देशाची राजधानी दिल्लीच्या पाच वेशींवर लाखाे शेतकऱ्यांनी धरणे आंदाेलन सुरू केले आहे. त्याला आता अकरा दिवस हाेऊन गेले. या अकरा दिवसांत केंद्र सरकारच्या प्रतिनिधींबराेबरच्या चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या. आता सहावी फेरी येत्या बुधवारी, ९ डिसेंबरला हाेणार आहे. शेती आणि शेतमालाच्या विक्रीसंबंधीचे तीन कायदे गेल्या सप्टेंबरमध्ये करण्यात आले. या कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने दर्शविली आहे. मात्र, बत्तीस शेतकरी संघटनांच्या चाळीस प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे मत आहे की, तिन्ही कायदेच रद्द करण्यात यावे. वास्तविक, या कायद्यानुसार कृषिमाल विक्रीच्या बाजारपेठेत फारसा बदल हाेणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्राेश करावे असे काही नाही; पण त्याद्वारे शेतकऱ्यांचे कल्याण हाेईल, त्यांच्या कृषिमालाला देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध हाेईल, स्पर्धा वाढून अधिकचा भाव मिळेल, हा सरकारचा दावाही फाेल आहे. अन्नप्रक्रिया उद्याेगात आलेल्या आणि येऊ पाहणाऱ्या पूंजीपतींना यातून अधिक लाभ हाेणार आहे. त्यांनाच दुखविण्याचे पाप माेदी सरकारला करायचे नाही. हाच कळीचा मुद्दा शेतकरी संघटनांनी पकडला आहे.तिन्ही कायदे रद्द करणार नसाल तर त्यात बदल करून किंवा नवा कायदा करून कृषिमालास किमान समर्थनमूल्य देण्याची तरतूद करा. येथेच सरकारचे नाक धरले गेले आहे, हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. सरकार ताेच निर्णय घेण्यास तयार असल्याचे सांगत आहे; पण तसे लेखी आश्वासन देण्यास तयार नाही. शेतकरी प्रतिनिधींबराेबर शनिवारी चर्चेची पाचवी फेरी झाली. तेव्हा दाेन्ही बाजूने ताठर भूमिका घेण्यात आल्याने चर्चा पुढे जायलाच तयार नाही. त्याचा निषेध म्हणून संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधींनी बैठकीतून उठून जाण्याचा निर्णय घेतला हाेता. ते बाहेरही पडले आणि चर्चा करून पुन्हा बैठकीत जाऊन आपल्या हातातील फाइलवर लिहिले की, से ‘एस और नाे’ (सांगा, हाेय की नाही) कायदे रद्द करताे किंवा नाही या एकाच शब्दात उत्तर देण्याची मागणी लावून धरली, तसेच चर्चेत भाग न घेता माैन पाळत बसून राहिले. तेव्हा केंद्रातील भाजप सरकारचे प्रतिनिधीदेखील हतबल झाले. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे ते ‘माैन’च फार बाेलके हाेते. हातात बाेर्ड आणि एका शब्दात उत्तर देण्याची मागणी, ताेंडावर बाेट या गांधीगिरीने सरकारचे प्रतिनिधी काेंडीत पकडले गेले. सरकारला आता माघार घेण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाली आहे; पण हार पत्करायची नाही, अशी नेहमीच विजयाची भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि त्यांचे उजवे-डावे दाेन्ही हात अमितभाई शहा यांना काेण सांगणार?
आजचा अग्रलेख - आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे ‘माैन’ बाेलके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 04:29 IST