शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

आजचा अग्रलेख: जगाची लोकसंख्या ८,००,००,००,०००

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 10:40 IST

World population: भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात. दोनशे अठरा वर्षांपूर्वी, १८०४ मध्ये जगाच्या लोकसंख्येने शंभर कोटींचा आकडा पहिल्यांदा पार केला. त्यानंतरच्या शंभर कोटींची वाढ १२३ वर्षांत झाली. अब्ज लोकसंख्येचा तिसरा टप्पा ३३ वर्षांमध्ये गाठला गेला. दरम्यान, जगाच्या लोकसंख्येचा विस्फोट झाला. चौथा, पाचवा, सहावा टप्पा अवघ्या अनुक्रमे चौदा, तेरा व बारा वर्षांमध्ये गाठला गेला. मार्च २०१२ मध्ये जगाची लोकसंख्या सात अब्ज झाली तर त्यानंतरचा, आजचा टप्पा साडेअकरा वर्षांमध्ये गाठला गेला. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेचा सेन्सस ब्यूरो अशा दोन संस्था लोकसंख्यावाढ माेजतात. त्यांचे अंदाज एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. तथापि, जगभर संयुक्त राष्ट्रसंघ, विशेषत: युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचा अंदाज अधिक ग्राह्य धरला जातो. या आठव्या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आहेत. एकूण जन्मांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण निम्म्याहून थोडे अधिक आहे. गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या एकूण वाढीपेक्षा थोडी अधिक आहे आणि हा वेग कायम राहिला तर साधारणपणे साडेदहा अब्जानंतर लोकसंख्या स्थिर राहील. आणखी पंधरा वर्षांनी नऊ अब्ज, तर त्यानंतर सतरा वर्षांनी दहा अब्जाचा टप्पा पार होईल. २०८० साली साधारणपणे १० अब्ज ४० कोटींनंतर एकविसावे शतक संपेपर्यंत लोकसंख्येत वाढ होणार नाही. त्याआधी एकविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताची लोकसंख्या १६६ कोटी ८० लाख तर चीनची लोकसंख्या १३१ कोटी ७० लाख असेल.

२०१२ पासून वाढलेल्या शंभर कोटींमध्ये मोठा वाटा अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांचा आहे. भारताचा वाटा १७ कोटी ७० लाखांचा, तर सध्या तरी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचा वाटा अवघा ७ कोटी ३० लाखांचा आहे. चीनच्या लोकसंख्येने आताच उणे वाढ सुरू केली आहे. सध्या चीनची लोकसंख्या भारतापेक्षा अवघ्या चार कोटींनी अधिक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. तेव्हा, या प्रचंड लोकसंख्येपुढील आव्हाने कोणती, याचा विचार करावा लागेल. परंपरेने भूक, रोगराई व युद्धे ही मानवी समुदायापुढील प्रमुख संकटे मानली जातात. लोकसंख्येचा विस्फोट होऊनही जगातील बहुतेक टापूंमध्ये भुकेचा प्रश्न मध्ययुगीन कालखंडासारखा भीषण नाही. अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. प्रथिने, स्निग्ध पदार्थ व विविध जीवनसत्त्वांचे काही नवे स्रोत तयार झाले आहेत. पूर्वीसारखे लाखोंच्या संख्येने भूकबळी आता जात नाहीत. तरीही भूक हे जगापुढचे मोठे आव्हान राहीलच. कारण, हवामानबदल व वैश्विक तापमानवाढीमुळे जलसंपत्ती, शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यावर उपायांसाठी गंभीर चर्चा सुरू आहेत.

कोविड विषाणू संक्रमणाचे महासंकट ओढवण्यापूर्वी तर असे मानले जात होते की आता लाखो बळी घेणारी महामारी येणारच नाही. त्या विषाणूने तो गैरसमज असल्याचे सिद्ध केले. तरीदेखील अशा वैश्विक संक्रमणाने सोळाव्या शतकापासून जगाच्या कानाकोपऱ्यात घेतलेल्या बळींचा विचार करता आताच्या महामारीत गेलेले बळी कमीच म्हणता येतील. जगात सध्या युद्ध हवे असे म्हणणारे मोठ्या फरकाने अल्पमतात आहेत. अगदी अलीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून युद्धविरोधी भावना प्रचंड तीव्रतेने व्यक्त झाल्या व त्यापुढे रशियासारख्या महाशक्तीलाही झुकावे लागले. लोकसंख्यावाढीचा विचार करता एक महत्त्वाची प्रक्रिया ही आहे, की मानवी समुदायाचा विकासाच्या वाटेवर प्रवास वेगाने सुरू असताना जन्मदर कमी होतो. शिक्षण, नोकरी किंवा उपजीविकेची साधने शोधताना लग्नाचे वय पुढे पुढे जाते. प्रजननक्षम वयोगट पोटापाण्याच्या प्रश्नांमध्ये गुंतलेला राहतो. परिणामी जन्मदर मंदावतो. दुसऱ्या बाजूला आरोग्याच्या सोयीसुविधा अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, तसेच आहाराचा दर्जा वाढत असल्याने सरासरी आयुर्मान उंचावते. जगात आजघडीला अनेक देशांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या पुढे आहे. ऊर्जेचे वाटप व वापर ही आणखी एक मोठी समस्या आहे. सध्याच अडीच अब्ज जनता स्वयंपाकासाठी गोवऱ्या, लाकूड अशा बायोमासचा वापर करते. दीड अब्जांच्या नशिबात विजेचा उजेड नाही. केवळ त्यांच्या घरातच नव्हे तर आयुष्यातही उजेड पेरण्याचे आव्हान मोठे आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPoliticsराजकारण