शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

आजचा अग्रलेख: फसव्या क्रांतीला घरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:54 IST

Naxalites: आणखी वर्षभरात हा संपूर्ण टापू कित्येक दशकांच्या हिंसाचारातून नक्की मुक्त होईल, याची खात्री देणारे यश सुरक्षा दलांनी गरियाबंद जिल्ह्यात नोंदविले आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अडतीस वर्षे नक्षल चळवळीत घालविलेली विमला चंद्रा सिडाम उर्फ ताराक्का इतर बारा माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांना शरण आली. त्यानंतर पाचच दिवसांत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पोलिसांचे वाहन स्फोटात उडविले. आठ जवानांसह नऊ जण मारले गेले आणि मध्य भारत माओवाद्यांच्या कचाट्यातून सोडविण्याच्या गृहखात्याच्या घोषणेकडे लक्ष गेले. माओवाद्यांनी त्यांचे अस्तित्व दाखवून दिल्याचे बोलले गेले. तथापि, तसे अजिबात नाही. आणखी वर्षभरात हा संपूर्ण टापू कित्येक दशकांच्या हिंसाचारातून नक्की मुक्त होईल, याची खात्री देणारे यश सुरक्षा दलांनी गरियाबंद जिल्ह्यात नोंदविले आहे. गरियाबंद या जिल्हा मुख्यालयापासून दक्षिणेला मैनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुल्हाडघाट, भालूडिग्गी भागात रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत छत्तीसगड व ओडिशा पोलिसांच्या प्रशिक्षित जवानांनी किमान चाैदा नक्षल्यांचा खात्मा केला आहे. घनदाट जंगलात जवळपास १५ किलोमीटर पायी जाऊन जवानांनी ही मोहीम राबविली.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर बहिष्कारासाठी माओवाद्यांचा गट मोर्चेबांधणी करीत असताना जवानांनी त्यांना टिपले. मृतदेहांजवळ एके-४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रे, संपर्काची साधने, रोख रक्कम सापडली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण हा भाग अतिदुर्गम आहे. महत्त्वाचे म्हणजे छत्तीसगड, ओडिशा राज्यांच्या पोलिसांनी १ कोटी रुपयांचे बक्षीस लावलेला प्रताप रेड्डी उर्फ जयराम उर्फ चलपती हा या चकमकीत मारला गेला आहे. तो माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य तसेच ओडिशा-आंध्र  राज्याचा प्रमुख होता. चलपतीचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. कारण, तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत मारल्या गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे याच्यानंतर तोच मोस्ट वाँटेड माओवादी होता. त्याच्या मृत्यूमुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले गेले नसेल तरच नवल. गरियाबंद हे जिल्हा मुख्यालय नेहमी बातम्यांमध्ये असलेल्या बस्तरच्या पूर्वेला महानदीच्या खोऱ्यात, छत्तीसगड व ओडिशा राज्यांच्या सीमेवर आहे. गरियाबंदच्या पूर्वेकडे ओडिशातील बालनगीरचा मैदानी भाग आणि त्यापुढे कालाहंडीचा आदिवासीबहुल जंगलप्रदेश आहे. याचा अर्थ असाही निघतो की, पश्चिमेकडे बस्तर किंवा गडचिरोली या पूर्वी अधिक सुरक्षित असलेल्या भागात सुरक्षा दलांनी एकापाठोपाठ एक मोहिमा राबविल्याने खिळखिळे झालेल्या माओवाद्यांनी आता पूर्वेकडे बस्तान हलविले आहे. आता सुरक्षा यंत्रणा आणि माओवाद्यांमधील ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे. गरियाबंदच्या चकमकीला पोलिसांनी घेतलेला बदला म्हणणे आपल्या शूर जवानांवर अन्याय करणारे आहे.

कधी कधी गस्त घालताना सुरक्षा दलांच्या जवानांकडून एखादी चूक होते आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागते. या महिन्याच्या व वर्षाच्या प्रारंभी बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात हुतात्मा झालेले आठ जवान व त्यांच्या वाहनाच्या चालकाचा मृत्यू असाच पुरेशी दक्षता न घेतल्याने झाला. योग्य नियोजन केले, काळजी घेतली तर किती सफाईदारपणे मोहीम फत्ते केली जाऊ शकते, हे तीन वर्षांपूर्वी मिलिंद तेलतुंबडे मारला गेला तेव्हाच्या चकमकीतून दिसून आले. त्रेसष्ट गुन्हे व पन्नास लाखांचे इनाम डोक्यावर असलेल्या तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांना गडचिरोली पोलिसांनी कंठस्नान घातले तेव्हा एकाही जवानाला साधे खरचटलेदेखील नव्हते. अशीच दक्षता आता माओवाद्यांच्या विराेधातील लढाई अंतिम टप्प्यात असताना घेणे गरजेचे आहे. सशस्त्र क्रांतीच्या नावाखाली आदिवासी मुला-मुलींना रक्तपाताच्या मार्गाला लावण्याची योजना आता शेवटचे आचके द्यायला लागली आहे. क्रांतीच्या बाता करणाऱ्यांना आता स्वत:च्या जिवाची भ्रांती सतावते आहे. खाणकाम, पोलाद उद्याेग, रोजगारनिर्मिती, शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा, रस्ते व रेल्वेचे जाळे आदींच्या माध्यमातून मध्य भारताचा हा सगळा टापू आता विकासाच्या दिशेने झेप घेऊ लागला आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने या भागातील आदिवासी बायाबापड्यांना पडू लागली आहेत. त्या स्वप्नांचा रक्तपाताने भंग होणार नाही याची काळजी धाडसी सुरक्षा दलांकडून घेतली जात आहे. हिंसाचाराचा शेवट जवळ येऊ लागला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीIndiaभारत