शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

आजचा अग्रलेख: जगाची लोकसंख्या ८,००,००,००,०००

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 10:40 IST

World population: भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात. दोनशे अठरा वर्षांपूर्वी, १८०४ मध्ये जगाच्या लोकसंख्येने शंभर कोटींचा आकडा पहिल्यांदा पार केला. त्यानंतरच्या शंभर कोटींची वाढ १२३ वर्षांत झाली. अब्ज लोकसंख्येचा तिसरा टप्पा ३३ वर्षांमध्ये गाठला गेला. दरम्यान, जगाच्या लोकसंख्येचा विस्फोट झाला. चौथा, पाचवा, सहावा टप्पा अवघ्या अनुक्रमे चौदा, तेरा व बारा वर्षांमध्ये गाठला गेला. मार्च २०१२ मध्ये जगाची लोकसंख्या सात अब्ज झाली तर त्यानंतरचा, आजचा टप्पा साडेअकरा वर्षांमध्ये गाठला गेला. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेचा सेन्सस ब्यूरो अशा दोन संस्था लोकसंख्यावाढ माेजतात. त्यांचे अंदाज एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. तथापि, जगभर संयुक्त राष्ट्रसंघ, विशेषत: युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचा अंदाज अधिक ग्राह्य धरला जातो. या आठव्या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आहेत. एकूण जन्मांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण निम्म्याहून थोडे अधिक आहे. गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या एकूण वाढीपेक्षा थोडी अधिक आहे आणि हा वेग कायम राहिला तर साधारणपणे साडेदहा अब्जानंतर लोकसंख्या स्थिर राहील. आणखी पंधरा वर्षांनी नऊ अब्ज, तर त्यानंतर सतरा वर्षांनी दहा अब्जाचा टप्पा पार होईल. २०८० साली साधारणपणे १० अब्ज ४० कोटींनंतर एकविसावे शतक संपेपर्यंत लोकसंख्येत वाढ होणार नाही. त्याआधी एकविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताची लोकसंख्या १६६ कोटी ८० लाख तर चीनची लोकसंख्या १३१ कोटी ७० लाख असेल.

२०१२ पासून वाढलेल्या शंभर कोटींमध्ये मोठा वाटा अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांचा आहे. भारताचा वाटा १७ कोटी ७० लाखांचा, तर सध्या तरी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचा वाटा अवघा ७ कोटी ३० लाखांचा आहे. चीनच्या लोकसंख्येने आताच उणे वाढ सुरू केली आहे. सध्या चीनची लोकसंख्या भारतापेक्षा अवघ्या चार कोटींनी अधिक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. तेव्हा, या प्रचंड लोकसंख्येपुढील आव्हाने कोणती, याचा विचार करावा लागेल. परंपरेने भूक, रोगराई व युद्धे ही मानवी समुदायापुढील प्रमुख संकटे मानली जातात. लोकसंख्येचा विस्फोट होऊनही जगातील बहुतेक टापूंमध्ये भुकेचा प्रश्न मध्ययुगीन कालखंडासारखा भीषण नाही. अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. प्रथिने, स्निग्ध पदार्थ व विविध जीवनसत्त्वांचे काही नवे स्रोत तयार झाले आहेत. पूर्वीसारखे लाखोंच्या संख्येने भूकबळी आता जात नाहीत. तरीही भूक हे जगापुढचे मोठे आव्हान राहीलच. कारण, हवामानबदल व वैश्विक तापमानवाढीमुळे जलसंपत्ती, शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यावर उपायांसाठी गंभीर चर्चा सुरू आहेत.

कोविड विषाणू संक्रमणाचे महासंकट ओढवण्यापूर्वी तर असे मानले जात होते की आता लाखो बळी घेणारी महामारी येणारच नाही. त्या विषाणूने तो गैरसमज असल्याचे सिद्ध केले. तरीदेखील अशा वैश्विक संक्रमणाने सोळाव्या शतकापासून जगाच्या कानाकोपऱ्यात घेतलेल्या बळींचा विचार करता आताच्या महामारीत गेलेले बळी कमीच म्हणता येतील. जगात सध्या युद्ध हवे असे म्हणणारे मोठ्या फरकाने अल्पमतात आहेत. अगदी अलीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून युद्धविरोधी भावना प्रचंड तीव्रतेने व्यक्त झाल्या व त्यापुढे रशियासारख्या महाशक्तीलाही झुकावे लागले. लोकसंख्यावाढीचा विचार करता एक महत्त्वाची प्रक्रिया ही आहे, की मानवी समुदायाचा विकासाच्या वाटेवर प्रवास वेगाने सुरू असताना जन्मदर कमी होतो. शिक्षण, नोकरी किंवा उपजीविकेची साधने शोधताना लग्नाचे वय पुढे पुढे जाते. प्रजननक्षम वयोगट पोटापाण्याच्या प्रश्नांमध्ये गुंतलेला राहतो. परिणामी जन्मदर मंदावतो. दुसऱ्या बाजूला आरोग्याच्या सोयीसुविधा अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, तसेच आहाराचा दर्जा वाढत असल्याने सरासरी आयुर्मान उंचावते. जगात आजघडीला अनेक देशांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या पुढे आहे. ऊर्जेचे वाटप व वापर ही आणखी एक मोठी समस्या आहे. सध्याच अडीच अब्ज जनता स्वयंपाकासाठी गोवऱ्या, लाकूड अशा बायोमासचा वापर करते. दीड अब्जांच्या नशिबात विजेचा उजेड नाही. केवळ त्यांच्या घरातच नव्हे तर आयुष्यातही उजेड पेरण्याचे आव्हान मोठे आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPoliticsराजकारण