शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

हा राज्यघटना वाचविण्याचा लढा आहे - यशवंत सिन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 09:47 IST

माजी अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री तथा राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्याची खात्री कितपत वाटते? मी जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत आहे. 

सध्यातरी मतदारांचे संख्याबळ आपल्या विरोधात आहे; मग जिंकूच, असे कशाच्या आधारे म्हणता?अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. तूर्तास मी सगळ्यांची नावे घेऊ शकत नाही. पण, या निवडणुकीत सत्याचा विजय होईल इतके नक्की सांगतो.

नवीन पटनायक, जगन मोहन रेड्डी अशा काही मुख्यमंत्र्यांनी एनडीएच्या उमेदवारांना आधीच पाठिंबा दिला आहे. एनडीएत नसलेल्या मायावतींसारख्या व्यक्ती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर आहेत. झारखंड मुक्ती मोर्चासुद्धा..(थोडे नाराज होत)  कोणाचा पाठिंबा कोणाला आहे यामुळे मला काही फरक पडत नाही. आपण निकाल काय लागतो तेवढा पाहा.शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांच्यासारख्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवायला नकार दिला असताना आपण कसे काय तयार झालात? मग, आपल्याला काय वाटते मीही नकार देईन? मैदान सोडून पळणाऱ्यांतला मी नाही. उमेदवारीसाठी आपल्याशी कोणी - कोणी बोलणे केले होते? राष्ट्रपती निवडणुकीवरून संयुक्त विरोधी पक्षांच्या दोन बैठका झाल्या. दुसऱ्या बैठकीत माझ्या नावाचा प्रस्ताव आला आणि  मान्य झाला. शरद पवार यांनी सर्वांत आधी मला फोन केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि ममता बॅनर्जी यांनी. मी त्यांचा आग्रह मान्य केला. त्यानंतर मला सातत्याने पाठिंब्याचे फोन येत आहेत. आता मी देशभर फिरून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन पाठिंबा मागेन. आपण स्वतः आदिवासीबहुल झारखंडचे! पहिल्यांदा राष्ट्रपती होणार असलेल्या एका आदिवासी महिलेच्या मार्गात आपण अडथळा बनू इच्छिता काय? कोणी कुठल्या कुळात जन्माला यावे हे त्याच्या हातात असते का? द्रौपदी मुर्मू या तर ओडिशामध्ये मंत्री होत्या. झारखंडच्या राज्यपाल होत्या. तरी त्यांच्या गावात आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही. असे असताना त्या देशासाठी काय करतील? आपण कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार आहात? ही काही छोटीमोठी लढाई नाही. ही विचारप्रणालीची लढाई असून, हा  राज्यघटना वाचविण्याचा लढा आहे. आपला देश कायमच विविधतापूर्ण आणि समावेशक राहिला. परंतु आज एक विचारधारा सगळ्यांवर लादली जातेय. संघर्ष आणि द्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे.  देशाची राज्यघटना पूर्णपणे नष्ट करून आज एका हुकूमशाही आणि एकाधिकारवादी समाजाची स्थापना केली जाते आहे.आपण दीर्घकाळ भाजपमध्ये राहिला आहात. या निवडणुकीकडे भाजप विरुद्ध भाजप लढाई म्हणून पाहिले जाऊ नये, असे नाही वाटत? मी १९९३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपत सामील झालो होतो. तो भाजप आजच्या पक्षापेक्षा एकदम वेगळा होता.१९९८ मध्ये भाजप संसदेत केवळ एका मताने पराभूत झाला आणि अटलजींनी ताबडतोब राजीनामा दिला. आजचा भाजप असे करेल काय? कर्नाटक आणि मध्य प्रदेशात काय झाले? महाराष्ट्रात काय होत आहे? तेथे जनादेशाचा अपमान केला जात आहे. अटलजींचा भाजप केवळ आम सहमतीने काम करीत असे. आजच्या भाजपला केवळ राजकारण आणि समाजातच नाही, सर्वच ठिकाणी फक्त  संघर्षच हवा आहे. परंतु राष्ट्रपती तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने निर्णय घेतात. आपण निवडून जरी आलात तरी आपण काम कसे करणार? राष्ट्रपतींचा सल्ला सरकारला गांभीर्याने घ्यावाच लागेल. राष्ट्रपतींकडे सल्ला देण्याव्यतिरिक्त इतरही अधिकार असतात. राष्ट्रपती हा तिन्ही सेनादलांचा प्रमुख असतो.  

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक