शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: भाजपा-शिंदे गटाला दिलासा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‌इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:00 IST

Gram Panchayat Election Result: कुणी किती ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला, यासंदर्भात दोन पक्षांमध्ये तर सोडाच, पण एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही. तरीदेखील ढोबळमानाने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले असे म्हणता येते.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुका काही राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत; परंतु तरीही विविध पक्षांद्वारा यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कुणी किती ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला, यासंदर्भात दोन पक्षांमध्ये तर सोडाच, पण एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही. तरीदेखील ढोबळमानाने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले असे म्हणता येते. ग्रामपंचायत निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना काही अर्थ नाही, हे एका विरोधी नेत्याचे वक्तव्यही सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षांच्या तुलनेत चांगले यश मिळाल्याकडेच अंगुलीनिर्देश करते.

जिल्हानिहाय निकालांवर दृष्टिक्षेप टाकला असता असे निदर्शनास येते, की ज्या जिल्ह्यात ज्या राजकीय पक्षाचे प्राबल्य आहे, त्या जिल्ह्यात त्या पक्षाला चांगले यश मिळाले. पवार घराण्याचा गड असलेल्या बारामतीकडे भाजपने कितीही लक्ष केंद्रित केले असले, तरी पुणे जिल्ह्यात अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच वट आहे, यावर ताज्या निकालांनी शिक्कामोर्तब केले आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाला पर्याय नाही, हे दिसून आले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भाजप नेते अमरिशभाई पटेल यांचा किती दबदबा आहे, हे त्या तालुक्यात भाजपला मिळालेल्या जवळपास शत-प्रतिशत यशामुळे सिद्ध झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाला उत्तम यश मिळाल्याचे दिसत आहे. इतरत्र मात्र स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व दिसले आहे. अर्थात, या निकालांना महाराष्ट्रातील जनमताचे प्रतिबिंब निश्चितच संबोधता येणार नाही.

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती आहेत आणि त्यापैकी जेमतेम सहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे दोन टक्क्यांपेक्षाही कमी ग्रामपंचायतींचा निकाल हा एखाद्या युतीच्या बाजूने अथवा एखाद्या आघाडीच्या विरोधातील कौल आहे, असे म्हणता येणार नाही. शिवाय या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असलेला शहरी मतदार सहभागी नव्हता. याचा अर्थ या निकालांना अजिबात महत्त्वच नाही, असाही होत नाही. मोठ्या निवडणुकांच्या तोंडावर विविध संस्थांद्वारा जी जनमत सर्वेक्षणे केली जातात, त्यांची `सॅम्पल साईज’ ताज्या ग्रामपंचायत निवडणुकांपेक्षाही छोटी असते आणि तरीदेखील बरेचदा त्यांचे निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांशी जुळतात. त्यामुळे भविष्यातील मोठ्या आव्हानांना सामोरे जायचे असलेल्या राजकीय पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही.

राज्यात मोठी उलथापालथ घडवून सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना (शिंदे)साठी हे निकाल नक्कीच दिलासादायक म्हणावे लागतील; कारण त्यांची युती सत्तेत आल्यानंतरची ही पहिलीच कसोटी होती. त्यांनी जे काही केले ते राज्यातील जनतेला अजिबात पसंत पडलेले नाही आणि निवडणुकांमध्ये त्याचे प्रत्यंतर येईल, असे दावे राज्याच्या सत्तेतून बेदखल झालेल्या पक्षांद्वारा सातत्याने केले जात आहेत; परंतु किमान ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरी तसे काही दिसले नाही. या निवडणुकांचे निकाल भाजप-शिवसेना (शिंदे) युतीसाठी जेवढे दिलासादायक आहेत, त्यापेक्षाही जास्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेला इशारा देणारे आहेत.

निकालांसंदर्भात केले जात असलेले दावे-प्रतिदावे वादग्रस्त असले, तरी एक गोष्ट मात्र वादातीत आहे आणि ती म्हणजे या निवडणुकांमध्ये मूळ शिवसेना पाचव्या क्रमांकावर ढकलली गेली! एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली `गद्दारी’ मतदारांना पसंत पडणार नाही आणि मतदारराजा बंडखोरांना व त्यांना साथ देणाऱ्या भाजपला धडा शिकवेल, ही मूळ शिवसेनेची मनीषा किमान सत्तांतरानंतरच्या पहिल्या निवडणुकांमध्ये तरी पूर्ण झालेली नाही. भाजपचे वर्चस्व केवळ शहरी भागांपुरते मर्यादित आहे आणि ग्रामीण भागात मात्र शिवसेनेचाच दबदबा आहे, हे गृहितक पूर्ण सत्य नसल्याचेही ताज्या निकालांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे ठाकरे पितापुत्रांना यापुढे केवळ गद्दारी झाल्याची ओरड करून चालणार नाही, तर संघटना बांधणीकडे जातीने लक्ष पुरवावे लागणार आहे. केवळ निवडणुका जिंकून देणारा बडा चेहरा पुरेसा नसतो, तर त्याला मजबूत संघटनेची जोड तेवढीच आवश्यक असते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मूळ शिवसेनेला तग धरायची असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही!

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना