शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

उद्यासाठी गांधी विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:59 IST

काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते.

- सुनीलकुमार लवटेकाल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते. हे ब्रीद निरंतर, चिरंतन, राहणारे आहे. भारताची सध्याची स्थिती, गती, पाहता महात्मा गांधींचे जीवन, कार्य, विचार उद्याच्या अनेक वर्षांसाठी आवश्यकच नाहीत, तर अनिवार्य राहणार आहेत. महात्मा गांधी देशासाठी आज जितके आवश्यक तितकेच उद्यापण का? तर भारताचे प्रश्न आणि समस्यांना अंत नाही. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, विज्ञान-निष्ठा यासारखी मूल्ये प्रमाण मानत एकात्म भारताचे स्वप्न पाहिले होते, ते अद्याप अपूर्ण आहे. ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र गुंगा (मुका) है’ म्हणून खेद नि शल्य व्यक्त करणाऱ्या महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करायची असेल, तर उद्याचा भारत घडविताना आपणाला जात, धर्म, लिंग, प्रांत, भेद दूर सारून प्रसंगी संकीर्णतेस मूठमाती देऊन ‘देश प्रथम’चा विचार करावा लागेल. बहुविध भारतास एकाच रंगाने रंगविण्याचे प्रयोग भारतात मुघल नि इंग्रजांनी अनेकदा केले. भारत हा मुळातच बहुवंशीय, बहुसंस्कृतिक, बहुभाषिक देश होय. ‘विविधतेत एकता’ हे त्याचं वास्तव आहे. असं वास्तव असणारे जगात अनेक देश आहेत. त्यांनी देश घडविण्याचे केलेले प्रयोग नि इथलं वास्तव लक्षात घेऊन उद्याच्या विकासाचे चित्र आपण ठरविले पाहिजे. भावनेची सांगड कृतीशी घातल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम रूपात सांगितलेली ‘एकादश व्रते’ इथला माणूस घडण्यामागची आव्हाने काल होती, आज आहेत; पण उद्या ती न राहता आपला ‘आचार-धर्म’ बनेल, तर उद्याचा भारतीय नागरिक आदर्श होईल. म्हणून भारत सरकारने भविष्यातही महात्मा गांधी विचार आचार-धर्म मानत त्यांना कार्यांजली वाहत राहण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी १ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर २०१९ असे कार्यक्रम निश्चित केले असून, ते ‘गांधी -१५०’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काल युनोत आंतरराष्ट्रीय गांधी परिषद झाली. आज बंगळुरू येथे ‘गांधी प्रदर्शन’ आयोजित केले आहे. आपणही रोज या सदरात भविष्यासाठी महात्मा गांधींचे जीवनकार्य, विचार आचरणात आणून उद्याचे ‘लोकमत’ आणि ‘लोकमन’ घडविण्याचा जनसंकल्प करीत कार्यांजली वाहण्याचे ठरविले आहे. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी