शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: पुरे झाली बहिणींची परवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:15 IST

योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पंधराशे का होईना; पण दर महिन्याला ठराविक तारखेला नियमितपणे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, इतकी साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पुढे काय होणार, या प्रश्नाच्या उत्तरात सत्ताधारी महायुतीमधील झाडून सगळ्या नेत्यांनी, ‘चिंता करू नका, योजना सुरूही राहील आणि सुरळीतही असेल’, असा निर्वाळा दिला आहे. तो यासाठी पटण्यासारखा की, विधानसभा निवडणुकीत भरभरून मते देणाऱ्या लाडक्या बहिणींना मध्येच वाऱ्यावर सोडणे राजकीयदृष्ट्या सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळेच वित्त मंत्रालय सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आलेला ताण कितीही बोलून दाखवीत असले तरी योजना सुरू ठेवणे सरकारसाठी अपरिहार्य आहे.

हा सरकारसाठी नाजूक विषय बनला आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या ४६ हजार कोटी निधीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण निर्माण झाला आहे. म्हणूनच महिलांना महिन्याचा हप्ता सहज मिळत नाही. दरवेळी मागणी करावी लागते. मग सरकार कोणता तरी सण किंवा एखाद्या दिवसाचा मुहूर्त शोधते आणि खात्यात पैसे जमा करून तो साजरा करते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या एकत्रित हप्त्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा मुहूर्त शोधला गेला आणि आता एप्रिलच्या रकमेसाठी अक्षय्य तृतीयेची वाट पाहिली जात आहे. १५०० रुपयांचीच अशी परवड सुरू असल्याने एव्हाना राज्यातील सव्वा कोटी महिलांनी निवडणुकीतील दरमहा २१०० रुपयांच्या आश्वासनावर फुली मारली असावी. गेल्या जून महिन्यात योजना सुरू झाली तेव्हा अटी-शर्तींचा फार विचार झाला नव्हता. शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या कुटुंबातील महिला आदी अटींची आठवण महायुतीला सत्तेवर आल्यानंतर झाली आणि छाननीतून काही लाख महिलांची नावे वगळली गेली. अशा अपात्र महिलांना दिलेल्या साडेचारशे कोटींपेक्षा अधिक रकमेवर सरकारला पाणी सोडावे लागले. तरीदेखील अशी चाळणी लावण्याला तसा कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. तथापि, योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पंधराशे का होईना; पण दर महिन्याला ठराविक तारखेला नियमितपणे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, इतकी साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. त्याचे कारण सुरुवातीला अर्जप्रक्रिया, पात्रता तपासणी आणि निधी वितरणात प्रशासकीय समन्वयाचा अभाव दिसून आला. अनेक ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात विलंब झाला.

कागदपत्रांची पडताळणी नीट झाली नाही. नारी शक्ती दूत ॲपमधील त्रुटी, ओटीपी सत्यापनात अडथळे यामुळेही अनेक महिलांना अर्ज पूर्ण करण्यात अडचणी आल्या. आता या अडचणी संपल्याचा दावा केला जात असला तरी योजना अजूनही रुळावर आलेली नाही. सोबतच तिला फसवणुकीचा डाग लागला तो वेगळाच. सुरुवातीला काही पुरुषांनीच महिलांच्या नावाने अर्ज भरले. काहींनी एकाच आधार क्रमांकावरून अनेक महिलांचे लाभ उकळले. काही मध्यस्थांनी कागदपत्रे गोळा करताना डेटा चोरला व त्याचा गैरवापर केला. काहींनी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांकडून पैसे मागितल्याचेही उघड झाले. आता मुंबईत उघडकीस आलेला प्रकार मात्र खूप गंभीर आहे.

पाच-सहा जणांची एक टोळी योजनेचा लाभ देण्याच्या आमिषाने अपात्र महिलांची कागदपत्रे व सह्या घेते आणि बचतगट योजनेतून त्यांच्या नावावर एका वित्तीय संस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज काढते. त्या बिचाऱ्या महिलांना या भानगडींची कल्पनाच नसते. कर्जाचे हप्ते थकतात तेव्हा चाैकशी होते आणि सगळा प्रकार उघडकीस येतो. हे प्रकरण अपवादात्मक असण्याची शक्यता कमी आहे. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चाैकस वृत्तीमुळे हे प्रकरण उजेडात आले. इतरत्रही असे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, लाडकी बहीण योजनेच्या सगळ्याच लाभार्थी सुशिक्षित नाहीत. गरीब, अशिक्षित महिलांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञानही पुरेसे नसते. आपल्या माहितीचा, आधारकार्ड व इतर कागदपत्रांचा, सहीचा गैरवापर होऊ शकेल ही जाणीव या महिलांना नसते. अशावेळी सर्व महिलांची माहिती सुरक्षित ठेवण्याची, तिचा गैरवापर होऊ न देण्याची पूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेवर येते. मुंबईतील फसवणुकीचा प्रकार म्हणजे शासन-प्रशासनापुढे कोणत्या नव्या संकटाचे ताट वाढून ठेवले आहे, याची झलक आहे. त्यापासून योग्य तो बोध घेण्याची आणि संबंधित भागातील अधिकाऱ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार