शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 07:22 IST

माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो.

शरद पवारांनी ‘लोकमत’ला दिलेली ताजी मुलाखत सध्या चर्चेत आहे. कधी मौन बाळगायचे आणि कधी गौप्यस्फोट करायचे, याचे अचूक ‘टायमिंग’ पवारांकडे असते. यावेळी त्यांनी तेच केले आहे. पवारांच्या गौप्यस्फोटाने दोन दशकांपूर्वीचा काळ जागा झाला. ‘इंडिया शायनिंग’च्या नारेबाजीनंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. मोठ्या विश्रांतीनंतर काँग्रेस सत्तेत आली. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडून स्वतंत्र संस्थान स्थापन करणाऱ्या शरद पवारांना नव्या सरकारमध्ये केवळ पदच नव्हे, तर पंतप्रधानांच्या नंतरचे सन्मानाचे स्थान मिळाले. त्यापूर्वीच महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी सरकार स्थापन केले होते. २००४च्या लोकसभा निकालाने सगळी समीकरणे बदलून गेली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितरीत्या पुन्हा सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ७१ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला ६९. अधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार, असे वाटत असतानाच पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले. १९९९मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते, तर पक्षाची ताकद वाढली असती, असे आजही अनेकांना वाटते. त्यानंतर आजतागायत अशी संधी त्या पक्षाला मिळालेली नाही. वर्षभरापूर्वी ‘लोकमत’लाच दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ही खदखद पहिल्यांदा बोलून दाखवली होती. पवार मात्र याविषयी कधीच काही बोलले नव्हते.

अवघे नऊ खासदार असतानाही काँग्रेसने दिलेल्या सन्मानाची ती परतफेड असावी, असे काहींना वाटले, तर राज्यात अधिक मंत्रिपदे मिळवण्यासाठी पवारांनी हे केल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले होते. प्रत्यक्षात काय घडले?- ‘लोकमत’ला परवा दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हा स्फोट केला. २००४ला सत्ता मिळाली, तेव्हा मुख्यंत्रिपदावर स्वाभाविक हक्क होता छगन भुजबळांचा. कारण, जयंत पाटील वा अजित पवार तेव्हा ‘ज्युनिअर’ होते. भुजबळ मात्र स्पर्धेत होते. १९९१मध्ये शिवसेना सोडून भुजबळ काँग्रेसमध्ये आणि नंतर पवारांसोबत आले. त्यांनी शिवसेना सोडली आणि १९९५मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आले. आधी मनोहर जोशी आणि मग नारायण राणे मुख्यमंत्री झाले. भुजबळ सेनेत असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते! २००४ मध्ये भुजबळांना ही संधी चालून आली होती. मात्र, हेच ते कारण होते की, ज्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद घेतले नाही. “२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे दिले. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होते छगन भुजबळांचे. त्यांचे नंतरचे राजकारण बघा. त्यांना तुरुंगात जावे लागले. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिले असते, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती”, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी या मुलाखतीत केला.  

निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना आणि भुजबळांचा स्वतंत्र आखाडा या रणधुमाळीत उभा असताना पवारांनी असा खुलासा करणे हा योगायोग नाही. “ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावे, या मताचा असल्यानेच मी भुजबळांना बळ दिले. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे देणे किती चूक ठरले असते, हे त्यांच्या पुढील प्रवासाने स्पष्टच झाले”, असेही या मुलाखतीत पवार म्हणाले. भुजबळ सध्या राजदीप सरदेसाईंच्या ‘2024 : The Election That Surprised India’ या पुस्तकातील उल्लेखामुळे अडचणीत आले आहेत. त्याबाबत बोलताना पवार म्हणतात, “ईडीच्या भीतीने हे सगळे तिकडे गेले. त्याला एक आधार आहे. हे तिकडे जाण्याच्या दोनच दिवस अगोदर प्रधानमंत्री या भ्रष्टाचाराविषयी बोलले होते. ‘यांची चौकशी करणार’, असे मोदींनी म्हटले होते. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असावी.” पवार या सगळ्याच कालखंडाचे साक्षीदार आहेत. भुजबळ, अजित पवार यांचे राजकारण पवारांसमोरच घडले. किंबहुना पवारांनी ते घडवले. पवार सांगतात, “यशवंतराव चव्हाण सेंटरला हे सर्व चाळीसेक जण मला भेटायला आले. आपण सर्वजण भाजपसोबत जाऊ, असे म्हणाले. तुम्हाला घेऊन यायला सांगितलेय, असेही सांगितले. मी त्यांना सांगितले- भाजपसोबत जाणे मला शक्य नाही. तुम्ही त्यांच्यासोबत गेल्याने तुमची फाइल टेबलावरून कपाटात जाईल; पण ती नष्ट नाही होणार. कारवाईची टांगती तलवार आहेच. त्यापेक्षा मूल्यांसाठी संघर्ष करू!” माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस