शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:00 IST

नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली.

दोन दशकांपूर्वी ‘गदर’ हा हिंदी चित्रपट खूप गाजला होता. फाळणीच्या पार्श्वभूमीवर एक शीख युवक आणि पाकिस्तानातील तालेवार मुस्लीम घराण्यातील युवतीदरम्यान फुललेले प्रेम आणि ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी समाज, परंपरांविरुद्ध पुकारलेले बंड, अशी त्या चित्रपटाची कथा ढोबळमानाने सांगता येईल. त्या चित्रपटाशी साम्य सांगणाऱ्या एका प्रत्यक्षातील प्रेमकथेचा पट सध्या उलगडत आहे. सीमा हैदर नावाची पाकिस्तानी विवाहित महिला पबजी गेम खेळताना सचिन मीना नामक भारतीय युवकाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत आयुष्य घालविण्यासाठी तिच्या चार मुलांना घेऊन दुबई व नेपाळमार्गे चक्क भारतात पोहोचली !

सचिनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की त्यांनी मार्चमध्येच नेपाळची राजधानी काठमांडूत लग्न केले होते. त्यासाठी सीमा विमानाने काठमांडूला पोहोचली होती. दोघांनी काही दिवस नेपाळमध्ये एकत्र घालवले. नंतर सीमा पाकिस्तानात परत गेली आणि १२ लाख पाकिस्तानी रुपयांत तिचे घर विकले. त्या पैशातून तिने विमानाची तिकिटे घेतली आणि स्वत: व मुलांसाठी नेपाळी व्हिजा मिळवला. त्यानंतर मे महिन्यात ती मुलांसह दुबईमार्गे पुन्हा नेपाळला पोहोचली. त्या देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पोखरा येथे तिने काही दिवस घालविले. नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली.

सीमाकडे भारताचा ‘व्हिजा’ नव्हता. त्यामुळे एका वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्यासोबतच सचिन आणि त्याच्या वडिलांनाही अटक केली. तिघांनाही १४ दिवस कोठडीत काढल्यावर जामीन मिळाला आहे; परंतु सीमा व तिच्या मुलांचे काय होणार, हा प्रश्न शिल्लकच आहे. दरम्यान, पाकिस्तानात हा मुद्दा चांगलाच तापू लागला असून, भारताने सीमाला पाकिस्तानच्या सुपुर्द करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. सौदी अरेबियात नोकरी करीत असलेला सीमाचा पती गुलाम हैदर याने तर चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यासाठी साकडे घातले आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील काही कट्टरपंथीयांनी सीमाच्या कृतीचा बदला म्हणून अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या मंदिरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. रविवारी एका मंदिरावर रॉकेट डागण्यात आले. हा हल्ला दरोडेखोरांच्या टोळीने केल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी काही अल्पसंख्याकांच्या घरांनाही क्षती पोहोचवली. शिवाय त्यांनी ३० जणांना ओलीस ठेवल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, सीमावर ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होत असून, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पथकाचे गठन केले आहे. चौकशीतून सीमाचे वास्तव समोर येईल तेव्हा येईल; पण सध्या तरी या अनोख्या प्रकरणाने भारत आणि पाकिस्तानातील कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीमाच्या या कहाणीत एखाद्या ‘वेब सिरीज’साठी  आवश्यक सर्व मसाला ठासून भरला आहे.  तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याने, तिला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनेच हेरगिरी करण्यासाठी पाठविले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, गत २४ तासांपासून सचिन, सीमा आणि तिची चार मुले बेपत्ता असल्याची बातमी सोमवारी येऊन थडकली आणि या प्रकरणाचे गूढ आणखीच वाढले.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना, सीमाने तिचे वास्तव्याचे ठिकाण बदलू नये आणि सचिन व सीमा दोघांनीही न्यायालयात नियमित हजेरी लावावी, अशी अट घातली होती. तरीही ते दोघे बेपत्ता झाले असतील तर गूढ वाढणारच! सीमाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या काही ध्वनिचित्रफिती समजमाध्यमांमध्ये फिरत असून, त्यामध्ये ती अस्खलित हिंदीत बोलताना दिसते. गुलाम हैदरसोबत विवाह होण्यापूर्वी सिंध प्रांतातील खैरपूर येथे आणि विवाहानंतर कराचीत वास्तव्य असलेल्या सीमाचे हिंदी एवढे चांगले कसे, हा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होत आहे. सीमाकडे चार मोबाइल फोन, एक नादुरुस्त फोन, एक सीम कार्ड, दोन व्हिडिओ कॅसेट्स आणि पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने तयार केलेली एक यादी सापडल्याचेही वृत्त आहे. त्यात तथ्य असल्यास प्रकरणाच्या गांभीर्यात आणखीच वाढ होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी अत्यंत आवश्यक झाली आहे. सीमा हेर असल्याचे सिद्ध झाल्यास तिला जी शिक्षा व्हायची ती होईलच! तसे नसल्यास मात्र तिला भारतात राहू द्यावे; कारण विदेशात जाऊन धर्म परिवर्तन केलेल्या महिलेला पाकिस्तानात जिवंत ठेवले जाण्याची अजिबात शक्यता नाही!

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBorderसीमारेषाUttar Pradeshउत्तर प्रदेश