शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
4
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
5
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
6
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
7
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
8
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
9
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
10
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
11
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
12
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
13
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
14
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
15
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
16
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
17
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
18
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
19
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
20
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उद्यासाठी गांधी विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:59 IST

काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते.

- सुनीलकुमार लवटेकाल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते. हे ब्रीद निरंतर, चिरंतन, राहणारे आहे. भारताची सध्याची स्थिती, गती, पाहता महात्मा गांधींचे जीवन, कार्य, विचार उद्याच्या अनेक वर्षांसाठी आवश्यकच नाहीत, तर अनिवार्य राहणार आहेत. महात्मा गांधी देशासाठी आज जितके आवश्यक तितकेच उद्यापण का? तर भारताचे प्रश्न आणि समस्यांना अंत नाही. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, विज्ञान-निष्ठा यासारखी मूल्ये प्रमाण मानत एकात्म भारताचे स्वप्न पाहिले होते, ते अद्याप अपूर्ण आहे. ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र गुंगा (मुका) है’ म्हणून खेद नि शल्य व्यक्त करणाऱ्या महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करायची असेल, तर उद्याचा भारत घडविताना आपणाला जात, धर्म, लिंग, प्रांत, भेद दूर सारून प्रसंगी संकीर्णतेस मूठमाती देऊन ‘देश प्रथम’चा विचार करावा लागेल. बहुविध भारतास एकाच रंगाने रंगविण्याचे प्रयोग भारतात मुघल नि इंग्रजांनी अनेकदा केले. भारत हा मुळातच बहुवंशीय, बहुसंस्कृतिक, बहुभाषिक देश होय. ‘विविधतेत एकता’ हे त्याचं वास्तव आहे. असं वास्तव असणारे जगात अनेक देश आहेत. त्यांनी देश घडविण्याचे केलेले प्रयोग नि इथलं वास्तव लक्षात घेऊन उद्याच्या विकासाचे चित्र आपण ठरविले पाहिजे. भावनेची सांगड कृतीशी घातल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम रूपात सांगितलेली ‘एकादश व्रते’ इथला माणूस घडण्यामागची आव्हाने काल होती, आज आहेत; पण उद्या ती न राहता आपला ‘आचार-धर्म’ बनेल, तर उद्याचा भारतीय नागरिक आदर्श होईल. म्हणून भारत सरकारने भविष्यातही महात्मा गांधी विचार आचार-धर्म मानत त्यांना कार्यांजली वाहत राहण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी १ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर २०१९ असे कार्यक्रम निश्चित केले असून, ते ‘गांधी -१५०’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काल युनोत आंतरराष्ट्रीय गांधी परिषद झाली. आज बंगळुरू येथे ‘गांधी प्रदर्शन’ आयोजित केले आहे. आपणही रोज या सदरात भविष्यासाठी महात्मा गांधींचे जीवनकार्य, विचार आचरणात आणून उद्याचे ‘लोकमत’ आणि ‘लोकमन’ घडविण्याचा जनसंकल्प करीत कार्यांजली वाहण्याचे ठरविले आहे. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी