच्यामुळे ज्यांची राजकीय कारकीर्द घडली असे राष्ट्रवादीचे नेते भाजपला जवळ करतात, याचाही विचार व्हायला हवा. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आदींनी पुढाकार घेतला तसा पुढाकार शरद पवार यांनीदेखील अखिल भारतीय पातळीवर घ्यायला हरकत नाही. त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या आणि नेत्यांच्या मर्यादा त्यांनाही माहीत आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस