शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

संकटात सापडलेल्या प्रेमाला सुडाचे नख लागू नये म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2023 07:58 IST

‘ऑनर किलिंग’ रोखण्यासाठी सरकार पोलिस बंदोबस्तातील सुरक्षागृहे उभारणार आहे. आंतरजातीय विवाहामुळे संकटातल्या जोडप्यांना तिथे सुरक्षित निवास मिळेल!

कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जातपंचायत विरोधात लढा सुरू केला. राज्यात घडणाऱ्या अनेक ऑनर किलिंगच्या घटनांमागे जातपंचायतींचा हात असतो. देशात सर्वत्र  जातपंचायती अस्तित्वात आहेत. हरयाणात तिला खाप पंचायत म्हणतात. तिथे सगोत्र विवाह केलेल्या जोडप्यांचा जीव घेतला जातो. ऑनर किलिंग रोखण्यासाठी तिथे प्रत्येक जिल्ह्यात  पोलिस संरक्षणात सुरक्षागृहे उभारण्यात आली आहेत. नातेवाइकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्याने जिवाची भीती असणाऱ्या जोडप्यास तिथे ठरावीक काळासाठी राहण्याची सोय केली जाते. दोघांच्या नातेवाइकांना बोलावून कायद्याची जाणीव करून देत त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यामुळेच हरयाणात ऑनर किलिंगचे प्रमाण कमी झाले आहे. अशी सुरक्षागृहे महाराष्ट्रात व्हावी, अशी मागणी अंनिसने सरकारकडे वारंवार केली होती. शक्ती वाहिनीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर निर्णय देताना ‘अशी सुरक्षागृहे उभारावीत’, असे निर्देश राज्यांना  देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे.

ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृहे उभारणार आहे. जोडप्यांना तिथे निवासासोबत सुरक्षा पुरवली जाईल. गरजेनुसार आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एक वर्षापर्यंत सुरक्षागृहाची ही सोय जोडप्यांना पुरविली जाणार आहे. ही सेवा  नाममात्र शुल्क घेऊन पुरवली जाईल. गृह विभागाकडून तसे जाहीर करण्यात आले आहे. जातपंचायत मूठमाती अभियानाने महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

ऑनर किलिंग म्हणजे भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला दिलेल्या जीविताच्या, स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या मूलभूत अधिकारावरच घाला होय! तरुण मुला-मुलींमध्ये त्यामुळे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरत असते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना  आता पायबंद घातला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात यापुढे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येतील. त्यात जिल्हा समाजकल्याण आधिकारी यांचा सदस्य म्हणून, तर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश असेल. आंतरजातीय व  आंतरधर्मीय विवाहासंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल घेऊन हा कक्ष तत्काळ कार्यवाही करेल, असे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. पोलिसांच्या विशेष कक्षामार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईचा तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे.

आंतरजातीय,  आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या  जोडप्यांना धमकी आल्यास व तशी तक्रार प्राप्त झाल्यास अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने एका आठवड्याच्या आत तपास करून अहवाल सादर करायचा आहे. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करायची आहे. अशा जोडप्यांना संरक्षण द्यायचे आहे. विवाहेच्छुकांना आवश्यक साहाय्य करायचे आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यास जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखविणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर व इतर अधिकाऱ्यांवरही सेवा नियमानुसार कारवाई करावी, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. आता लवकरच राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. 

एक मात्र खरे की या निर्णयामुळे राज्याची पुरोगामित्वाची परंपरा अधिक उज्ज्वल होईल! krishnachandgude@gmail.com

 

टॅग्स :Policeपोलिस