शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आजचा अग्रलेख: इंग्रजी की भारतीय भाषा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:09 IST

English or Indian Language: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशी भाषांच्या वापराचा विषय ऐरणीवर आला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना, भारतीयांच्या डोक्यावरील इंग्रजीचे भूत उतरविण्याचा प्रयत्न केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशी भाषांच्या वापराचा विषय ऐरणीवर आला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना, भारतीयांच्या डोक्यावरील इंग्रजीचे भूत उतरविण्याचा प्रयत्न केला. चांगली इंग्रजी बोलता येणे हे याेग्यतेचे प्रमाण नव्हे आणि इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळा-महाविद्यालयांतून शिकण्याने कुणी बुद्धिवादी ठरत नाही, अशा आशयाची त्यांची मांडणी नाकारता येणारी नाही. न्यायव्यवस्थेपुढे समाजमाध्यमांचे आव्हान मोठे आहे. सध्याचे न्यायाधीश सोशल मीडियाच्या वातावरणात वाढलेले नाहीत. नवमाध्यमामुळे व्यवस्था अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल तशी न्यायालये, न्यायाधीश, वकील या घटकांची जबाबदारी वाढते. तेव्हा, भारतीय भाषांमध्ये न्यायालयाचे कामकाज व निकाल, तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवावा लागेल, हे खरे. पण, तंत्रज्ञानाच्या वापराच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात, असे सरन्यायाधीश म्हणाले.

इंग्रजीचे अवडंबर का तर ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. इंग्रजी ही सरकारी व्यवहाराची भाषा राहिली. थॉमस बेबिंग्टन ऊर्फ लॉर्ड मेकॉले यांच्या सूचनेनुसार ब्रिटिशांनी भारतीय शिक्षण पद्धतीत वसाहतवादाला पोषक बदल केले. ब्रिटिशांना केवळ कारकून तयार करायचे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या व्यवस्थेत शिकलेले, त्यातही आयसीएस वगैरे सनदी पदव्या घेतलेेले आणि इंग्रजीवर प्रभुत्व असलेले वकील, बॅरिस्टर यांचा समाजकारण, राजकारणावर प्रभाव राहिला. भारतातील अभिजात भाषांचा विचार करता ते नैसर्गिक नसले तरी स्वाभाविक मात्र होते. तो प्रभाव स्वातंत्र्यानंतरही कायम राहिला आणि केवळ हे भारतातच घडले असे नाही. सध्या ज्यांना राष्ट्रकुल गटाचे सदस्य म्हणून ओळखले जाते त्या पूर्वीच्या ब्रिटिश वसाहतींमधील सगळ्याच राष्ट्रांची इंग्रजीबाबत ही स्थिती आहे.

फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज अशा इतर युरोपीयनांनी जगाच्या ज्या भागावर कित्येक दशके, शतक-दोन शतक राज्य केले, तिथे त्या त्या भाषेबद्दल असेच आहे. त्यामुळेच स्पॅनिश चायनीज मँडरिननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा ठरते. असो. भारतीय भाषांचा विचार करता आणखी बरेच काही महत्त्वाचे घडत आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशाच्या विविध राज्यांमध्ये सध्या वैद्यक व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची पुस्तके प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करण्याची मोहीम सुरू आहे. त्या-त्या राज्यांमध्ये अशा काहीशा जटिल व तांत्रिक अभ्यासक्रमांच्या मातृभाषेतील पुस्तकांच्या प्रकाशनांचे मोठे सोहळे आयोजित केले जात आहेत. दक्षिण भारतात इंग्रजीचा प्रभाव खूप मोठा आहे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक वगैरे राज्यांमधील भाषिक अस्मिता हा नेहमीच चर्चेचा, झालेच तर वादाचा विषय राहिला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया सिमेंटच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात चेन्नई येथे बोलताना त्यांनी, भलेही तुम्ही हिंदीचा विरोध करीत असला तरी विज्ञान व अभियांत्रिकी विषय तरी तमिळ भाषेत शिकू द्या, असे आवाहन तिथल्या राज्य सरकारला केले आहे. प्रादेशिक भाषांमधील अभ्यासक्रमाच्या निम्म्या जागा रिक्त असल्याबद्दल त्यांनी खंत व चिंताही व्यक्त केली. तेव्हा, विद्यार्थ्यांच्या आकलनाचा विचार करता भारतीय भाषांमधील अभ्यासक्रमाचे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

विद्यार्थ्यांना एखादा विषय, त्यातही गणित, विज्ञान यांसारखे कठीण वाटणारे विषय मातृभाषेत शिकविले तर त्यातील संकल्पना लवकर व सहज आत्मसात व्हायला तसेच इंग्रजी भाषेतील संकल्पनांचा मानसिक दबाव झुगारण्यास मदत होते, यात दुमत नाही. तथापि, या मोहिमेपुढील आव्हान  केवळ भाषेचे नाही. एखादा तांत्रिक विषय इंग्रजीतून शिकलेल्यांना तो अधिक समजलेला असतो, त्या क्षेत्रातील जागतिक परिप्रेक्ष्याची जाणीव त्यांना असते आणि त्यामुळे इंग्रजी भाषेत शरीरविज्ञान, शरीररचनाशास्त्र, चिकित्सा किंवा स्थापत्य, रसायन, ऊर्जा, अंतराळ अभियांत्रिकी शिकलेल्यांचे आकलन अधिक असते, ही समाजाची धारणा आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे असे नाही. परिणामी, देशी भाषांमध्ये आरोग्य व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्यांची प्रतिभाही त्याच दर्जाची आहे, हे सिद्ध व्हायला वेळ लागेल. ते सिद्ध करण्याची जबाबदारी हे शिक्षण मातृभाषेत घेणारे तसेच मातृभाषांना बळ देण्याची भूमिका घेणारी या दोहाेंचीही आहे. सोबत दृष्टिकोनही भाषेविषयी अतिरेकी प्रेमाचा किंवा दुस्वासाचा नको. देशी किंवा विदेशी भाषांच्या क्षमता आणि मर्यादा दोन्हींचा विचार करून सुवर्णमध्य साधायला हवा.

टॅग्स :englishइंग्रजीhindiहिंदीmarathiमराठी