शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

TET Scam: आजचा अग्रलेख : टीईटी : सापडला तो चोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 05:55 IST

TET Scam: टीईटी गैरव्यवहाराचे गुऱ्हाळ सध्या सुरू आहे. ते काही दिवस चालेल. निलंबन, बडतर्फीची कारवाई होईल. आणखी काही आरोपी गजाआड जातील, अशी अपेक्षा करू; परंतु प्रश्न मुळासकट संपेल का, ही चिंता आहे.  

टीईटी गैरव्यवहाराचे गुऱ्हाळ सध्या सुरू आहे. ते काही दिवस चालेल. निलंबन, बडतर्फीची कारवाई होईल. आणखी काही आरोपी गजाआड जातील, अशी अपेक्षा करू; परंतु प्रश्न मुळासकट संपेल का, ही चिंता आहे.   तूर्त तरी शिक्षण विभागातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी आणि आता मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्याच्या अटकेने कठोर कारवाई सुरू आहे असे चित्र आहे. मुळात जे दिसत आहे, ते हिमनगाचे टोक आहे. कोणत्याही गैरव्यवहारात जो सापडतो, तो चोर ठरतो. मात्र, भरदिवसा जे फायली नाचवत दरोडे टाकतात, त्यातील बहुतेकांना धक्काही लागत नाही. त्यांनी मजबूत आधार शोधलेला असतो. बऱ्याचदा जे सापडतात, ते निराधार असतात. काहीवेळा बळीचे बकरे ठरतात. अर्थात हे सर्व टीईटी गैरव्यवहारात अडकलेल्यांच्या बाबतीत आहे असे नाही.

ताज्या प्रकरणात  ज्यांचे ज्यांचे हात अडकले आहेत, त्यांना सोडता कामा नये. शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे अधिक गांभीर्याने पाहायला हवे. विद्यार्थ्यांचे वर्तमान आणि भविष्य बिघडविणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. प्रत्यक्षात टीईटीवर सत्ताधारी आश्वासक उत्तरे देत नाहीत आणि विरोधक प्रश्न उपस्थित करताना दिसत नाहीत. विशेषत: विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने अथवा सदस्याने टीईटीचा गैरव्यवहार लावून धरलेला नाही. याचा खुलासा होणे आवश्यक आहे. मुळात जी परीक्षा परिषद विश्वासार्ह आणि नावाजलेली होती, ती एकाएकी बदनामीच्या चक्रात कशी अडकत गेली, याचा शोध घेतला पाहिजे. गोपनीयता आणि दर्जा राखण्यात परिषदेने यापूर्वी कसूर केली नव्हती. मात्र, २०१७ पासून परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी शासनाने एजन्सी नेमण्यास सुरुवात केली अन् तिथेच गडबडींना वाव मिळाला.

ज्या परिषदेकडे राज्यातील जिल्हाधिकारी आमच्या परीक्षा घ्या म्हणून प्रतीक्षेत रहायचे, त्या परिषदेचा लौकिक एका खासगी एजन्सीमुळे धुळीस मिळाला. त्यासाठी खूप मोठी साखळी जबाबदार आहे. ती तोडून नव्याने व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. शिक्षण खात्यातील वैयक्तिक मान्यता, संचमान्यता, बिंदूनामावली, शालार्थ आयडी, पवित्र पोर्टल अशा प्रत्येक टप्प्यांवर सुरू असलेला गैरव्यवहार थांबविला पाहिजे. एखादे काम करायचे असेल तर कसे होईल आणि करायचे नसेल, तर कसे होणार नाही, याचा दांडगा अभ्यास असणारे काही कारकून शिक्षणाधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतात. त्या शाळेत शिकलेले अधिकारी पारंगत होऊन उपसंचालक होतात. पुढे आणखी मोठ्या पदांवर जाऊन परीक्षा व्यवस्था ताब्यात घेतात. अशा महाभागांनी शिक्षणक्षेत्र काळवंडले आहे. त्यांचा शोध घेणे, कारवाई करणे मोठी कठीण कामगिरी आहे.

एखादा सनदी अधिकारी प्रकरणात अडकत असला, तरी कैक चांगल्या अधिकाऱ्यांनी उत्तम प्रथा निर्माण केल्या आहेत. टेबलांवर फिरणाऱ्या फायलींना लगाम लावला आहे. जिल्हा परिषदेचा एखादा मुख्य कार्यकारी अधिकारी असे काम नेटाने करू शकतो. त्यात मर्यादा इतकीच की, अधिकारी बदलला की पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न (!) अनेक बहाद्दरांनी एक दिवसाचा शिक्षणाधिकारी पदाचा अधिकार द्या, आम्हाला पुढे निवृत्तिवेतनही नको, असे बोलल्याचे ऐकायला मिळते. इतकेच नव्हे एका दिवसाचा पदभार घेऊन त्याच तारखेच्या शेकडो वैयक्तिक मान्यता दिल्याची प्रकरणे राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जागोजागी सापडतील.  काही कारकून इतके हुशार की, न्यायालयाच्या निकालाचा अर्थ लावण्यातही तरबेज आहेत. काम करायचे असले की, न्यायालयाचा आदेश,  करायचे नसले की, निकालात स्पष्ट आदेश नाहीत, हे सांगायला मोकळे. सगळे याच दिशेने जाणारे आहेत असे अजिबात नाहीत. चांगले कर्मचारी-अधिकारी आहेत, ज्यांच्या बळावर व्यवस्था उभी आहे. त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे.

बहुतेकदा चांगले अधिकारी पदभार घ्यायलाच तयार नाहीत. शैक्षणिक काम बाजूला पडते, केवळ प्रशासकीय कामात शिक्षणाधिकारी अडकून पडतात ही वस्तुस्थिती आहे.  टीईटी गैरव्यवहाराच्या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेतील उणिवा शोधून प्रामाणिक जाणीवेने काम केले, तर बदल घडतील. मध्यंतरी एका सनदी अधिकाऱ्याने शिक्षण विभागासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, अशी भूमिका मांडली होती. अर्थातच, एक अधिकारी नेमून सर्व प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला बदलले पाहिजे. अन्यथा पैसे देऊन टीईटी उत्तीर्ण होणारे उद्याचे शिक्षक विद्यार्थ्यांना नीतिमूल्यांचे धडे तरी कसे देणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाCrime Newsगुन्हेगारी