शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

आजचा अग्रलेख: भागवतांचा सुविचार संग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:12 IST

Mohan Bhagwat: देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. काँग्रेसने राम मंदिर उभारणीला मदत केली असती, तर संघाने काँग्रेसलाही मदत केली असती, असे ते म्हणाले आहेत. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत सरसंघचालक व्याख्याने देत आहेत, प्रश्नोत्तरे करीत आहेत. त्यापैकी एक समारंभ रविवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये झाला. तिथे बोलताना संघाच्या राजकीय भूमिकेसोबत त्यांनी संघाचे स्वरूप, संघावर होणाऱ्या मुस्लीम-ख्रिश्चनद्वेषाच्या आरोपांबद्दलही मते मांडली. धार्मिक विद्वेषाचे देशातील सध्याचे वातावरण पाहता संघावर बंदी घालण्याची भाषा ज्या कर्नाटकमधून झाली तिथेच सरसंघचालक बोलल्याने या विधानांना वेगळे महत्त्व आहे.

कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असल्यामुळे राम मंदिर उभारणीच्या अनुषंगाने डाॅ. भागवत यांच्या राजकीय दृष्टिकोनालाही वेगळा संदर्भ आहे. याशिवाय त्यांनी स्पष्ट केले की, पुढच्या दोन दशकांत संघकार्याची दिशा काय असेल, तर हिंदू समाज एकजूट, संघटित, गुणसंपन्न करणे आणि त्या माध्यमातून समृद्ध व सशक्त भारत उभा करणे. अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मुस्लीम धर्मीयांसाठी काही शैक्षणिक उपक्रम राबविणार का, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले, ‘असे उपक्रम राबविणे हे काही संघाचे काम नाही. संघ केवळ शाखा चालवितो आणि त्या शाखांमध्ये माणूस घडवितो. शाखेत घडलेले असे स्वयंसेवक नंतर बाहेर जे काही करतात त्याच्याशी संघाचा संबंध असतोही आणि नसतोही. म्हणजे, चांगले काम केले तर संघ मदत करतो. परंतु, स्वयंसेवकांच्या सगळ्याच कामांची जबाबदारी संघ घेत नाही. आम्ही व्यक्तींसाठी काहीच करीत नाही, तर त्यांनी स्वत:साठी काहीतरी करावे, यासाठी प्रयत्न करतो. कारण, खुद्द परमेश्वरदेखील जे स्वत:साठी काही करतात, प्रयत्न करतात त्यांनाच मदत करतो! मुळात हिंदूंमधील ब्राह्मण किंवा अन्य जातीचा माणूस म्हणून अथवा मुस्लीम, ख्रिश्चन अशा अन्य धर्माच्या लोकांना संघ स्वीकारत नाही. ती वेगळी ओळख दूर ठेवून भारतमातेचे सुपुत्र म्हणून ते संघात आले, तर त्यांचे स्वागत केले जाते.’- थोडक्यात, धार्मिक, सामाजिक व राजकीय सुविचारांचा संग्रह होईल, इतकी सारी विधाने सरसंघचालकांनी केली आहेत. साहजिकच संघ नेमका काय आहे, हे शोधणाऱ्यांना या विधानांबद्दल उत्सुकता वाटावी. तथापि, या साऱ्याच्या मदतीने या संघटनेची व्याख्या करता येईलच असे काही नाही. कारण, ते सारे सुविचार आहेत. ही संदिग्ध विधाने संभ्रम वाढविणारी, काही प्रश्न पुन्हा उपस्थित करणारी आहेत.

संघाची अधिकृतपणे नोंदणी नाही, कारण संघ १९२५ साली म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापन झाला हे कारण सरसंघचालकांनी दिले आहे. हाच नियम अन्य संघटनांनाही लावता येईल. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली. भारतीय राज्यघटनेच्या चाैकटीतील संघटनेची योग्य घटना आणि राष्ट्रध्वजासह विविध राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान या अटींवर ती उठविण्यात आली. मुस्लीमद्वेष हा संघावरील चिरंतन आरोप आहे. त्यासाठी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थाॅट्स’ या मार्गदर्शक ग्रंथाकडे बोट दाखविले जाते. हा ग्रंथ गुरुजींच्या भाषणांचे संकलन आहे आणि त्यातील सगळ्याच गोष्टी वर्तमानाला लागू होत नाहीत, असे स्वत: डाॅ. भागवत काही वर्षांपूर्वी म्हणाले हे खरे. परंतु, तो पूर्ण ग्रंथ नाकारण्यात आलेला नाही. हिंदू समाजाची एकी व बळकटीकरण हा संघाचा हेतू मुस्लीमद्वेषाइतकाच चिरंतन आहे. तथापि, हिंदूंच्या एकजुटीचा अर्थ गैरहिंदूंचा द्वेष होत नाही. तरीदेखील धर्म व जातींची वैयक्तिक ओळख दूर ठेवून भारतमातेचा सुपुत्र म्हणून संघात येण्याची सवलत सरसंघचालकांनी देण्याचे स्वागत करायला हवे. तसे झाले, तर संघ अधिक व्यापक होईल हे नक्की. तथापि, एखादी अल्पसंख्याक व्यक्ती भारतमातेचा खरा सुपुत्र किंवा देशभक्त आहे की नाही हे कोण ठरविणार, हा प्रश्न आहेच. धर्माच्या आधारावर केवळ देशभक्तीची प्रमाणपत्रेच नव्हे, तर नागरिकता देण्याच्या काळात हा प्रश्न अधिक ठळक बनतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagwat's Collection of Wise Thoughts: An Editorial Overview

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat's recent statements on the organization's stance, political neutrality, and inclusion have sparked debate. His remarks on Hindu unity, minority outreach, and the RSS's historical context raise questions about its evolving role in India.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ