शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: भागवतांचा सुविचार संग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:12 IST

Mohan Bhagwat: देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. काँग्रेसने राम मंदिर उभारणीला मदत केली असती, तर संघाने काँग्रेसलाही मदत केली असती, असे ते म्हणाले आहेत. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत सरसंघचालक व्याख्याने देत आहेत, प्रश्नोत्तरे करीत आहेत. त्यापैकी एक समारंभ रविवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये झाला. तिथे बोलताना संघाच्या राजकीय भूमिकेसोबत त्यांनी संघाचे स्वरूप, संघावर होणाऱ्या मुस्लीम-ख्रिश्चनद्वेषाच्या आरोपांबद्दलही मते मांडली. धार्मिक विद्वेषाचे देशातील सध्याचे वातावरण पाहता संघावर बंदी घालण्याची भाषा ज्या कर्नाटकमधून झाली तिथेच सरसंघचालक बोलल्याने या विधानांना वेगळे महत्त्व आहे.

कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असल्यामुळे राम मंदिर उभारणीच्या अनुषंगाने डाॅ. भागवत यांच्या राजकीय दृष्टिकोनालाही वेगळा संदर्भ आहे. याशिवाय त्यांनी स्पष्ट केले की, पुढच्या दोन दशकांत संघकार्याची दिशा काय असेल, तर हिंदू समाज एकजूट, संघटित, गुणसंपन्न करणे आणि त्या माध्यमातून समृद्ध व सशक्त भारत उभा करणे. अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मुस्लीम धर्मीयांसाठी काही शैक्षणिक उपक्रम राबविणार का, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले, ‘असे उपक्रम राबविणे हे काही संघाचे काम नाही. संघ केवळ शाखा चालवितो आणि त्या शाखांमध्ये माणूस घडवितो. शाखेत घडलेले असे स्वयंसेवक नंतर बाहेर जे काही करतात त्याच्याशी संघाचा संबंध असतोही आणि नसतोही. म्हणजे, चांगले काम केले तर संघ मदत करतो. परंतु, स्वयंसेवकांच्या सगळ्याच कामांची जबाबदारी संघ घेत नाही. आम्ही व्यक्तींसाठी काहीच करीत नाही, तर त्यांनी स्वत:साठी काहीतरी करावे, यासाठी प्रयत्न करतो. कारण, खुद्द परमेश्वरदेखील जे स्वत:साठी काही करतात, प्रयत्न करतात त्यांनाच मदत करतो! मुळात हिंदूंमधील ब्राह्मण किंवा अन्य जातीचा माणूस म्हणून अथवा मुस्लीम, ख्रिश्चन अशा अन्य धर्माच्या लोकांना संघ स्वीकारत नाही. ती वेगळी ओळख दूर ठेवून भारतमातेचे सुपुत्र म्हणून ते संघात आले, तर त्यांचे स्वागत केले जाते.’- थोडक्यात, धार्मिक, सामाजिक व राजकीय सुविचारांचा संग्रह होईल, इतकी सारी विधाने सरसंघचालकांनी केली आहेत. साहजिकच संघ नेमका काय आहे, हे शोधणाऱ्यांना या विधानांबद्दल उत्सुकता वाटावी. तथापि, या साऱ्याच्या मदतीने या संघटनेची व्याख्या करता येईलच असे काही नाही. कारण, ते सारे सुविचार आहेत. ही संदिग्ध विधाने संभ्रम वाढविणारी, काही प्रश्न पुन्हा उपस्थित करणारी आहेत.

संघाची अधिकृतपणे नोंदणी नाही, कारण संघ १९२५ साली म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापन झाला हे कारण सरसंघचालकांनी दिले आहे. हाच नियम अन्य संघटनांनाही लावता येईल. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली. भारतीय राज्यघटनेच्या चाैकटीतील संघटनेची योग्य घटना आणि राष्ट्रध्वजासह विविध राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान या अटींवर ती उठविण्यात आली. मुस्लीमद्वेष हा संघावरील चिरंतन आरोप आहे. त्यासाठी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थाॅट्स’ या मार्गदर्शक ग्रंथाकडे बोट दाखविले जाते. हा ग्रंथ गुरुजींच्या भाषणांचे संकलन आहे आणि त्यातील सगळ्याच गोष्टी वर्तमानाला लागू होत नाहीत, असे स्वत: डाॅ. भागवत काही वर्षांपूर्वी म्हणाले हे खरे. परंतु, तो पूर्ण ग्रंथ नाकारण्यात आलेला नाही. हिंदू समाजाची एकी व बळकटीकरण हा संघाचा हेतू मुस्लीमद्वेषाइतकाच चिरंतन आहे. तथापि, हिंदूंच्या एकजुटीचा अर्थ गैरहिंदूंचा द्वेष होत नाही. तरीदेखील धर्म व जातींची वैयक्तिक ओळख दूर ठेवून भारतमातेचा सुपुत्र म्हणून संघात येण्याची सवलत सरसंघचालकांनी देण्याचे स्वागत करायला हवे. तसे झाले, तर संघ अधिक व्यापक होईल हे नक्की. तथापि, एखादी अल्पसंख्याक व्यक्ती भारतमातेचा खरा सुपुत्र किंवा देशभक्त आहे की नाही हे कोण ठरविणार, हा प्रश्न आहेच. धर्माच्या आधारावर केवळ देशभक्तीची प्रमाणपत्रेच नव्हे, तर नागरिकता देण्याच्या काळात हा प्रश्न अधिक ठळक बनतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagwat's Collection of Wise Thoughts: An Editorial Overview

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat's recent statements on the organization's stance, political neutrality, and inclusion have sparked debate. His remarks on Hindu unity, minority outreach, and the RSS's historical context raise questions about its evolving role in India.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ