शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 07:22 IST

माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो.

शरद पवारांनी ‘लोकमत’ला दिलेली ताजी मुलाखत सध्या चर्चेत आहे. कधी मौन बाळगायचे आणि कधी गौप्यस्फोट करायचे, याचे अचूक ‘टायमिंग’ पवारांकडे असते. यावेळी त्यांनी तेच केले आहे. पवारांच्या गौप्यस्फोटाने दोन दशकांपूर्वीचा काळ जागा झाला. ‘इंडिया शायनिंग’च्या नारेबाजीनंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. मोठ्या विश्रांतीनंतर काँग्रेस सत्तेत आली. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडून स्वतंत्र संस्थान स्थापन करणाऱ्या शरद पवारांना नव्या सरकारमध्ये केवळ पदच नव्हे, तर पंतप्रधानांच्या नंतरचे सन्मानाचे स्थान मिळाले. त्यापूर्वीच महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी सरकार स्थापन केले होते. २००४च्या लोकसभा निकालाने सगळी समीकरणे बदलून गेली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितरीत्या पुन्हा सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ७१ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला ६९. अधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार, असे वाटत असतानाच पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले. १९९९मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते, तर पक्षाची ताकद वाढली असती, असे आजही अनेकांना वाटते. त्यानंतर आजतागायत अशी संधी त्या पक्षाला मिळालेली नाही. वर्षभरापूर्वी ‘लोकमत’लाच दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ही खदखद पहिल्यांदा बोलून दाखवली होती. पवार मात्र याविषयी कधीच काही बोलले नव्हते.

अवघे नऊ खासदार असतानाही काँग्रेसने दिलेल्या सन्मानाची ती परतफेड असावी, असे काहींना वाटले, तर राज्यात अधिक मंत्रिपदे मिळवण्यासाठी पवारांनी हे केल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले होते. प्रत्यक्षात काय घडले?- ‘लोकमत’ला परवा दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हा स्फोट केला. २००४ला सत्ता मिळाली, तेव्हा मुख्यंत्रिपदावर स्वाभाविक हक्क होता छगन भुजबळांचा. कारण, जयंत पाटील वा अजित पवार तेव्हा ‘ज्युनिअर’ होते. भुजबळ मात्र स्पर्धेत होते. १९९१मध्ये शिवसेना सोडून भुजबळ काँग्रेसमध्ये आणि नंतर पवारांसोबत आले. त्यांनी शिवसेना सोडली आणि १९९५मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आले. आधी मनोहर जोशी आणि मग नारायण राणे मुख्यमंत्री झाले. भुजबळ सेनेत असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते! २००४ मध्ये भुजबळांना ही संधी चालून आली होती. मात्र, हेच ते कारण होते की, ज्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद घेतले नाही. “२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे दिले. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होते छगन भुजबळांचे. त्यांचे नंतरचे राजकारण बघा. त्यांना तुरुंगात जावे लागले. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिले असते, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती”, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी या मुलाखतीत केला.  

निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना आणि भुजबळांचा स्वतंत्र आखाडा या रणधुमाळीत उभा असताना पवारांनी असा खुलासा करणे हा योगायोग नाही. “ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावे, या मताचा असल्यानेच मी भुजबळांना बळ दिले. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे देणे किती चूक ठरले असते, हे त्यांच्या पुढील प्रवासाने स्पष्टच झाले”, असेही या मुलाखतीत पवार म्हणाले. भुजबळ सध्या राजदीप सरदेसाईंच्या ‘2024 : The Election That Surprised India’ या पुस्तकातील उल्लेखामुळे अडचणीत आले आहेत. त्याबाबत बोलताना पवार म्हणतात, “ईडीच्या भीतीने हे सगळे तिकडे गेले. त्याला एक आधार आहे. हे तिकडे जाण्याच्या दोनच दिवस अगोदर प्रधानमंत्री या भ्रष्टाचाराविषयी बोलले होते. ‘यांची चौकशी करणार’, असे मोदींनी म्हटले होते. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असावी.” पवार या सगळ्याच कालखंडाचे साक्षीदार आहेत. भुजबळ, अजित पवार यांचे राजकारण पवारांसमोरच घडले. किंबहुना पवारांनी ते घडवले. पवार सांगतात, “यशवंतराव चव्हाण सेंटरला हे सर्व चाळीसेक जण मला भेटायला आले. आपण सर्वजण भाजपसोबत जाऊ, असे म्हणाले. तुम्हाला घेऊन यायला सांगितलेय, असेही सांगितले. मी त्यांना सांगितले- भाजपसोबत जाणे मला शक्य नाही. तुम्ही त्यांच्यासोबत गेल्याने तुमची फाइल टेबलावरून कपाटात जाईल; पण ती नष्ट नाही होणार. कारवाईची टांगती तलवार आहेच. त्यापेक्षा मूल्यांसाठी संघर्ष करू!” माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस