शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

थोरल्या काकांची ‘रेल्वे’

By सचिन जवळकोटे | Updated: August 2, 2018 04:09 IST

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’ हे ऐकताच दचकलेले बंड्या अन् गुंड्या कामाला लागले. ‘धनुष्य’ पार्टीच्या मेळाव्यात त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन काही जणांच्या खिशात हात घातला... नंतर हाती आलेल्या चिठ्ठ्या-चपाट्या घरी जाऊन निवांतपणे वाचल्या, तेव्हा ते जाम हसले.‘पाच वर्षे माझी खुर्ची टिकू दे रे देवाऽऽ’ अशी प्रार्थना करणा-या आशयाच्या काही चिठ्ठ्या होत्या तर एक चपाटी चक्क देवेंद्रपंतांच्या नावानं लिहिलेली होती, ‘राजीनामा देण्याची वेळ या जन्मी तरी येणार नाही, असं वाटतं. मात्र, दुर्दैवाने आम्ही स्वत:च्या पायावर दगड पाडून घेतलाच तर माझे हात कायमस्वरूपी आपल्या चरणाशी असतील. आम्हाला दूर सारू नका...’ त्याक्षणी या दोघांच्या लक्षात आलं की, ‘मातोश्री’कारांचं गेल्या चार वर्षांतलं नेमकं दुखणं काय होतं. असो.‘थोरले काका बारामतीकर तब्बल २८ वर्षांनी रेल्वेत बसले,’ ही ब्रेकिंग बातमी नुकतीच सोशल मीडियावर गरागरा फिरू लागताच बंड्या-गुंड्यानं झटकन् वेगवेगळे ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’ चाळायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या नजरेला पडू लागला, फुल्ल टाइमपास करणारा एक से एक मजकूर.एका ‘कमळ’छाप ग्रुपवर पोस्ट पडलेली, ‘अठ्ठावीस वर्षांनी का होईना बारामतीकर जमिनीवर आले. अखेर त्यांचे विमान खाली उतरले. अब की बारी, पंढरपूर की वारी...’ हे वाचताना बंड्या गोंधळला, ‘थोरले काका पुन्हा माढ्यातून उभे राहाणार की काय...?’ तेव्हा गुंड्यानं त्याला समजावून सांगितलं, ‘ही पोस्ट तयार करणाºया मीडिया सेलवाल्यानं नुकतीच मन की बात ऐकली असावी... म्हणूनच त्याच्या डोक्यात पंढरपूर की वारी भिरभिरली असावी.’ हे ऐकून बंड्याला वाटलं, ‘बिच्चारे देवेंद्रपंत वारी चुकल्यामुळं अगोदरच नाराज असताना नरेंद्रभाई मुद्दामहून वारी करण्याचं सांगून जखमेवर मीठ चोळताहेत की काय?’यानंतर दुसºया ‘घड्याळ’छाप ग्रुपवर पोस्ट झळकू लागलेली, ‘नेहमी लेट असणारी रेल्वे केवळ साहेबांच्या पदस्पर्शानं वेळेवर धावली. अगदी घड्याळाच्या काट्यावर... हे शक्य झालं केवळ आमच्या साहेबांमुळंच!’‘इंजिन’छाप ग्रुपवरही मेसेज फिरलेला, ‘होय... बारामतीकर अखेर रेल्वेत बसले. आमच्या इंजिनशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या विषयावरची महामॅरेथॉन मुलाखत ऐका... लवकरच आमच्या फेसबुकवर !’‘हात’छाप गु्रपवाल्यांनी तर कमालीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली, ‘आमचे राहुलबाबा जर उद्धोंना हॅपी बड्डेऽऽ म्हणत असतील तर थोरले काका रेल्वेत बसले म्हणून काय बिघडलं होऽऽ कुठून तरी विरोधकांचे सारे डबे एकत्र आले पाहिजेत. विरोधकांची एक्स्प्रेस सुसाट निघाली पाहिजे.’शेवटचा ग्रुप होता ‘रामदास’ चाहत्यांचा. या ग्रुपला मात्र मस्तपैकी एक काव्य आठवले, ‘काकांची दक्षिण महाराष्ट्र एक्स्प्रेस, भलेही मुंबईपर्यंत पोहोचू दे... माझी डायरेक्ट फ्लाईट मात्र, थेट दिल्लीतच उतरू दे!’(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण