शहरं
Join us  
Trending Stories
1
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
2
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
3
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
5
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
6
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
7
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
8
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
9
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
10
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
11
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
12
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
13
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
14
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
15
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
16
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
17
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
18
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
19
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
20
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट

१३० वर्षांपूर्वीचे ‘ते शब्द’; आजही जगाच्या जखमांवर मलम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 08:34 IST

Swami Vivekananda: १८९३ साली शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्यानाला (आज) ११ सप्टेंबर रोजी १३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने..

- प्रा. विजय कोष्टी (कवठेमहांकाळ, जि. सांगली)

स्वामी विवेकानंदांचे नाव घेतले की, डोळ्यासमोर येते ते त्यांचे जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणाने विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात “माझ्या बंधू आणि भगिनींनो”, अशी करताच उपस्थितांनी काही मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. ज्यांनी संपूर्ण जगाला स्त्री आणि पुरुष या दोन वर्गात विभागले होते, त्यांच्यासाठी स्वामीजींचे हे संबोधन  आश्चर्यकारक होते.

जगामध्ये कोणतेही असे भाषण नसेल, ज्याचा संबोधन दिवस वाढदिवसासारखा साजरा केला जात असेल; हे भाषण मात्र त्याला अपवाद आहे! शिकागोमधील विवेकानंदांच्या या भाषणाने संपूर्ण जगामध्ये खळबळ उडवून दिली होती, यावरूनच या संस्मरणीय भाषणाचे ऐतिहासिक महत्व सिद्ध होते. संपूर्ण जगाला धर्माचा मार्ग दाखविणाऱ्या, साधू-संतांची प्राचीन परंपरा असलेल्या देवभूमी भारताचे आपण प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगून  विवेकानंदांनी परिषदेत उपस्थित जगातील तमाम विद्वांनांसमोर संस्कृतमधील श्लोकांचा दाखले देऊन त्यांचे अर्थ विषद केले होते.

 ‘ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे - तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.’_ हे सूत्र त्यांनी गीतेतील श्लोकांचा दाखला देऊन समजावले.  ‘जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो,’ असे भगवंताचे वचन त्यांनी उच्चारले, तेव्हा धर्मसभेतील वातावरण बदलून गेले.

प्राचीन परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या योगी स्वामी विवेकानंदांनी जगामध्ये शांती आणि विश्वबंधुत्व यांचा प्रसार केला. दया, परोपकार, करुणा, सद्भावना, बंधुत्व आदी सदाचारांना जीवनात उतरविले. त्यांनी  कट्टरता, धर्मांधता, जातीयवाद, अस्पृश्यता, अनिष्ट चालीरिती, गुलामगिरीचा नेहमी विरोध केला, देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचे स्वप्न पहिले. हे सारे विवेकानंदांनी केले, त्या काळात  एक धर्म दुसऱ्या धर्माला शत्रू समजत असे, एक देश दुसऱ्या देशाकडे संशयाने पाहत असे आणि साम्राज्यवादाचे  राजकारण चालत असे. आज स्वामीजींच्या शिकागो येथील भाषणाच्या १३०व्या वर्षानिमित्त जगाला पुन्हा एकदा शांततेची, बंधुत्त्वाची गरज निर्माण झाली असून, कट्टरतावाद संपविण्याचीही निकड भासू लागली आहे. कमीत कमी शब्दांत  भारतीय संस्कृती, भारत भूमी, परंपरा, संस्कृती आणि धर्म या गोष्टींचा जगाला परिचय करून देऊन  स्वामीजींनी  फक्त औषधच सांगितले नाही, तर आजारच न होण्याची उपाययोजनाही सांगितली होती. त्यांनी शिकागोमध्ये स्पष्ट केले की,  जगात धर्माच्या नावाखालीच जास्त रक्त सांडले असून, कट्टरता आणि सांप्रदायिकतेमुळेच जास्त रक्तपात झाले आहेत.  इतरांचा  धर्म नष्ट करून आपल्या धर्माचा  प्रचार होऊ शकत नाही.  स्वामीजींनी  धर्मांधतेला विरोध  करण्याचे आणि मानवतेला  प्रतिष्ठा देण्याचे आवाहन संपूर्ण जगातील धर्मबांधवांना केले होते.  म्हणूनच स्वामीजींचे हे भाषण पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने जगासमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. आजसुद्धा संपूर्ण जगाने स्वामीजींची शिकवण अवलंबिली पाहिजे, असे वाटते.  आज स्वामीजींच्या  भाषणाला १३०  वर्षे लोटली असली  तरी,  आजही ते तितकेच मार्गदर्शक असून ते जणू वर्तमानातल्या दुखावलेल्या, रक्तबंबाळ आणि अस्वस्थ जगासाठीच बोलत असावेत, असे वाटते.  ही प्रासंगिकताच या भाषणाचे महत्व अधोरेखित करते, त्याला अजरामर करते.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदAdhyatmikआध्यात्मिक